शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

१९ दिवसांच्या बाळावर केल्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 19:34 IST

Nagpur News ६०० ग्रॅम वजनाच्या १९ दिवसांच्या बाळावर ९ दिवसांच्या अंतराने दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. यातील एक शस्त्रक्रिया पोटावर तर दुसरी हृदयाजवळ करण्यात आली.

ठळक मुद्दे केवळ ६०० ग्रॅमचे होते बाळ डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नाने मिळाले जीवनदान

नागपूर : अकाली जन्माला आलेल्या जुळ्या बाळांमधील एका ६०० ग्रॅम वजनाच्या १९ दिवसांच्या बाळावर ९ दिवसांच्या अंतराने दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. यातील एक शस्त्रक्रिया पोटावर तर दुसरी हृदयाजवळ करण्यात आली. इतक्या कमी वजनाच्या व कमी दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे नागपुरातील वैद्यकीय इतिहासामधील अलीकडच्या काळातील हे पहिले उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील एका महिलेच्या लग्नाला १० वर्षे होऊनही मूल होत नव्हते. यामुळे त्या दाम्पत्याने ‘आयव्हीएफ’ करण्याचा निर्णय घेतला. स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर यांच्या मार्गदर्शनात या उपचार पद्धतीला यश आले. जुळी बाळे होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु साडेसहा महिने होत नाही तोच महिलेला प्रसूतीला पुढे जावे लागले. अकाली प्रसूतीमुळे दोन्ही बाळांचे वजन ८०० ग्रॅम होते. यातील एका बाळाची प्रकृती नाजूक होती. त्याला श्वासही घेता येत नव्हता आणि पोटात दूधही राहत नव्हते. यामुळे वजन झपाट्याने कमी होऊन ६०० ग्रॅमवर आले. डॉ. योगेश टेंभेकर यांनी सांगितले, या बाळामध्ये श्वास घेतल्यानंतर जिथे हवा जायला पाहिजे होती तिथे ती जात नव्हती. यामुळे बाळ १० दिवसांचे असताना ‘एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी’ ही पोटावर शस्त्रक्रिया केली. पेडियाट्रिक सर्जन डॉ. चंद्रशेखर फांदे व डॉ. तुषार ठाकरे यांनी ही शस्त्रक्रिया केली. परंतु शस्त्रक्रियेनंतर हृदयाच्या आजूबाजूला जी पोकळी असते तिथे पाणी भरणे सुरू झाले. बाळाचा जीव धोक्यात आला होता. बाळ १९ दिवसांचे असताना दुसऱ्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. पेडियाट्रिक कार्डीओलॉजी डॉ. प्रमोद आंबटकर, डॉ. संदीप यादव व डॉ. आशिष अखुज यांनी अत्यंत गुंतागुंतीची व जोखमीची शस्त्रक्रिया केली. कमी दिवसांच्या व कमी वजनाच्या बाळावर दुर्मिळातील दुर्मीळ अशी ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वी केली.

 महिन्याभरानंतर बाळाचे वजन १.६२५ किलो ग्रॅम

दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर बाळ ‘एनआयसीयू’मध्ये उपचाराला होते. विशेष उपचारांमुळे बाळाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. १०० दिवसांनंतर बाळाचे वजन ६०० ग्रॅमवरून १.६२५ किलो ग्रॅम झाले. तो स्वत:हून आईचे दूध घेत असल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता एक महिन्यानंतर बाळाची पुन्हा तपासणी केली असता बाळ सुदृढ असल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नाने बाळाला जीवनदान मिळाल्याचे डॉ. टेंभेकर म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्य