शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपुरात आठवड्यात उतरले भाज्यांचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 8:00 PM

Vegetable prices down, Nagpur News गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते.

ठळक मुद्देकिरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोवर : कोथिंबीर १२० रुपये

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते. सध्या मिरची ६० तर कोथिंबीर १०० ते १२० रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यात पालक भाजीचे भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सध्या ३० रुपयांपर्यंत उतरले आहेत. वांगे, फूलकोबी, पत्ताकोबीचे भाव आटोक्यात आहेत. स्वयंपाकघरात कमी किमतीच्या भाज्यांची रेलचेल दिसून येत आहेत.फूलकोबी काही प्रमाणात औरंगाबाद आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून येत आहे. पावसामुळे कोथिंबीर शेतातच खराब झाल्याने अजूनही आवक फार कमी आहे. त्यामुळे भाव १०० ते १२० रुपयांदरम्यान आहे. सध्या लातूर, बुलडाणा, नांदेड येथून कोथिंबीर तर लवकी भिलई, राजनांदगाव येथून येत आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली असून पीक ऑक्टोबरअखेरीस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील. सध्या कॉटन मार्केटमध्ये गेल्या आठवड्याच्या ३० ते ३५ गाड्यांच्या तुलनेत आवक दुप्पट झाली आहे. पुढे आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले. याशिवाय कळमना सब्जी मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्यांची आवक आहे. सध्या दोन्ही ठोक बाजारात शहराला होणाऱ्या पुरवठ्याच्या तुलनेत पुरेशी आवक आहे.

शनिवारी किरकोळमध्ये भाज्यांचे  भाव कोथिंबीर १०० ते १२०, हिरवी मिरची ५०, टमाटर ४०, वांगे २०, सिमला मिरची ७० ते ८०, तोंडले ५०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी २५ ते ३०, दोडके ४० ते ५०, लवकी ३०, कोहळे ३० ते ३५, चवळी शेंग ४० ते ५०, गवार ५०, चवळी भाजी ४० ते ५०, पालक ३० ते ४०, मेथी ७० ते ८०, परवळ ६० ते ७०, कारले ५०, भेंडी ४० ते ५०, काकळी ३०, गाजर ५०, मुळा ४०.

टॅग्स :vegetableभाज्याnagpurनागपूर