शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वादळी पावसाचा मार, दिवसाच अंधार; रब्बी पिके गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 11:00 IST

आणखी दोन दिवस पावसाचेच; वळवाच्या पावसाने नागपूरसह विदर्भात दाणादाण

नागपूर : सकाळपासून उन्हाचा तडाखा, दुपारी ऊन-सावलीचा खेळ आणि दुपारनंतर ४ वाजताच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आल्याने दिवसाच अंधार पडला. वादळी वारा सुटून बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळला. काही भागांत झाडे उन्मळून पडली. अकाली झालेल्या पावसामुळे भालेभाज्यांसह शेतात कापून ठेवलेला गहू, चना भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत पाऊस सुरू झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागानुसार मध्य प्रदेशपासून ते दक्षिण तामिलनाडूपर्यंत विदर्भ मराठवाडा, कर्नाटकमध्ये हवेत ‘डिस्कंटिन्यूटी’ची चिन्हे आहेत. सोबतच राजस्थानमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळेच नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता आहे. नागपुरात ९ एप्रिलपर्यंत आकाशात ढगांची गर्दी राहील व पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी नागपुरात सायंकाळी ५.३० पर्यंत ११.८ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भात बुलढाणा ३४ मिमी, अमरावती ६ मिमी, वर्धा-यवतमाळ ५ मिमी व अकोला येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे रात्रीच्या तापमानात काहीअंशी घट झाली. नागपुरात रात्रीचे तापमान १.६ अंशाने कमी होऊन २१.९ अंशांवर आले.

२४ तासांतच ७० टक्के पावसाची नोंद

- एप्रिल महिन्यात नागपुरात सरासरी १९.४ मिमी पाऊस पडतो. मात्र, गुरुवारसह शुक्रवारीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने १३.६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने एप्रिलचा ७० टक्के कोटा पूर्ण केला.

एप्रिलच्या शेवटी सूर्य तळपणार

- हवामान विभागानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नागपुरात सूर्य तळपण्याची चिन्हे आहेत. जूनपर्यंत प्रचंड उकाडा राहील. मार्चमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पारा ३९ अंशांवरच स्थिरावला.

भंडारा जिल्ह्यातील भंडारासह, मोहाडी, पवनी, तुमसर या तालुक्यांतील अनेक गावांना शुक्रवारच्या अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेतमालाचे विशेषतः भाजीपाल्याचे अधिक नुकसान झाले. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, तिरोडा, सडक अर्जुनी, गोंदिया परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळामुळे काही दुकाने व घरांचे छत उडाल्याची माहिती आहे.

अमरावती, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली. अमरावतीत शुक्रवारी दुपारी १ वाजता अचानक आभाळ भरून आले व सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटात तासभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात शुक्रवारी वादळासह तासभर पाऊस पडला.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सोंडी गावानजीक असलेल्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काही भागात उभा असलेल्या गहू पिकाचे पावसामुळे नुकसान झाले तर भाजीपाला पिकालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत पावसाने मोठे नुकसान केले. नेर तालुक्यात गारपीट झाली. तर महागाव तालुक्यात वीज पडून तीन जनावरे ठार झाल्याची घटना घडली. काही ठिकाणी टिनपत्रे उडून गेली. यात उन्हाळी भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी यवतमाळ, नेर, बाभूळगाव आणि महागाव तालुक्यात दुपारी पाऊस बरसला. यात नेर मधून वाहणाऱ्या मिलमिली नदीला धुवाधार पावसामुळे पूर आला. याठिकाणी बोराच्या आकाराची गार बरसली. महागाव तालुक्यातील पेढी आणि संगम याठिकाणी वीज कोसळून एक गाय आणि दोन बैल ठार झाले. या पावसाने काढणीला आलेला गहू, कांदा, फुल आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

  • कुही तालुक्यातील नवेगावरोडवर झाडे पडली वादळी पावसाने बुढ्ढे ले आउट नवेगाव रोडवरील झाडे पडली. शेतकऱ्यांनी शेतात वाळायला ठेवलेली लाल मिरची पावसामुळे भिजली.
  • कळमेश्वर तालुक्यात तोंडाखेैरी, धापेवाडा, वाढोणा, झुनकी, बोरगाव आदी भागात शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेला चना भिजून नुकसान झाले.
  • सावनेर भागात शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान झाले.
टॅग्स :weatherहवामानRainपाऊसVidarbhaविदर्भ