शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:18 PM

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते.

ठळक मुद्देपावसामुळे भाज्या महाग स्थानिक व बाहेरून आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसामुळे कोथिंबीरचे बहुतांश पीक खराब झाले असून आवक फारच कमी आहे. नाशिक, नांदेड आणि छिंदवाडा येथून आवक बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते. सर्वाधिक भाव असतानाही ग्राहकांनी खरेदी केल्याची माहिती महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.हिरव्या पालेभाज्यांची आवक कमी असली तरी पालक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रविवारी ठोकमध्ये १० रुपये तर किरकोळमध्ये २० रुपये भाव होते. याशिवाय मेथी पंढरपूर येथून येत असून ठोकमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपये तर चवळी भाजी ३० रुपये किलो विकल्या गेली.पंजाब, दिल्लीतून आवकस्थानिक शेतकऱ्यांकडून हिरवी मिरचीची आवक बंद असून दिल्ली, पंजाब आणि जमशेदपूर येथून सुरू आहे. ठोकमध्ये ४० ते ५० रुपये भाव असून किरकोळमध्ये ६० ते ८० रुपये आहेत.रविवारी किरकोळ बाजारातील भावकोथिंबीर ३५० रुपये, हिरवी मिरची ६० ते ८०, टमाटर ४०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी ४०, वांगे ४०, कारले ८०, ढेमस ५०, भेंडी ५०, चवळी शेंग ६०, गवार ६०, लवकी ३०, कोहळे ४०, सिमला मिरची ८०, तोंडले ४०, परवळ ७०, मेथी १२०, पालक २०, चवळी भाजी ४०, काकडी ३०, गाजर ४०, मुळा ४०, कैरी ८०, फणस ५० रुपये.स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, कारले, वांगे, भेंडीनागपूर जिल्ह्याच्या २५ ते ३० कि़मी.च्या अंतरावरून फूलकोबी, ढेमस, वांगे, टमाटर, मोहाडहून कारले, मौद्याहून भेंडी, तुमसर व मौदा येथून चवळी व गवार शेंग, कळमेश्वर व सावनेरहून पालक व चवळी भाजी तर मदनपल्लीहून पत्ताकोबी, राजनांदगाव येथून लवकी, यवतमाळ व जळगावहून कोहळे, रायपूरहून सिमला मिरची, रायपूर, भिलाई, दुर्ग येथून तोंडले व परवळ, ओरिसा राज्यातून फणस, रायपूर येथून सिमला मिरची आणि देशाच्या अन्य भागातून काकडी, गाजर, मुळा, कैरी आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये सरासरी लहान-मोठ्या ७० ते ८० गाड्या येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.कांदे व बटाट्याची विक्री कमीकळमना कांदे, बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, कांद्याची आवक चांगली असून विक्री कमी आहे. त्यानंतरही भाव वाढले आहेत. कळमना ठोक बाजारात भाव २० रुपये किलो, पण किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये भाव आहेत. कळमन्यात पांढरे आणि लाल कांद्यांचे भाव ७०० ते ८०० रुपये मण (एक मण ४० किलो) आहेत. पांढरे कांदे अमरावती आणि अकोला येथे येतात. भाव परवडत नसल्यामुळे गुजरातेतून आवक बंद आहे. दररोज ८ ते १० ट्रक (एक ट्रक १० टन) येत आहेत. लाल कांद्याला जास्त मागणी असते. सध्या चाळीसगाव, बुलडाणा (शेगाव, खामगाव), मध्य प्रदेशातील सागर व रायसेन जिल्ह्यातून आवक आहे. दररोज १५ ते २० ट्रक (एक ट्रक १२ टन) कळमन्यात येत आहेत. पांढºया आणि लाल कांद्याचे पीक मार्चमध्ये आले. उन्हाळी कांदा साठवून ठेवता येतो. शेतकरी गरजेनुसार बाजारात विक्रीसाठी आणतात. लासलगाव, पिंपळगाव येथील दर्जेदार लाल कांदा पॅकिंगमध्ये मलेशिया आणि बांगलादेशात निर्यात करण्यात येत असल्याचे वसानी म्हणाले.बटाट्याचे भाव स्थिरयंदा उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यांपासून बटाट्याचे भाव स्थिर आहेत. मार्चमध्ये नवीन उत्पादन निघाले तेव्हा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये मण होते. जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. पण मागणी कमी झाल्यानंतर शेतकºयांनी विक्रीस काढला. सध्या कळमन्यात ३५० ते ४०० रुपये मण भाव आहेत. दररोज २० ते २५ ट्रक (एक ट्रक १५ ते २० टन) बटाटे उत्तर प्रदेशातील आग्रा, इटावा, सिरसागंज येथून येत आहेत. सणासुदीत भाव वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vegetableभाज्या