शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात लागलेल्या अग्निकांडात अडीचपट वाढ; २०२०-२१ साली ३.४५ लाख वणवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 11:01 IST

जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चाैथा, गडचिराेलीत सर्वाधिक

निशांत वानखेडे

नागपूर : ग्लाेबल वार्मिंगचा प्रभाव आता भारतातही दिसायला लागला आहे. त्यामुळेच जंगलात लागणाऱ्या वणव्यांमध्ये दुप्पटपेक्षा अधिकची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी देशभरात जंगलामध्ये अग्निकांडाच्या ३ लाख ४५ हजार ९८९ घटना नाेंदविण्यात आल्या. जंगलातील अग्नितांडवाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर असला तरी सर्वाधिक वणव्यांची नाेंद ही राज्यात गडचिराेली जिल्ह्यात झाली आहे.

देशातील एकूण वनक्षेत्रापैकी ११.६६ टक्के क्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण मानले जाते. यामध्ये मिझाेरम, त्रिपुरा, मेघालय, मणीपूर या पूर्वाेत्तर राज्यांसह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, मध्य ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील काही भागांचा समावेश आहे. वणव्यांचा अलर्ट ‘माेडिस’ आणि एसएनपीपी-व्हीआयआयआरएस या दाेन प्रणालीद्वारे केला जाताे. माेडिस प्रणालीद्वारे नाेव्हेंबर २०२० ते जून २०२१ या काळात ५२,७८५ वणव्यांच्या नाेंदी झाल्या तर एसएनपीपीद्वारे ३,४५,९८९ वणवे नाेंदविण्यात आले. २०१८-१९ मध्ये देशांत जंगलामध्ये २,१०,२८६ आगी लागल्या. २०१९-२० या वर्षात मात्र त्यात दिलासादायक घट झाली. यावर्षी १,२४,४७३ वणवे नाेंदविण्यात आले. २०२०-२१ साली मात्र यामध्ये अडीच पट वाढ झाली.

ओडिशामध्ये सर्वाधिक ५१,९६८ वणवे नाेंदविले गेले पण धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील गडचिराेली जिल्ह्यात सर्वाधिक १०,५७७ वणवे लागले. जंगलात अग्नितांडव झालेल्या टाॅप १० राज्यामध्ये त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याचा क्रमांक लागताे. ३४,०२५ वणव्यांसह महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर आहे.

वणवे पेटलेले टाॅप टेन राज्य

*राज्य             वणव्यांच्या घटना*

ओडिशा      -       ५१,९६८

मध्य प्रदेश    -         ४७,७९५

छत्तीसगड   -          ३८,१०६

महाराष्ट्र     -        ३४,०२५

झारखंड      -       २१,७१३

उत्तराखंड     -        २१,४८७

आंध्रप्रदेश    -        १९,३२८

तेलंगणा      -          १८,२३७

मिझाेरम     -        १२,८४६

आसाम      -       १०,७१८

२२.२७ टक्के वनक्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण

देशाच्या भूभागापैकी ७ लाख १३ हजार ७८९ चाैरस किमीचे वनक्षेत्र आहे. यातील २.८१ टक्के अत्याधिक, ७.८५ टक्के तीव्र आणि ११.६१ टक्के वनक्षेत्र अती, असे २२.२७ टक्के वनक्षेत्र अत्याधिक अग्निप्रवण गटात माेडते. महाराष्ट्राचे ४,०५६ चाै.किमी. म्हणजे ७.६ टक्के वनक्षेत्र अग्निप्रवण गटात माेडते. राज्यात २०१९-२० साली १४,०१८ वणवे तर २०२०-२१ साली ३४,०२५ वणवे लागले.

टॅग्स :environmentपर्यावरणforestजंगलfireआग