शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

जंगलात लागलेल्या अग्निकांडात अडीचपट वाढ; २०२०-२१ साली ३.४५ लाख वणवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 11:01 IST

जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चाैथा, गडचिराेलीत सर्वाधिक

निशांत वानखेडे

नागपूर : ग्लाेबल वार्मिंगचा प्रभाव आता भारतातही दिसायला लागला आहे. त्यामुळेच जंगलात लागणाऱ्या वणव्यांमध्ये दुप्पटपेक्षा अधिकची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी देशभरात जंगलामध्ये अग्निकांडाच्या ३ लाख ४५ हजार ९८९ घटना नाेंदविण्यात आल्या. जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर असला तरी सर्वाधिक वणव्यांची नाेंद ही राज्यात गडचिराेली जिल्ह्यात झाली आहे.

देशातील एकूण वनक्षेत्रापैकी ११.६६ टक्के क्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण मानले जाते. यामध्ये मिझाेरम, त्रिपुरा, मेघालय, मणीपूर या पूर्वाेत्तर राज्यांसह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, मध्य ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील काही भागांचा समावेश आहे. वणव्यांचा अलर्ट ‘माेडिस’ आणि एसएनपीपी-व्हीआयआयआरएस या दाेन प्रणालीद्वारे केला जाताे. माेडिस प्रणालीद्वारे नाेव्हेंबर २०२० ते जून २०२१ या काळात ५२,७८५ वणव्यांच्या नाेंदी झाल्या तर एसएनपीपीद्वारे ३,४५,९८९ वणवे नाेंदविण्यात आले. २०१८-१९ मध्ये देशांत जंगलामध्ये २,१०,२८६ आगी लागल्या. २०१९-२० या वर्षात मात्र त्यात दिलासादायक घट झाली. यावर्षी १,२४,४७३ वणवे नाेंदविण्यात आले. २०२०-२१ साली मात्र यामध्ये अडीच पट वाढ झाली.

ओडिशामध्ये सर्वाधिक ५१,९६८ वणवे नाेंदविले गेले पण धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील गडचिराेली जिल्ह्यात सर्वाधिक १०,५७७ वणवे लागले. जंगलात अग्नितांडव झालेल्या टाॅप १० राज्यामध्ये त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याचा क्रमांक लागताे. ३४,०२५ वणव्यांसह महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर आहे.

वणवे पेटलेले टाॅप टेन राज्य

*राज्य             वणव्यांच्या घटना*

ओडिशा      -       ५१,९६८

मध्य प्रदेश    -         ४७,७९५

छत्तीसगड   -          ३८,१०६

महाराष्ट्र     -        ३४,०२५

झारखंड      -       २१,७१३

उत्तराखंड     -        २१,४८७

आंध्रप्रदेश    -        १९,३२८

तेलंगणा      -          १८,२३७

मिझाेरम     -        १२,८४६

आसाम      -       १०,७१८

२२.२७ टक्के वनक्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण

देशाच्या भूभागापैकी ७ लाख १३ हजार ७८९ चाैरस किमीचे वनक्षेत्र आहे. यातील २.८१ टक्के अत्याधिक, ७.८५ टक्के तीव्र आणि ११.६१ टक्के वनक्षेत्र अती, असे २२.२७ टक्के वनक्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण गटात माेडते. महाराष्ट्राचे ४,०५६ चाै.किमी. म्हणजे ७.६ टक्के वनक्षेत्र अग्निप्रवण गटात माेडते. राज्यात २०१९-२० साली १४,०१८ वणवे तर २०२०-२१ साली ३४,०२५ वणवे लागले.

टॅग्स :environmentपर्यावरणforestजंगलfireआग