शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:20 IST

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते.

ठळक मुद्देपावसामुळे भाज्या महाग स्थानिक व बाहेरून आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसामुळे कोथिंबीरचे बहुतांश पीक खराब झाले असून आवक फारच कमी आहे. नाशिक, नांदेड आणि छिंदवाडा येथून आवक बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते. सर्वाधिक भाव असतानाही ग्राहकांनी खरेदी केल्याची माहिती महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.हिरव्या पालेभाज्यांची आवक कमी असली तरी पालक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रविवारी ठोकमध्ये १० रुपये तर किरकोळमध्ये २० रुपये भाव होते. याशिवाय मेथी पंढरपूर येथून येत असून ठोकमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपये तर चवळी भाजी ३० रुपये किलो विकल्या गेली.पंजाब, दिल्लीतून आवकस्थानिक शेतकऱ्यांकडून हिरवी मिरचीची आवक बंद असून दिल्ली, पंजाब आणि जमशेदपूर येथून सुरू आहे. ठोकमध्ये ४० ते ५० रुपये भाव असून किरकोळमध्ये ६० ते ८० रुपये आहेत.रविवारी किरकोळ बाजारातील भावकोथिंबीर ३५० रुपये, हिरवी मिरची ६० ते ८०, टमाटर ४०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी ४०, वांगे ४०, कारले ८०, ढेमस ५०, भेंडी ५०, चवळी शेंग ६०, गवार ६०, लवकी ३०, कोहळे ४०, सिमला मिरची ८०, तोंडले ४०, परवळ ७०, मेथी १२०, पालक २०, चवळी भाजी ४०, काकडी ३०, गाजर ४०, मुळा ४०, कैरी ८०, फणस ५० रुपये.स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, कारले, वांगे, भेंडीनागपूर जिल्ह्याच्या २५ ते ३० कि़मी.च्या अंतरावरून फूलकोबी, ढेमस, वांगे, टमाटर, मोहाडहून कारले, मौद्याहून भेंडी, तुमसर व मौदा येथून चवळी व गवार शेंग, कळमेश्वर व सावनेरहून पालक व चवळी भाजी तर मदनपल्लीहून पत्ताकोबी, राजनांदगाव येथून लवकी, यवतमाळ व जळगावहून कोहळे, रायपूरहून सिमला मिरची, रायपूर, भिलाई, दुर्ग येथून तोंडले व परवळ, ओरिसा राज्यातून फणस, रायपूर येथून सिमला मिरची आणि देशाच्या अन्य भागातून काकडी, गाजर, मुळा, कैरी आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये सरासरी लहान-मोठ्या ७० ते ८० गाड्या येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.कांदे व बटाट्याची विक्री कमीकळमना कांदे, बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, कांद्याची आवक चांगली असून विक्री कमी आहे. त्यानंतरही भाव वाढले आहेत. कळमना ठोक बाजारात भाव २० रुपये किलो, पण किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये भाव आहेत. कळमन्यात पांढरे आणि लाल कांद्यांचे भाव ७०० ते ८०० रुपये मण (एक मण ४० किलो) आहेत. पांढरे कांदे अमरावती आणि अकोला येथे येतात. भाव परवडत नसल्यामुळे गुजरातेतून आवक बंद आहे. दररोज ८ ते १० ट्रक (एक ट्रक १० टन) येत आहेत. लाल कांद्याला जास्त मागणी असते. सध्या चाळीसगाव, बुलडाणा (शेगाव, खामगाव), मध्य प्रदेशातील सागर व रायसेन जिल्ह्यातून आवक आहे. दररोज १५ ते २० ट्रक (एक ट्रक १२ टन) कळमन्यात येत आहेत. पांढºया आणि लाल कांद्याचे पीक मार्चमध्ये आले. उन्हाळी कांदा साठवून ठेवता येतो. शेतकरी गरजेनुसार बाजारात विक्रीसाठी आणतात. लासलगाव, पिंपळगाव येथील दर्जेदार लाल कांदा पॅकिंगमध्ये मलेशिया आणि बांगलादेशात निर्यात करण्यात येत असल्याचे वसानी म्हणाले.बटाट्याचे भाव स्थिरयंदा उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यांपासून बटाट्याचे भाव स्थिर आहेत. मार्चमध्ये नवीन उत्पादन निघाले तेव्हा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये मण होते. जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. पण मागणी कमी झाल्यानंतर शेतकºयांनी विक्रीस काढला. सध्या कळमन्यात ३५० ते ४०० रुपये मण भाव आहेत. दररोज २० ते २५ ट्रक (एक ट्रक १५ ते २० टन) बटाटे उत्तर प्रदेशातील आग्रा, इटावा, सिरसागंज येथून येत आहेत. सणासुदीत भाव वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vegetableभाज्या