शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

पाच दिवस पाच विधानं; नेमकं काय आहे गडकरींच्या मनात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 15:47 IST

गडकरींच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

मुंबई: केंद्रीय वाहतूक मंत्री गेल्या आठवड्यात त्यांच्या विधानांमुळे चर्चेत राहिले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागल्यानंतर गडकरींनी केलेली विधानं चर्चेत होती. विशेष म्हणजे यातील अनेक विधानं पक्ष नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधणारी होती. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदासाठी संघाकडून गडकरींचं नाव पुढे केलं जाणार असल्याची चर्चा सुरू असताना ही विधानं करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पडद्यामागून सूत्र हलवण्यात नितीन गडकरी प्रवीण समजले जातात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये गडकरींच्या बदललेल्या सुरांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गडकरी पक्ष नेतृत्त्वावर नाराज आहेत की त्यांच्या मनात वेगळं काही आहे, असे प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांसहित सर्वांनाच पडले आहेत. गडकरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अगदी उत्तम संबंध आहेत. मात्र मोदी-शहा ही जोडगोळी संघाला फार किंमत देत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांमधील गडकरींच्या विधानांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. 

1. मला नेहरुंची भाषणं आवडतात'यंत्रणा सुधारण्यासाठी दुसऱ्यांकडे बोटं का दाखवता? स्वत:कडे बोट का दाखवत नाही? जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, तर लोकसंख्या आहे. इथल्या प्रत्येकाचा प्रश्न, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. नेहरुंची भाषणं मला खूप आवडतात. त्यामुळे देशासमोर समस्या निर्माण होऊ नये, याची काळजी मी घेऊ शकतो.'

2. पराभवाला जबाबदार कोण? 24 डिसेंबरला एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, 'जर मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि माझे खासदार आणि आमदार चांगलं काम करत नसतील, तर जबाबदार कोण?'

3. यशाचे दावेदार अनेक, अपयश मात्र अनाथपुण्यातील एका कार्यक्रमात गडकरींनी यश-अपयशावर सूचक भाष्य केलं. गडकरी म्हणाले, 'यशाचे अनेक दावेदार असतात. मात्र अपयश आल्यावर कोणीच सोबत नसतं. यशाचं श्रेय घेण्यासाठी लोकांची रांग लागते. मात्र अपयशाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. सगळेच एकमेकांकडे बोट दाखवतात.'

4. जिथे आहे, तिथे आनंदी आहेपंतप्रधानपदासाठी आपण दावेदार नसल्याचं स्पष्ट करताना आपण जिथे आहोत, तिथे आनंदी असल्याचं म्हटलं होतं. 'मला गंगा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. ऍक्सेस हायवे कंट्रोलची उभारणी करायची आहे. चारधाम रोड आणि इतर प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. मी जे काम करतो आहे, तिथे आनंदी आहे. मला हाती घेतलेली कामं पूर्ण करायची आहेत.'

5. भाजपाच्या काही नेत्यांनी तोंड बंद ठेवायला हवंनितीन गडकरींनी एका मुलाखतीत पक्षातील काही नेत्यांनी तोंड बंद ठेवायला हवं, असं म्हटलं. 'आमच्याकडे इतके नेते आहेत. त्यांना टीव्ही पत्रकारांसमोर बोलायला आवडतं. त्यामुळे त्यांना काहीतरी काम देण्याची आवश्यकता आहे. काही नेत्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घालून त्यांचं तोंड बंद करण्याची गरज आहे.'

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू