शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

उद्धव ठाकरे, गद्दारांना समजून घ्या, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता; जयंत पाटलांनी शेर सुनावताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:25 IST

Vajramuth Sabha in Nagpur: महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली, असा आरोप जयंत पाटलांनी केला.

विदर्भाने एकदा का निर्णय केला की तो देशात पोहोचतो. विदर्भवासियांची ही वज्रमुठ राज्य सरकारला विचारतेय की गेल्या १० महिन्यांत काय दिवे लावलेत. या सरकारने दिले काय, कोणते नवे प्रकल्प आणले. असे कोणते निर्णय घेण्यात आले, जेणेकरून विदर्भवासियांना वाटेल की आपला नेता सरकारमध्ये काम करतोय, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

नागपुरातील वज्रमुठ सभेत ते बोलत होते. महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली. सत्तेत आल्या आल्या अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या कामांना स्थगिती दिली. कोर्टात गेलो, कोर्टाने आदेश दिले तरी हे नतद्रष्ट सरकार आजही कामांवरील स्थगिती उठविण्यास तयार नाहीय, असा आरोप पाटील यांनी केला.

मोठमोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. परंतू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या मालकांना साधे विचारायलाही गेले नाहीत. कारण शेजारच्या राज्याच्या मालकाला राग आला तर काय होईल अशा विचारात हे लोक आहेत. ज्यांनी ज्यांनी या सरकारवर विडंबनात्मक गाणी केली, कृती केली त्यांना तुरंगात टाकण्याचे काम सरकार करत आहे. आपल्या विरोधी बोलेल त्याला सर्वप्रकारचा त्रास द्यायचा याव्यतिरीक्त या सरकारने काहीही काम केलेले नाही, असा आरोप सरकारवर केला. 

महाराष्ट्रात आम्ही आजवर शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला नव्हता. परंतू राज्यपाल दिवसाढवळ्या शिवाजी महाराजांचा अवमान करत होते. हे बहुजनांचे सरकार नाहीय हे जनतेला माहिती आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय आता कधी निवडणुकी घेतील. परंतू हे सरकार निवडणूक घेत नाहीय. लोक कशामुळे गोळा होतील, लोकं जमतील कशामुळे हे पाहून सरकार गर्दी जमवत आहे. महाराष्ट्र दुधखुळा नाहीय, असा टोला पाटील यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे जे सोडून गेलेत त्या लोकांना गद्दार म्हणतात. त्यांना मी सांगू इच्छितो, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता... काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबुरी असेल समजून घ्या आता काय करणार... असे म्हणत सगळ्या शिवसैनिकांना मातोश्री आणि तुमचा जो आदर आहे तो कायम आहे, असे जयंत पाटलांनी म्हणताच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या चेहऱ्यावर हसू आले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस