शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपुरात १८ तासात हत्येचे दोन गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 22:16 IST

Murder cases , crime news जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १८ तासात हत्येचे दोन गुन्हे घडले. पहिली घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास रिपब्लिकन नगरात, तर दुसरी घटना शुक्रवारी दुपारी वसनशहा चाैकाजवळ घडली.

ठळक मुद्देजरीपटका थरारला; पहिल्या गुन्ह्यात तीन भावांसह वडीलही आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १८ तासात हत्येचे दोन गुन्हे घडले. पहिली घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास रिपब्लिकन नगरात, तर दुसरी घटना शुक्रवारी दुपारी वसनशहा चाैकाजवळ घडली. यामुळे जरीपटक्यात थरार निर्माण झाला आहे.

जरीपटक्यातील रिपब्लिकन नगरात राहणारा रोहित किसनाजी वाघमारे (वय २५) आणि त्याचा चुलत भाऊ पियुष किशोर भैसारे (२४, रा. लष्करीबाग) हे दोघे गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास जात असताना, त्यांना रिपब्लिकन नगरातच राहणारे देवीदास जेठाजी जांभूळकर (६०), तसेच त्यांची मुले हर्षद (३४), भूपेंद्र (३३) आणि शैलेंद्र (२६) यांनी रोखले. जुन्या भांडणाचा विषय काढून जांभूळकर बाप-लेकांनी वाघमारे आणि भैसारेला मारहाण केली. ते आपल्या साथीदारांना फोन करून बोलावत असल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपी शैलेंद्र जांभूळकरने वाघमारेवर चाकूहल्ला चढवला. त्याच्या मदतीला धावलेल्या भैसारेवर देवीदास जांभूळकरने लोखंडी सळाखीने हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला.

माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी धावले. तोवर आजुबाजूच्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पण तेथे डॉक्टरांनी वाघमारेला मृत घोषित केले. पोलिसांनी भैसारेच्या जबाबावरून आरोपी जांभूळकर बाप-लेकांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा ६ एप्रिलपर्यंत पीसीआर मिळवला.

आरोपी जांभूळकर आणि मृत वाघमारे यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. होळीच्या दिवशी जांभूळकरच्या घराजवळ लघुशंका केल्यावरून या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले. वाघमारे अवैध दारूविक्री करायचा. तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. तो धोका करेल, असा संशय असल्याने आरोपी बाप-लेकांनी त्याचा गेम केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

कॅटरर्सची दिवसाढवळ्या हत्या

हत्येची दुसरी घटना शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास वासनशहा चौकाजवळ घडली. जितू गरगानी नामक केटरिंग व्यावसायिकावर अज्ञात आरोपींनी घातक शस्त्राने हल्ला चढवून त्याची हत्या केली. या हत्याकांडाचे कारण वृत्त लिहीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. जितूचे कुणासोबत वैमनस्य नव्हते. त्याला आई आणि दोन बहिणी आहेत. तो सरळ, साध्या वृत्तीचा होता. त्यामुळे त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली, असा प्रश्न आहे. रात्रीपर्यंत या प्रकरणात दोन संशयितांची नावे पुढे आली असली तरी, वृत्त लिहीपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती. लवकरच आरोपींना अटक करू, असे यासंबंधाने ठाणेदार नितीन फटांगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर