शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

सत्य-अहिंसा व संविधान सुरक्षेचा ‘समास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 20:26 IST

देशातील लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आज महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खऱ्या  अर्थाने गरज आहे. या दोन विचारांना जोडून लोकशाही वाचवण्यासाठी दक्षिणायनने पुढाकार घेत ‘सत्य -अहिंसा व संविधान सुरक्षा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत येत्या २९ जानेवारीपासून सेवाग्राम व नागपुरात ‘समास-२०१८ ’चे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदक्षिणायनचा पुढाकारदेशभरातील विचारवंत सेवाग्राम व नागपुरात एकत्रित येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या देशातील परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे. अभिव्यक्ती व सांस्कृतिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात आहे. संविधानाचे मूल्य धोक्यात आले आहे. हा सर्व प्रकार एकूणच लोकशाहीसाठी घातक आहे. तेव्हा देशातील लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आज महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खऱ्या  अर्थाने गरज आहे. या दोन विचारांना जोडून लोकशाही वाचवण्यासाठी दक्षिणायनने पुढाकार घेत ‘सत्य -अहिंसा व संविधान सुरक्षा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत येत्या २९ जानेवारीपासून सेवाग्राम व नागपुरात ‘समास-२०१८ ’चे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. गणेश देवी यांच्यासह देशभरातील लेखक, विचारवंत, नाट्य व चित्रपट कलावंत, पत्रकार, निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी याबाबत पत्रपरिषदेत माहिती माहिती. यावेळी प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने, अमिताभ पावडे, बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते. २९ जानेवारी रोजी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सायंकाळी ६ वाजता प्रार्थनसभेने कार्यक्रमला सुरुवात होईल. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार दिवंगत गौरी लंकेश यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बहुभाषिक आदरांजली अर्पण करण्यात येईल. विद्या बाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या सभेत के. नीला (कन्नड), राजेंद्र चेन्नी (कन्नड), मनिशी जानी (गुजराती), दामोदर मौझो (कोकणी), विनीत तिवारी (हिंदी), इंद्रनील आचार्य (बंगाली), हमीद दाभोळकर (इंग्रजी), मेघा पानसरे (मराठी), प्रज्ञा पवार (मराठी), उल्का महाजन (मराठी) आदी सहभागी होतील.३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वर्तमान समजून घेताना या सत्रात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि राजमोहन गांधी यांची भाषणे होतील.यानंतर ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दक्षिणायनचे लेखक, पत्रकार व कलावंत हे नागपुरातील विविध २० महाविद्यालयांमध्ये ‘वर्तमान समजून घेताना’ या शिर्षकांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दुपारी ४ वाजता दीक्षाभूमीवरून धनवटे नॅशनल कॉलेजपर्यंत मौन पदयात्रा काढण्यात येईल.दरम्यान व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केले जाईल. यानंतर धनवटे नॅशनल कॉलेज धंतोली येथे सभागृहात जाहीर सभा होईल. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे अध्यक्षस्थानी राहतील. के. नीला (कर्नाटक), उत्तम परमार (गुजरात), के. के. चक्रवर्ती (दिल्ली), प्रज्ञा दया पवार (मुंबई), धनाजी गुरव (महाराष्ट्र), जया मेहता (मध्य प्रदेश) आणि दिलीप प्रभुदेसाई (गोवा) प्रमुख अतिथी राहतील. राजमोहन गांधी, प्रकाश आंबेडकर आणि डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत या समासचा समारोप होईल.

 

टॅग्स :nagpurनागपूरSewagramसेवाग्राम