शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जंगलात लागलेल्या अग्निकांडात अडीचपट वाढ; २०२०-२१ साली ३.४५ लाख वणवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 11:01 IST

जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चाैथा, गडचिराेलीत सर्वाधिक

निशांत वानखेडे

नागपूर : ग्लाेबल वार्मिंगचा प्रभाव आता भारतातही दिसायला लागला आहे. त्यामुळेच जंगलात लागणाऱ्या वणव्यांमध्ये दुप्पटपेक्षा अधिकची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी देशभरात जंगलामध्ये अग्निकांडाच्या ३ लाख ४५ हजार ९८९ घटना नाेंदविण्यात आल्या. जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर असला तरी सर्वाधिक वणव्यांची नाेंद ही राज्यात गडचिराेली जिल्ह्यात झाली आहे.

देशातील एकूण वनक्षेत्रापैकी ११.६६ टक्के क्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण मानले जाते. यामध्ये मिझाेरम, त्रिपुरा, मेघालय, मणीपूर या पूर्वाेत्तर राज्यांसह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, मध्य ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील काही भागांचा समावेश आहे. वणव्यांचा अलर्ट ‘माेडिस’ आणि एसएनपीपी-व्हीआयआयआरएस या दाेन प्रणालीद्वारे केला जाताे. माेडिस प्रणालीद्वारे नाेव्हेंबर २०२० ते जून २०२१ या काळात ५२,७८५ वणव्यांच्या नाेंदी झाल्या तर एसएनपीपीद्वारे ३,४५,९८९ वणवे नाेंदविण्यात आले. २०१८-१९ मध्ये देशांत जंगलामध्ये २,१०,२८६ आगी लागल्या. २०१९-२० या वर्षात मात्र त्यात दिलासादायक घट झाली. यावर्षी १,२४,४७३ वणवे नाेंदविण्यात आले. २०२०-२१ साली मात्र यामध्ये अडीच पट वाढ झाली.

ओडिशामध्ये सर्वाधिक ५१,९६८ वणवे नाेंदविले गेले पण धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील गडचिराेली जिल्ह्यात सर्वाधिक १०,५७७ वणवे लागले. जंगलात अग्नितांडव झालेल्या टाॅप १० राज्यामध्ये त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याचा क्रमांक लागताे. ३४,०२५ वणव्यांसह महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर आहे.

वणवे पेटलेले टाॅप टेन राज्य

*राज्य             वणव्यांच्या घटना*

ओडिशा      -       ५१,९६८

मध्य प्रदेश    -         ४७,७९५

छत्तीसगड   -          ३८,१०६

महाराष्ट्र     -        ३४,०२५

झारखंड      -       २१,७१३

उत्तराखंड     -        २१,४८७

आंध्रप्रदेश    -        १९,३२८

तेलंगणा      -          १८,२३७

मिझाेरम     -        १२,८४६

आसाम      -       १०,७१८

२२.२७ टक्के वनक्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण

देशाच्या भूभागापैकी ७ लाख १३ हजार ७८९ चाैरस किमीचे वनक्षेत्र आहे. यातील २.८१ टक्के अत्याधिक, ७.८५ टक्के तीव्र आणि ११.६१ टक्के वनक्षेत्र अती, असे २२.२७ टक्के वनक्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण गटात माेडते. महाराष्ट्राचे ४,०५६ चाै.किमी. म्हणजे ७.६ टक्के वनक्षेत्र अग्निप्रवण गटात माेडते. राज्यात २०१९-२० साली १४,०१८ वणवे तर २०२०-२१ साली ३४,०२५ वणवे लागले.

टॅग्स :environmentपर्यावरणforestजंगलfireआग