शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

विदर्भ, दुरांतो अन् राजधानी एक्सप्रेस फुल्ल; दिवाळीनंतरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 7:22 PM

Train Nagpur News कोरोनामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने नाकारली आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरांतो एक्स्प्रेस फुल्ल असून बंगळूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मध्ये ही वेटिंग ची स्थिती आहे.

ठळक मुद्देकेवळ तीनच रेल्वेगाड्यात मिळतेय आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दिवाळीचा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपापल्या गावाकडे आले. परंतु परतीच्या प्रवासात मात्र त्यांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. कोरोनामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने नाकारली आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरांतो एक्स्प्रेस फुल्ल असून बंगळूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मध्ये ही वेटिंग ची स्थिती आहे.

दिवाळीनंतर केवळ तीन ते चार रेल्वेगाड्यातच बर्थ रिकामे आहेत. विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे त्यामुळे विदर्भ आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये वेटिंग ची स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना दिवाळीनंतर आपापल्या कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी खासगी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

या गाड्या आहेत फुल्ल

नागपुरातून जाणाऱ्या ०२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेस, ०२८३३ अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, ०२२९६ दानापूर बंगलोर संघमित्रा एक्सप्रेस, ०२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस, ०२६९१ बंगळूर नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आदी गाड्यात आरक्षण फुल्ल झाले आहे. तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांच्या हाती वेटिंगचे तिकीट पडत असल्यामुळे त्यांचा नाईलाज होता आहे.

या गाड्यात आहेत बर्थ शिल्लक

नागपुरातून जाणाऱ्या नागपूर जबलपुर एक्सप्रेस या गाडीतही ३०० च्या वर शिल्लक आहेत. रेल्वे गाडी क्रमांक ०२२८५ सिकंदराबाद निजामुद्दीन एक्सप्रेस या गाडीत तसेच ०२६२५ केरला एक्सप्रेस मध्येही प्रवाशांना आरक्षण मिळत आहे.

१२५ पैकी ६० गाड्याच सुरू

कोरोनचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी नागपुरातून १२५ च्या जवळपास रेल्वेगाड्या धावत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रेल्वेत मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ६० विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत. नियमित रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतला नाही.

दिवाळी छ्ट पूजेमुळे आरक्षण फुल्ल

दिवाळी आणि  छट पूजेमुळे रेल्वे गाड्यात आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. दिवाळी मधील गर्दी आणि छट पूजा संपल्यानंतर परिस्थिती पूर्वीसारखी होईल.

_एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे नागपूर विभाग

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे