शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

यंदा उन्हाळ्यात भाज्या स्वस्तच!

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 2, 2024 20:25 IST

घाऊकच्या तुलनेत किरकोळमध्ये महाग : अनेकांची घाऊक बाजाराकडे धाव, पावसामुळे आवक वाढली

माेरेश्वर मानापुरे, नागपूर : जीवनावश्यक वस्तू, धान्य व कडधान्याच्या महागाईचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र यंदा उन्हाळ्यात भाजीपाला स्वस्तच आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर फारच ताण आलेला नाही. तसे पाहिल्यास घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळमध्ये भाज्यांचे दर दुप्पट आणि तिप्पट असतात. त्यामुळेच काही ग्राहकांनी कॉटन मार्केटकडे धाव घेतली आहे. किरकोळमध्ये कोथिंबीर ६० तर हिरव्या मिरचीचे भाव प्रति किलो ५०० रुपये आहेत. यंदा पावसामुळे भाज्यांना संजीवनी मिळाली. याच कारणामुळे पुढे भाव कमी होतील.

पावसामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी झाल्याने किमतीत वाढ झाली. पण सध्या भाव उतरले आहेत. कळमना आणि उपबाजार कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती नियंत्रणात आहेत. तुलनेत किरकोळमध्ये दोन-तीन पटीने वाढ झाली आहे. सध्या स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून भाज्यांची ७० टक्के आवक आहे.

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात भाज्यांचे भाव गगनाला पोहोचतात. पण यंदा पावसामुळे शेत हिरवेगार आहेत. शिवाय घाऊकमध्ये भाज्यांच्या किमतही घसरण झाली आहे. याउलट किरकोळ विक्रेते पावसामुळे भाज्यांची दरवाढ झाल्याचे कारण देत असून भाज्या शेतातच खराब झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पावसामुळे काही भाज्यांची दर्जा घसरला आहे. तसे पाहता पावसामुळे भाजीपाल्यांच्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. शेतात भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. ऊनाचा तडाखा वाढल्यानंतर भाज्यांची आवक वाढेल आणि भाव कमी होतील, असे मत महात्मा फुले फ्रूट व सब्जी आडतिया असोसिएशनचे (कॉटन मार्केट) सचिव राम महाजन यांनी व्यक्त केले.

किरकोळमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, भेंडी, कारले, गवार, पालक, मेथी, फणस या भाज्यांचे भाव ५० ते ७० रुपयांदरम्यान आहेत. यंदा टोमॅटो आटोक्यात असून २० ते २५ रुपये किलो आहेत. महागाईच्या काळात किरकोळमध्ये अचानक वाढलेल्या भाज्यांच्या दराची चिंता सर्वांना सतावत आहे. लवकरच दर कमी व्हावेत, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे.

टोमॅटो स्थानिक उत्पादकांसह बेंगळुरू, मदनपल्ली येथून तर सिमला मिरची, परवळ, कारले, तोंडले रायपूर, भिलाई, दुर्ग येथून विक्रीला येतात. कोथिंबीर स्थानिकांकडून आणि नाशिक तसेच जगदलपूर आणि मौदा येथून हिरवी मिरची विक्रीस येत आहे.

भाजीपाला ठोक भाव किरकोळ भाव :वांगे १० २०हिरवी मिरची २५ ४०कोथिंबीर ३५ ५०टोमॅटो १२ २५फूल कोबी १८ ३०पत्ता कोबी ८ १५भेंडी २५ ५०कारले ३० ५०चवळी शेंग१५ ३०गवार शेंग २५ ५०पालक ८ १५मेथी ३० ५०कोहळ १० २०फणस ४० ६०कैरी २५ ४०परवळ ३० ५०तोंडले २० ४०दोडके ३० ५०काकडी १५ २०मुळा १० २५गाजर २५ ४०

टॅग्स :vegetableभाज्याAgriculture Sectorशेती क्षेत्रnagpurनागपूर