शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मग चमचे का वाजू लागले?; ठाकरेंचा भाजपला बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 16:21 IST

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेला मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन त्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता.

नागपूर : धारावी पुनर्विकासावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप असा जोरदार राजकीय सामना रंगत आहे. या पुनर्विकासाच्या माध्यमातून सरकार केवळ अदानी समूहाच्या फायद्याचा विचार करत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं नुकताच मुंबईत मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. या आरोपाला आज उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? धारावीच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे निर्णय घेणार असाल, तर ते आम्ही कसे सहन करू? या सरकारसारखा उघडा नागडा कारभार आधीच्या कुठल्याच सरकारने महाराष्ट्रात केलेला नाही. धारावीतील मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं आहे.

आरक्षणावरूनही टीकास्त्र

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून या प्रश्नावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. "ज्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेतली त्यांनी चर्चा करण्यापेक्षा इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या. कोणत्याही समाजाचं तसूभरही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार आहात, हे तुम्ही आम्हाला सांगायला हवं, चर्चा कसली करताहेत?" अशी टीका उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

दरम्यान, आमचा सुतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावत असाल, तर मग आमच्याकडे तुमच्याविरोधात पुरावे असूनही तुम्ही कारवाई का करत नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAdaniअदानीdharavi-acधारावीBJPभाजपा