शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

नागपुरात भाजीपाला व फळांचा तुटवडा : कळमना फळ बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 9:10 PM

कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नसल्याने अडतिया असोसिएशनने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभाजी बाजार शुक्रवारपासून बंद होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नसल्याने अडतिया असोसिएशनने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फळ बाजार बुधवार आणि भाजीपाला बाजार शुक्रवारपासून ३१ मार्चपर्यंत ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.या पार्श्वभूमीवर शहरात फळे आणि भाज्यांचा तुटवडा होणार असून गृहिणींना घरगुती भाज्यांवर भर द्यावा लागणार आहे. विहिरगाव येथील शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, भाज्या तोडणीला आल्यानंतर शेतात ठेवता येत नाही. त्याची विक्री करावीच लागते. अशा स्थितीत सोमवारपर्यंत रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री केली. पण मंगळवारी पोलिसांनी हाकलून लावले. विक्री करणार कुठे हा प्रश्न आहे. त्यामुळे भाज्या घरीच पडून आहेत. कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे.कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, देशाच्या अन्य राज्यातून रविवारपर्यंत फळांची आवक होती. पण शहरात कर्फ्यू असल्याने फळांची विक्री झाली नाही. त्यामुळे बहुतांश फळे विक्रीविना पडून आहेत. फळे नाशवंत असल्याने साठवणूक करता येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना कळमन्यात फळे आणण्यास मनाई केली आहे. मंगळवारी असलेली फळे विकून बुधवारपासून दुकाने बंद ठेवणार आहे, असा निर्णय अडतिया असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे शहरात ३१ मार्चपर्यंत फळे मिळणार नाहीत.कळमन्यातील युवा सब्जी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. पण शहरात कर्फ्यू असल्याने किरकोळ विक्रेते कळमन्यात भाज्या खरेदीसाठी येत नाहीत; शिवाय शहरातील आठवडी बाजारही बंद झाले आहेत. त्यामुळे दररोज भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात शिल्लक असतात. अन्य राज्यातून येणाऱ्या ट्रकची वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे कळमन्यात भाज्या विक्रीसाठी आणू नये, असे स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले आहे. शुक्रवारी बाजाराला सुटी असते. त्यामुळे शनिवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. भाज्या मिळत नसल्याने लोकांमध्ये रोष असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारvegetableभाज्या