शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

उपराजधानीत वर्षभरात विना हेल्मेट ६१२ दुचाकीस्वारांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:09 AM

२०१९ या वर्षात विविध अपघातामध्ये जखमी झालेल्या ३६८४ चालकांना नागपूर मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यातील ८०० चालकांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमेडिकलच्या ‘ट्रॉमा’मधील वर्षभरातील आकडेवारी वाहन चालविताना मोबाईलवर बोलणेही ठरते मृत्यूला कारण

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विना हेल्मेट प्रवास जीवघेणा ठरतो, असे असताना देखील बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट टाळतात. परिणामी, अपघात झाल्यास मेंदूला जबर मार बसून गंभीर जखमी होतात. २०१९ या वर्षात विविध अपघातामध्ये जखमी झालेल्या ३६८४ चालकांना मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यातील ८०० चालकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, यात विना हेल्मेट चालकांची संख्या ६१२ होती.रस्ते अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मेडिकलने ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्या तीन वर्षांत जखमींची संख्या वाढली आहे. २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची चमू येथे कार्यरत असल्याने हे ‘सेंटर’ अनेकांसाठी वरदान ठरत आहे. परंतु अपघातांच्या वाढत्या संख्येने रुग्णांची संख्याही वाढली आहे. विशेष म्हणजे, हेल्मेटचा सक्तीचा वापर करण्याचा शासनाकडून प्रयत्न होत आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून विना हेल्मेट चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहे. मात्र, हेल्मेटचे महत्त्व माहीत असताना सुद्धा बहुसंख्य दुचाकीचालक त्याच्याकडे ओझे म्हणून पाहतात. यामुळे चौकात पोलीस असतील तरच हेल्मेट घालण्याचे किंवा पळवाटा शोधण्याची वृत्ती वाढत असल्याने रस्ता अपघातात विना हेल्मेट वाहनधारक गंभीर जखमी होत असून मृत्यूच्या दारात पोहचत आहे.गेल्या वर्षभरात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ६१२ चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणेही २१ चालकांसाठी मृत्यूचे कारण ठरले.

जखमींमध्ये ९० टक्के चालक विना हेल्मेटजानेवारी ते डिसेंबरपर्यंत ट्रॉमा केअर सेंटरमध्ये येणाऱ्या जखमींची माहिती गोळा करण्यात आली आहे. यात रस्ता अपघातात जखमी झालेल्या ९० टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. यातील ७६ टक्के जखमींना जीवाला मुकावे लागले. ही धक्कादायक वस्तूस्थिती आहे.डॉ. मोहम्मद फैजल, प्रमुख, आर्थाेपेडिक विभाग व ट्रॉमा केअर सेंटर

मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु हेल्मेट नसताना आणि ४५ किमी प्रतितासाच्या वेगाने चालणाºया मोटारसायकलीवरून चालक खाली पडल्यास त्याला चारपट गतीने मार लागतो. यात डोक्याचे हाड तुटण्याची व मेंदूला जबर मार बसण्याची शक्यता असते. ‘रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये विना हेल्मेट असलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या पाहता हेल्मेटचे गांभीर्य आवश्यक आहे.-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल२० ते ४० वयोगटात सर्वाधिक मृत्यूट्रॉमा केअर सेंटरने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. यात २० ते ४० या वगोटातील तरुण जास्त आहेत. अशा वयोगटातील तरुणांवरच त्यांच्या कुटुंबाची व वयोवृद्ध पालकांची जबाबदारी असते. त्यांच्या निधनाने त्यांचे अख्खे घर पोरके होऊन जात असते.

टॅग्स :Accidentअपघात