शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवस पाच विधानं; नेमकं काय आहे गडकरींच्या मनात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 15:47 IST

गडकरींच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

मुंबई: केंद्रीय वाहतूक मंत्री गेल्या आठवड्यात त्यांच्या विधानांमुळे चर्चेत राहिले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागल्यानंतर गडकरींनी केलेली विधानं चर्चेत होती. विशेष म्हणजे यातील अनेक विधानं पक्ष नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधणारी होती. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदासाठी संघाकडून गडकरींचं नाव पुढे केलं जाणार असल्याची चर्चा सुरू असताना ही विधानं करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पडद्यामागून सूत्र हलवण्यात नितीन गडकरी प्रवीण समजले जातात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये गडकरींच्या बदललेल्या सुरांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गडकरी पक्ष नेतृत्त्वावर नाराज आहेत की त्यांच्या मनात वेगळं काही आहे, असे प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांसहित सर्वांनाच पडले आहेत. गडकरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अगदी उत्तम संबंध आहेत. मात्र मोदी-शहा ही जोडगोळी संघाला फार किंमत देत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांमधील गडकरींच्या विधानांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. 

1. मला नेहरुंची भाषणं आवडतात'यंत्रणा सुधारण्यासाठी दुसऱ्यांकडे बोटं का दाखवता? स्वत:कडे बोट का दाखवत नाही? जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, तर लोकसंख्या आहे. इथल्या प्रत्येकाचा प्रश्न, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. नेहरुंची भाषणं मला खूप आवडतात. त्यामुळे देशासमोर समस्या निर्माण होऊ नये, याची काळजी मी घेऊ शकतो.'

2. पराभवाला जबाबदार कोण? 24 डिसेंबरला एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, 'जर मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि माझे खासदार आणि आमदार चांगलं काम करत नसतील, तर जबाबदार कोण?'

3. यशाचे दावेदार अनेक, अपयश मात्र अनाथपुण्यातील एका कार्यक्रमात गडकरींनी यश-अपयशावर सूचक भाष्य केलं. गडकरी म्हणाले, 'यशाचे अनेक दावेदार असतात. मात्र अपयश आल्यावर कोणीच सोबत नसतं. यशाचं श्रेय घेण्यासाठी लोकांची रांग लागते. मात्र अपयशाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. सगळेच एकमेकांकडे बोट दाखवतात.'

4. जिथे आहे, तिथे आनंदी आहेपंतप्रधानपदासाठी आपण दावेदार नसल्याचं स्पष्ट करताना आपण जिथे आहोत, तिथे आनंदी असल्याचं म्हटलं होतं. 'मला गंगा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. ऍक्सेस हायवे कंट्रोलची उभारणी करायची आहे. चारधाम रोड आणि इतर प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. मी जे काम करतो आहे, तिथे आनंदी आहे. मला हाती घेतलेली कामं पूर्ण करायची आहेत.'

5. भाजपाच्या काही नेत्यांनी तोंड बंद ठेवायला हवंनितीन गडकरींनी एका मुलाखतीत पक्षातील काही नेत्यांनी तोंड बंद ठेवायला हवं, असं म्हटलं. 'आमच्याकडे इतके नेते आहेत. त्यांना टीव्ही पत्रकारांसमोर बोलायला आवडतं. त्यामुळे त्यांना काहीतरी काम देण्याची आवश्यकता आहे. काही नेत्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घालून त्यांचं तोंड बंद करण्याची गरज आहे.'

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू