शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उद्धव ठाकरे, गद्दारांना समजून घ्या, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता; जयंत पाटलांनी शेर सुनावताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:25 IST

Vajramuth Sabha in Nagpur: महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली, असा आरोप जयंत पाटलांनी केला.

विदर्भाने एकदा का निर्णय केला की तो देशात पोहोचतो. विदर्भवासियांची ही वज्रमुठ राज्य सरकारला विचारतेय की गेल्या १० महिन्यांत काय दिवे लावलेत. या सरकारने दिले काय, कोणते नवे प्रकल्प आणले. असे कोणते निर्णय घेण्यात आले, जेणेकरून विदर्भवासियांना वाटेल की आपला नेता सरकारमध्ये काम करतोय, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

नागपुरातील वज्रमुठ सभेत ते बोलत होते. महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली. सत्तेत आल्या आल्या अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या कामांना स्थगिती दिली. कोर्टात गेलो, कोर्टाने आदेश दिले तरी हे नतद्रष्ट सरकार आजही कामांवरील स्थगिती उठविण्यास तयार नाहीय, असा आरोप पाटील यांनी केला.

मोठमोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. परंतू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या मालकांना साधे विचारायलाही गेले नाहीत. कारण शेजारच्या राज्याच्या मालकाला राग आला तर काय होईल अशा विचारात हे लोक आहेत. ज्यांनी ज्यांनी या सरकारवर विडंबनात्मक गाणी केली, कृती केली त्यांना तुरंगात टाकण्याचे काम सरकार करत आहे. आपल्या विरोधी बोलेल त्याला सर्वप्रकारचा त्रास द्यायचा याव्यतिरीक्त या सरकारने काहीही काम केलेले नाही, असा आरोप सरकारवर केला. 

महाराष्ट्रात आम्ही आजवर शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला नव्हता. परंतू राज्यपाल दिवसाढवळ्या शिवाजी महाराजांचा अवमान करत होते. हे बहुजनांचे सरकार नाहीय हे जनतेला माहिती आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय आता कधी निवडणुकी घेतील. परंतू हे सरकार निवडणूक घेत नाहीय. लोक कशामुळे गोळा होतील, लोकं जमतील कशामुळे हे पाहून सरकार गर्दी जमवत आहे. महाराष्ट्र दुधखुळा नाहीय, असा टोला पाटील यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे जे सोडून गेलेत त्या लोकांना गद्दार म्हणतात. त्यांना मी सांगू इच्छितो, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता... काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबुरी असेल समजून घ्या आता काय करणार... असे म्हणत सगळ्या शिवसैनिकांना मातोश्री आणि तुमचा जो आदर आहे तो कायम आहे, असे जयंत पाटलांनी म्हणताच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या चेहऱ्यावर हसू आले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस