शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:20 IST

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते.

ठळक मुद्देपावसामुळे भाज्या महाग स्थानिक व बाहेरून आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसामुळे कोथिंबीरचे बहुतांश पीक खराब झाले असून आवक फारच कमी आहे. नाशिक, नांदेड आणि छिंदवाडा येथून आवक बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते. सर्वाधिक भाव असतानाही ग्राहकांनी खरेदी केल्याची माहिती महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.हिरव्या पालेभाज्यांची आवक कमी असली तरी पालक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रविवारी ठोकमध्ये १० रुपये तर किरकोळमध्ये २० रुपये भाव होते. याशिवाय मेथी पंढरपूर येथून येत असून ठोकमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपये तर चवळी भाजी ३० रुपये किलो विकल्या गेली.पंजाब, दिल्लीतून आवकस्थानिक शेतकऱ्यांकडून हिरवी मिरचीची आवक बंद असून दिल्ली, पंजाब आणि जमशेदपूर येथून सुरू आहे. ठोकमध्ये ४० ते ५० रुपये भाव असून किरकोळमध्ये ६० ते ८० रुपये आहेत.रविवारी किरकोळ बाजारातील भावकोथिंबीर ३५० रुपये, हिरवी मिरची ६० ते ८०, टमाटर ४०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी ४०, वांगे ४०, कारले ८०, ढेमस ५०, भेंडी ५०, चवळी शेंग ६०, गवार ६०, लवकी ३०, कोहळे ४०, सिमला मिरची ८०, तोंडले ४०, परवळ ७०, मेथी १२०, पालक २०, चवळी भाजी ४०, काकडी ३०, गाजर ४०, मुळा ४०, कैरी ८०, फणस ५० रुपये.स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, कारले, वांगे, भेंडीनागपूर जिल्ह्याच्या २५ ते ३० कि़मी.च्या अंतरावरून फूलकोबी, ढेमस, वांगे, टमाटर, मोहाडहून कारले, मौद्याहून भेंडी, तुमसर व मौदा येथून चवळी व गवार शेंग, कळमेश्वर व सावनेरहून पालक व चवळी भाजी तर मदनपल्लीहून पत्ताकोबी, राजनांदगाव येथून लवकी, यवतमाळ व जळगावहून कोहळे, रायपूरहून सिमला मिरची, रायपूर, भिलाई, दुर्ग येथून तोंडले व परवळ, ओरिसा राज्यातून फणस, रायपूर येथून सिमला मिरची आणि देशाच्या अन्य भागातून काकडी, गाजर, मुळा, कैरी आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये सरासरी लहान-मोठ्या ७० ते ८० गाड्या येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.कांदे व बटाट्याची विक्री कमीकळमना कांदे, बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, कांद्याची आवक चांगली असून विक्री कमी आहे. त्यानंतरही भाव वाढले आहेत. कळमना ठोक बाजारात भाव २० रुपये किलो, पण किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये भाव आहेत. कळमन्यात पांढरे आणि लाल कांद्यांचे भाव ७०० ते ८०० रुपये मण (एक मण ४० किलो) आहेत. पांढरे कांदे अमरावती आणि अकोला येथे येतात. भाव परवडत नसल्यामुळे गुजरातेतून आवक बंद आहे. दररोज ८ ते १० ट्रक (एक ट्रक १० टन) येत आहेत. लाल कांद्याला जास्त मागणी असते. सध्या चाळीसगाव, बुलडाणा (शेगाव, खामगाव), मध्य प्रदेशातील सागर व रायसेन जिल्ह्यातून आवक आहे. दररोज १५ ते २० ट्रक (एक ट्रक १२ टन) कळमन्यात येत आहेत. पांढºया आणि लाल कांद्याचे पीक मार्चमध्ये आले. उन्हाळी कांदा साठवून ठेवता येतो. शेतकरी गरजेनुसार बाजारात विक्रीसाठी आणतात. लासलगाव, पिंपळगाव येथील दर्जेदार लाल कांदा पॅकिंगमध्ये मलेशिया आणि बांगलादेशात निर्यात करण्यात येत असल्याचे वसानी म्हणाले.बटाट्याचे भाव स्थिरयंदा उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यांपासून बटाट्याचे भाव स्थिर आहेत. मार्चमध्ये नवीन उत्पादन निघाले तेव्हा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये मण होते. जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. पण मागणी कमी झाल्यानंतर शेतकºयांनी विक्रीस काढला. सध्या कळमन्यात ३५० ते ४०० रुपये मण भाव आहेत. दररोज २० ते २५ ट्रक (एक ट्रक १५ ते २० टन) बटाटे उत्तर प्रदेशातील आग्रा, इटावा, सिरसागंज येथून येत आहेत. सणासुदीत भाव वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vegetableभाज्या