शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मग चमचे का वाजू लागले?; ठाकरेंचा भाजपला बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 16:21 IST

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेला मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन त्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता.

नागपूर : धारावी पुनर्विकासावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप असा जोरदार राजकीय सामना रंगत आहे. या पुनर्विकासाच्या माध्यमातून सरकार केवळ अदानी समूहाच्या फायद्याचा विचार करत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं नुकताच मुंबईत मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. या आरोपाला आज उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? धारावीच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे निर्णय घेणार असाल, तर ते आम्ही कसे सहन करू? या सरकारसारखा उघडा नागडा कारभार आधीच्या कुठल्याच सरकारने महाराष्ट्रात केलेला नाही. धारावीतील मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं आहे.

आरक्षणावरूनही टीकास्त्र

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून या प्रश्नावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. "ज्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेतली त्यांनी चर्चा करण्यापेक्षा इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या. कोणत्याही समाजाचं तसूभरही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार आहात, हे तुम्ही आम्हाला सांगायला हवं, चर्चा कसली करताहेत?" अशी टीका उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

दरम्यान, आमचा सुतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावत असाल, तर मग आमच्याकडे तुमच्याविरोधात पुरावे असूनही तुम्ही कारवाई का करत नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAdaniअदानीdharavi-acधारावीBJPभाजपा