शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

उद्धव ठाकरे, गद्दारांना समजून घ्या, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता; जयंत पाटलांनी शेर सुनावताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:25 IST

Vajramuth Sabha in Nagpur: महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली, असा आरोप जयंत पाटलांनी केला.

विदर्भाने एकदा का निर्णय केला की तो देशात पोहोचतो. विदर्भवासियांची ही वज्रमुठ राज्य सरकारला विचारतेय की गेल्या १० महिन्यांत काय दिवे लावलेत. या सरकारने दिले काय, कोणते नवे प्रकल्प आणले. असे कोणते निर्णय घेण्यात आले, जेणेकरून विदर्भवासियांना वाटेल की आपला नेता सरकारमध्ये काम करतोय, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

नागपुरातील वज्रमुठ सभेत ते बोलत होते. महाराष्ट्राला एकच लक्षात आलेय या सरकाने सुडाचे राजकारण दिलेय. हे महाराष्ट्रात सतत सुरु आहे. आणखी एक गोष्ट सरकारने केली. सत्तेत आल्या आल्या अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या कामांना स्थगिती दिली. कोर्टात गेलो, कोर्टाने आदेश दिले तरी हे नतद्रष्ट सरकार आजही कामांवरील स्थगिती उठविण्यास तयार नाहीय, असा आरोप पाटील यांनी केला.

मोठमोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. परंतू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या मालकांना साधे विचारायलाही गेले नाहीत. कारण शेजारच्या राज्याच्या मालकाला राग आला तर काय होईल अशा विचारात हे लोक आहेत. ज्यांनी ज्यांनी या सरकारवर विडंबनात्मक गाणी केली, कृती केली त्यांना तुरंगात टाकण्याचे काम सरकार करत आहे. आपल्या विरोधी बोलेल त्याला सर्वप्रकारचा त्रास द्यायचा याव्यतिरीक्त या सरकारने काहीही काम केलेले नाही, असा आरोप सरकारवर केला. 

महाराष्ट्रात आम्ही आजवर शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला नव्हता. परंतू राज्यपाल दिवसाढवळ्या शिवाजी महाराजांचा अवमान करत होते. हे बहुजनांचे सरकार नाहीय हे जनतेला माहिती आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय आता कधी निवडणुकी घेतील. परंतू हे सरकार निवडणूक घेत नाहीय. लोक कशामुळे गोळा होतील, लोकं जमतील कशामुळे हे पाहून सरकार गर्दी जमवत आहे. महाराष्ट्र दुधखुळा नाहीय, असा टोला पाटील यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे जे सोडून गेलेत त्या लोकांना गद्दार म्हणतात. त्यांना मी सांगू इच्छितो, कुछ तो मजबुरी रही होंगी, युही कोई बेवफा नही होता... काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबुरी असेल समजून घ्या आता काय करणार... असे म्हणत सगळ्या शिवसैनिकांना मातोश्री आणि तुमचा जो आदर आहे तो कायम आहे, असे जयंत पाटलांनी म्हणताच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या चेहऱ्यावर हसू आले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस