शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

भाज्या महागच

By admin | Updated: July 21, 2014 00:53 IST

मान्सून वेळेत न आल्याचा फटका भाज्यांना बसला. दीड महिन्यांपासून भाज्या महागच आहेत. भाज्यांना पर्याय म्हणून गृहिणींनी कडधान्याचा आधार घेतला आहे. आणखी एक महिनाभर

मिरची ५०, कोथिंबीर १०० : पावसामुळे फटकानागपूर : मान्सून वेळेत न आल्याचा फटका भाज्यांना बसला. दीड महिन्यांपासून भाज्या महागच आहेत. भाज्यांना पर्याय म्हणून गृहिणींनी कडधान्याचा आधार घेतला आहे. आणखी एक महिनाभर भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील, असे संकेत विक्रेत्यांनी दिले आहेत. बाजारात उपलब्ध भाज्यांच्या तुलनेत पौष्टिक कडधान्याचे दर कमी आहेत. प्रत्येकाला कॉटन मार्केट आणि कळमना ठोक बाजारात भाजी खरेदीला जाणे शक्य नाही. बहुतांश खरेदी किरकोळ विक्रेत्यांकडून दारातच केली जाते. भाव जास्त असतात. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. त्यांनी कडधान्याचा आधार घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आवक कमीगेल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे आवक कमी झाली आहे. रविवारी किरकोळ बाजारात मिरची ५० तर कोथिंबीर १०० रुपये किलो होती. कोथिंबीर कितीही महाग असली तरीही प्रत्येकजण थोडीफार खरेदी करतोच. त्यामुळे इतर भाज्यांसोबत कोथिंबीर विक्रीला ठेवावी लागते, अशी प्रतिक्रिया किरकोळ विक्रेत्यांनी दिली. रविवारी कॉटन मार्केटमध्ये जवळपास १५० छोट्यामोठ्या गाड्यांची आवक होती. वांग्याला कीड लागल्याने ठोक बाजारातच २ रुपये किलो विक्री सुरू आहे. स्थानिकांसह बाहेरगावातून आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ठोक बाजारात पत्ताकोबी १० रुपये, फुलकोबी १५, तोंडले ८ ते १० आणि कोहळे ६ रुपये किलो दर होते. फुलकोबी कोल्हापूर, टमाटर नारायणगाव, इंदूर, हवेली, पत्ताकोबी बेळगाव व मूलताई, कोथिंबीर लातूर व नांदेड, गवार हैदराबाद, हिरवी मिरची हावेरी (कर्नाटक), सिमला मिरची सांगली व नाशिक, कारले भंडारा व मंडला (मध्य प्रदेश) येथून येत आहेत. सध्या भाज्यांना मागणी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कांद-बटाटे ३० रुपयांवर स्थिरकेंद्र सरकारच्या निर्बंधानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून कांदे आणि बटाट्याचे भाव किरकोळमध्ये ३० रुपयांवर स्थिर आहेत. कळमना ठोक बाजारात लाल कांदे १७ ते २१ रुपये किलो असून आवक दररोज १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांदे १७ ते १९ रुपये किलो तर आवक १० ते १२ ट्रक आहे. भाज्याच्या किमती वाढताच बटाट्याला मागणी वाढली. किरकोळमध्ये भाव दर्जानुसार २५ ते ३० रुपये किलो आहेत. रविवारी कळमन्यात भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. (प्रतिनिधी)