शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एकही टाका न लावता केले ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’; ‘टावी’ प्रक्रियेने वृद्धाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 20:16 IST

Nagpur News एकही टाका न लावता व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया नागपुरात यशस्वीरित्या पार पडली. ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टावी) या पद्धतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

नागपूर : ६७ वर्षीय रुग्णाच्या हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीचा ‘एओर्टिक व्हॉल्व्ह’ निकामी झाला होता. रुग्णाला उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचाही त्रास होता. ‘कोमॉर्बिडिटीज’ असल्याने ‘ओपन हार्ट सर्जरी’मध्ये जोखीम होती. दुसरीकडे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचा धोकाही होता. त्यामुळे ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टावी) हाच एकमेव पर्याय होता. रुग्णाकडून याला संमती येताच, एक टाकाही न लावता हृदयात यशस्वी ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ करून रुग्णाला जीवनदान देण्यात आले.

नागपुरात आता ‘टावी’ प्रक्रिया दुर्मिळ राहिली नाही. ‘मेड इन व्हॉल्व्ह’मुळे यातील खर्चही कमी झाला आहे. यामुळे वृद्ध व जोखमीच्या रुग्णांमध्ये या उपचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, या ६७ वर्षीय रुग्णाला थोडे जरी चालले की दम लागायचा. शिवाय, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा अनेक वर्षांपासून त्रास होता. या गंभीर आजारांमुळे ‘ओपन हार्ट सर्जरी’ शक्य नव्हती. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात हा रुग्ण उपचारासाठी आल्यावर डॉक्टरांनी तपासून ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ करण्याचा सल्ला दिला. रुग्णाकडून संमती येताच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनावणे यांनी ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी, डॉ. अमेय बीडकर, कार्डियोव्हॅस्कुलर सर्जन डॉ. समित पाठक, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. पंकज चौधरी जैन यांच्या चमूने सहकार्य केले. या उपचारानंतर रुग्णाला तीन दिवसात रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

- अशी होते प्रक्रिया

डॉ. बीडकर यांनी सांगितले, ‘टावी’मध्ये ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टीप्रमाणे हातातून एक नळी (कॅथेटर) रक्तवाहिनीद्वारे हृदयापर्यंत नेण्यात येते. पेसमेकरद्वारे हृदय स्थिर केले जाते. कॅथेटरद्वारे नेण्यात आलेल्या व्हॉल्व्हला हृदयात उघडण्यात येते. व्हॉल्व्ह स्थिर झाला की, कॅथेटर काढून घेतली जाते. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेत भूल देण्याची गरज पडत नाही. चीरही दिली जात नाही.

- ‘मेड इन व्हॉल्व्ह’मुळे खर्च कमी

डॉ. सोनावणे यांनी सांगितले, ‘टावी’ प्रक्रियेतून टाकलेला व्हॉल्व्ह हा साधारण १० ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी असतो. पुन्हा ‘व्हॉल्व्ह’ बदलण्याची गरज पडू शकते. त्यामुळे ७५ किंवा त्यापेक्षा जास्त वय आणि जोखमीच्याच रुग्णांनी ही प्रक्रिया करायला हवी. तरुणांसाठी ही प्रक्रिया नाही. ‘मेड इन व्हॉल्व्ह’मुळे याचा खर्च कमी झाला आहे.

 

- जोखीम असणाऱ्यांसाठी वरदानच

‘टावी’ ही प्रक्रिया ज्यांना ओपन हार्ट सर्जरीची जोखीम आहे, त्यांच्यासाठी वरदानच आहे. हृदयशास्त्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता चिरफाड न करताही व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शक्य झाले आहे.

- डॉ. अमेय बीडकर, हृदयरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य