शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

वेगळ्या विदर्भासाठी वीरा लढणार स्वबळावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:12 PM

विदर्भ राज्य आघाडीसाठी पुढील वर्ष महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत. परंतु, स्वतंत्र विदर्भाचे आमिष दाखवून विजयी झालेल्या भाजपने या मुद्याला बगल दिली आहे. शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष असून त्यांच्याकडून अपेक्षा करणे कठीण आहे. रिपब्लिकन पक्ष विदर्भाबाबत प्रामाणिक आहे. परंतु, ते स्वत:ची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले असून युती व आघाडीत विभागले आहे. त्यामुळे येत्या निवडणुका स्वबळावर लढणार, असे विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सोमवारी येथे जाहीर केले.

ठळक मुद्देतृतीय वर्धापन दिन : माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भ राज्य आघाडीसाठी पुढील वर्ष महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत. परंतु, स्वतंत्र विदर्भाचे आमिष दाखवून विजयी झालेल्या भाजपने या मुद्याला बगल दिली आहे. शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष असून त्यांच्याकडून अपेक्षा करणे कठीण आहे. रिपब्लिकन पक्ष विदर्भाबाबत प्रामाणिक आहे. परंतु, ते स्वत:ची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले असून युती व आघाडीत विभागले आहे. त्यामुळे येत्या निवडणुका स्वबळावर लढणार, असे विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सोमवारी येथे जाहीर केले.विदर्भ राज्य आघाडीचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी आगामी निवडमुकीमध्ये पक्षाची भूमिका जाहीर केली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष नीरज खांदेवाले, स्वप्नजीत संन्याल, श्रीकांत तराळ, अनिल जवादे, राजू विधाते, एनडीएफबीपीचे सदस्य (बोडोलॅण्ड) लॉरेन्स इसलारी, चिला बसमुतातारी व डॉमॅनिक इसलॅक्मी, पवन सहारे, संदीप रामटेके, सुरेंद्र पारधी, अमोल बोरखेडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य देईल, असे स्वप्न काहींकडून दाखविले जात आहे. मात्र ते शक्य नाही. कारण स्वतंत्र राज्याचे प्रारूप संसदेत वर्षभरापूर्वी मांडावे लागते. आता निवडणुकीला वर्षही शिल्लक नाही. त्यामुळे केवळ थापा देण्याचे उद्योग असल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ मध्ये विदर्भाच्या नावाने गळे काढणारे आता त्या विषयावर बोलतसुद्धा नाही. त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्वतंत्र विदर्भासाठी आपण अनेक पिढ्या खर्ची घातल्या आहेत. आता भावी पिढीच्या भविष्याची चिंता करावी. त्यांच्या हातात नेतृत्व देऊन नवीन राज्यकर्ते घडवू. पर्याय उभा करू. त्यासाठी गावोगावी विदर्भाचा नारा तेज करून उद्याचा आमदार-खासदार आपण घडवू, सुरुवातीला आपल्याला अपयशही येईल. पण खचून जाऊ नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्याना दिला. प्रास्ताविक नीरज खांदेवाले यांनी केले.श्रीहरी अणे यांनी नागपुरातून लढावेदरम्यान वीराचे नागपूर शहर अध्यक्ष कमलेश भगतकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Vidarbhaविदर्भElectionनिवडणूक