शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ४६ गावे होणार टंचाईमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:26 AM

राज्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी घरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु तांत्रिक अडचणीपोटी यातून १३ गावे वगळण्यात आली. उर्वरित ४६ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांची माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी घरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु तांत्रिक अडचणीपोटी यातून १३ गावे वगळण्यात आली. उर्वरित ४६ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला तरी, यातील ८ गावे मोठी असल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे नळयोजनेची कामे सुरू आहेत. तसेच ३ गावांमध्ये इतर योजनेतून नळयोजनेची कामे सुरू असल्याने एकूण ११ गावे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून वगळण्यात आली. तसेच रामटेक अंतर्गत मौजा पचखेडी येथे प्रकल्पित लोकसंख्या १००० पेक्षा कमी असल्याने ही कामे सादरीकरणात शासनातर्फे रद्द करण्यात आली. अशी १३ गावे कार्यक्रमातून कमी करण्यात आली. या योजनेसंदर्भात ४३ गावांचे सादरीकरण शासन समितीसमोर करण्यात आले आहे. यातील ३० गावांना शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. २४ योजनांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहे. तर मौजा मानेगाव, वाघोडा, खंडाळा खुर्द येथील कामे सुरू करण्यात आली आहेत. मंजूर ३० कामावर १९.५८ लाख रुपये खर्च अंदाजित आहे. उर्वरित १३ कामांवर ७.५२ लाख रुपये अंदाजित खर्च आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनाकडून ५१.४४ लाख निधी जि.प.ला प्राप्त झाला असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर