शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वादळी पावसाचा मार, दिवसाच अंधार; रब्बी पिके गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 11:00 IST

आणखी दोन दिवस पावसाचेच; वळवाच्या पावसाने नागपूरसह विदर्भात दाणादाण

नागपूर : सकाळपासून उन्हाचा तडाखा, दुपारी ऊन-सावलीचा खेळ आणि दुपारनंतर ४ वाजताच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आल्याने दिवसाच अंधार पडला. वादळी वारा सुटून बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळला. काही भागांत झाडे उन्मळून पडली. अकाली झालेल्या पावसामुळे भालेभाज्यांसह शेतात कापून ठेवलेला गहू, चना भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत पाऊस सुरू झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागानुसार मध्य प्रदेशपासून ते दक्षिण तामिलनाडूपर्यंत विदर्भ मराठवाडा, कर्नाटकमध्ये हवेत ‘डिस्कंटिन्यूटी’ची चिन्हे आहेत. सोबतच राजस्थानमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळेच नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता आहे. नागपुरात ९ एप्रिलपर्यंत आकाशात ढगांची गर्दी राहील व पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी नागपुरात सायंकाळी ५.३० पर्यंत ११.८ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भात बुलढाणा ३४ मिमी, अमरावती ६ मिमी, वर्धा-यवतमाळ ५ मिमी व अकोला येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे रात्रीच्या तापमानात काहीअंशी घट झाली. नागपुरात रात्रीचे तापमान १.६ अंशाने कमी होऊन २१.९ अंशांवर आले.

२४ तासांतच ७० टक्के पावसाची नोंद

- एप्रिल महिन्यात नागपुरात सरासरी १९.४ मिमी पाऊस पडतो. मात्र, गुरुवारसह शुक्रवारीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने १३.६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने एप्रिलचा ७० टक्के कोटा पूर्ण केला.

एप्रिलच्या शेवटी सूर्य तळपणार

- हवामान विभागानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नागपुरात सूर्य तळपण्याची चिन्हे आहेत. जूनपर्यंत प्रचंड उकाडा राहील. मार्चमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पारा ३९ अंशांवरच स्थिरावला.

भंडारा जिल्ह्यातील भंडारासह, मोहाडी, पवनी, तुमसर या तालुक्यांतील अनेक गावांना शुक्रवारच्या अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेतमालाचे विशेषतः भाजीपाल्याचे अधिक नुकसान झाले. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, तिरोडा, सडक अर्जुनी, गोंदिया परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळामुळे काही दुकाने व घरांचे छत उडाल्याची माहिती आहे.

अमरावती, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली. अमरावतीत शुक्रवारी दुपारी १ वाजता अचानक आभाळ भरून आले व सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटात तासभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात शुक्रवारी वादळासह तासभर पाऊस पडला.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सोंडी गावानजीक असलेल्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काही भागात उभा असलेल्या गहू पिकाचे पावसामुळे नुकसान झाले तर भाजीपाला पिकालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत पावसाने मोठे नुकसान केले. नेर तालुक्यात गारपीट झाली. तर महागाव तालुक्यात वीज पडून तीन जनावरे ठार झाल्याची घटना घडली. काही ठिकाणी टिनपत्रे उडून गेली. यात उन्हाळी भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी यवतमाळ, नेर, बाभूळगाव आणि महागाव तालुक्यात दुपारी पाऊस बरसला. यात नेर मधून वाहणाऱ्या मिलमिली नदीला धुवाधार पावसामुळे पूर आला. याठिकाणी बोराच्या आकाराची गार बरसली. महागाव तालुक्यातील पेढी आणि संगम याठिकाणी वीज कोसळून एक गाय आणि दोन बैल ठार झाले. या पावसाने काढणीला आलेला गहू, कांदा, फुल आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

  • कुही तालुक्यातील नवेगावरोडवर झाडे पडली वादळी पावसाने बुढ्ढे ले आउट नवेगाव रोडवरील झाडे पडली. शेतकऱ्यांनी शेतात वाळायला ठेवलेली लाल मिरची पावसामुळे भिजली.
  • कळमेश्वर तालुक्यात तोंडाखेैरी, धापेवाडा, वाढोणा, झुनकी, बोरगाव आदी भागात शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेला चना भिजून नुकसान झाले.
  • सावनेर भागात शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान झाले.
टॅग्स :weatherहवामानRainपाऊसVidarbhaविदर्भ