शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सत्य-अहिंसा व संविधान सुरक्षेचा ‘समास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 20:26 IST

देशातील लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आज महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खऱ्या  अर्थाने गरज आहे. या दोन विचारांना जोडून लोकशाही वाचवण्यासाठी दक्षिणायनने पुढाकार घेत ‘सत्य -अहिंसा व संविधान सुरक्षा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत येत्या २९ जानेवारीपासून सेवाग्राम व नागपुरात ‘समास-२०१८ ’चे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदक्षिणायनचा पुढाकारदेशभरातील विचारवंत सेवाग्राम व नागपुरात एकत्रित येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या देशातील परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे. अभिव्यक्ती व सांस्कृतिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात आहे. संविधानाचे मूल्य धोक्यात आले आहे. हा सर्व प्रकार एकूणच लोकशाहीसाठी घातक आहे. तेव्हा देशातील लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आज महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खऱ्या  अर्थाने गरज आहे. या दोन विचारांना जोडून लोकशाही वाचवण्यासाठी दक्षिणायनने पुढाकार घेत ‘सत्य -अहिंसा व संविधान सुरक्षा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत येत्या २९ जानेवारीपासून सेवाग्राम व नागपुरात ‘समास-२०१८ ’चे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. गणेश देवी यांच्यासह देशभरातील लेखक, विचारवंत, नाट्य व चित्रपट कलावंत, पत्रकार, निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी याबाबत पत्रपरिषदेत माहिती माहिती. यावेळी प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने, अमिताभ पावडे, बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते. २९ जानेवारी रोजी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सायंकाळी ६ वाजता प्रार्थनसभेने कार्यक्रमला सुरुवात होईल. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार दिवंगत गौरी लंकेश यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बहुभाषिक आदरांजली अर्पण करण्यात येईल. विद्या बाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या सभेत के. नीला (कन्नड), राजेंद्र चेन्नी (कन्नड), मनिशी जानी (गुजराती), दामोदर मौझो (कोकणी), विनीत तिवारी (हिंदी), इंद्रनील आचार्य (बंगाली), हमीद दाभोळकर (इंग्रजी), मेघा पानसरे (मराठी), प्रज्ञा पवार (मराठी), उल्का महाजन (मराठी) आदी सहभागी होतील.३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वर्तमान समजून घेताना या सत्रात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि राजमोहन गांधी यांची भाषणे होतील.यानंतर ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दक्षिणायनचे लेखक, पत्रकार व कलावंत हे नागपुरातील विविध २० महाविद्यालयांमध्ये ‘वर्तमान समजून घेताना’ या शिर्षकांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दुपारी ४ वाजता दीक्षाभूमीवरून धनवटे नॅशनल कॉलेजपर्यंत मौन पदयात्रा काढण्यात येईल.दरम्यान व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केले जाईल. यानंतर धनवटे नॅशनल कॉलेज धंतोली येथे सभागृहात जाहीर सभा होईल. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे अध्यक्षस्थानी राहतील. के. नीला (कर्नाटक), उत्तम परमार (गुजरात), के. के. चक्रवर्ती (दिल्ली), प्रज्ञा दया पवार (मुंबई), धनाजी गुरव (महाराष्ट्र), जया मेहता (मध्य प्रदेश) आणि दिलीप प्रभुदेसाई (गोवा) प्रमुख अतिथी राहतील. राजमोहन गांधी, प्रकाश आंबेडकर आणि डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत या समासचा समारोप होईल.

 

टॅग्स :nagpurनागपूरSewagramसेवाग्राम