शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

वादळी पावसाचा मार, दिवसाच अंधार; रब्बी पिके गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 11:00 IST

आणखी दोन दिवस पावसाचेच; वळवाच्या पावसाने नागपूरसह विदर्भात दाणादाण

नागपूर : सकाळपासून उन्हाचा तडाखा, दुपारी ऊन-सावलीचा खेळ आणि दुपारनंतर ४ वाजताच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आल्याने दिवसाच अंधार पडला. वादळी वारा सुटून बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळला. काही भागांत झाडे उन्मळून पडली. अकाली झालेल्या पावसामुळे भालेभाज्यांसह शेतात कापून ठेवलेला गहू, चना भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत पाऊस सुरू झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागानुसार मध्य प्रदेशपासून ते दक्षिण तामिलनाडूपर्यंत विदर्भ मराठवाडा, कर्नाटकमध्ये हवेत ‘डिस्कंटिन्यूटी’ची चिन्हे आहेत. सोबतच राजस्थानमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळेच नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता आहे. नागपुरात ९ एप्रिलपर्यंत आकाशात ढगांची गर्दी राहील व पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी नागपुरात सायंकाळी ५.३० पर्यंत ११.८ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भात बुलढाणा ३४ मिमी, अमरावती ६ मिमी, वर्धा-यवतमाळ ५ मिमी व अकोला येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे रात्रीच्या तापमानात काहीअंशी घट झाली. नागपुरात रात्रीचे तापमान १.६ अंशाने कमी होऊन २१.९ अंशांवर आले.

२४ तासांतच ७० टक्के पावसाची नोंद

- एप्रिल महिन्यात नागपुरात सरासरी १९.४ मिमी पाऊस पडतो. मात्र, गुरुवारसह शुक्रवारीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने १३.६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने एप्रिलचा ७० टक्के कोटा पूर्ण केला.

एप्रिलच्या शेवटी सूर्य तळपणार

- हवामान विभागानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नागपुरात सूर्य तळपण्याची चिन्हे आहेत. जूनपर्यंत प्रचंड उकाडा राहील. मार्चमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पारा ३९ अंशांवरच स्थिरावला.

भंडारा जिल्ह्यातील भंडारासह, मोहाडी, पवनी, तुमसर या तालुक्यांतील अनेक गावांना शुक्रवारच्या अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेतमालाचे विशेषतः भाजीपाल्याचे अधिक नुकसान झाले. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, तिरोडा, सडक अर्जुनी, गोंदिया परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळामुळे काही दुकाने व घरांचे छत उडाल्याची माहिती आहे.

अमरावती, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली. अमरावतीत शुक्रवारी दुपारी १ वाजता अचानक आभाळ भरून आले व सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटात तासभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात शुक्रवारी वादळासह तासभर पाऊस पडला.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सोंडी गावानजीक असलेल्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काही भागात उभा असलेल्या गहू पिकाचे पावसामुळे नुकसान झाले तर भाजीपाला पिकालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत पावसाने मोठे नुकसान केले. नेर तालुक्यात गारपीट झाली. तर महागाव तालुक्यात वीज पडून तीन जनावरे ठार झाल्याची घटना घडली. काही ठिकाणी टिनपत्रे उडून गेली. यात उन्हाळी भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी यवतमाळ, नेर, बाभूळगाव आणि महागाव तालुक्यात दुपारी पाऊस बरसला. यात नेर मधून वाहणाऱ्या मिलमिली नदीला धुवाधार पावसामुळे पूर आला. याठिकाणी बोराच्या आकाराची गार बरसली. महागाव तालुक्यातील पेढी आणि संगम याठिकाणी वीज कोसळून एक गाय आणि दोन बैल ठार झाले. या पावसाने काढणीला आलेला गहू, कांदा, फुल आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

  • कुही तालुक्यातील नवेगावरोडवर झाडे पडली वादळी पावसाने बुढ्ढे ले आउट नवेगाव रोडवरील झाडे पडली. शेतकऱ्यांनी शेतात वाळायला ठेवलेली लाल मिरची पावसामुळे भिजली.
  • कळमेश्वर तालुक्यात तोंडाखेैरी, धापेवाडा, वाढोणा, झुनकी, बोरगाव आदी भागात शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेला चना भिजून नुकसान झाले.
  • सावनेर भागात शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान झाले.
टॅग्स :weatherहवामानRainपाऊसVidarbhaविदर्भ