शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

शोकांतिका ! नागपुरात २३४ रुग्णांमागे एक खाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 22:48 IST

शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

ठळक मुद्दे३० लाख लोकसंख्येच्या तुलनेत १२८१५ खाटा आरोग्य सेवा तोकडीजागतिक आरोग्य दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. साध्या शासकीय व खासगी रुग्णालयांतील एकूण खाटांचा विचार केला तर शहरात केवळ १२८१५ खाटा उपलब्ध आहेत, यावरून २३४ नागरिकांमागे एक खाट असे प्रमाण आहे. शहरात दुर्दैवाने एखादे नैसर्गिक संकट आले आणि त्यामध्ये १४ हजारावरील नागरिक पीडित झाले तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. नागपूर हे ‘मेट्रो’ सिटी होत आहे. यामुळे येथे धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे हाच प्रश्न भविष्यात समोर येणार आहे.२०११ साली २० लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर ३० लाख लोकसंख्येच्या पुढे सरकले आहे. शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १० खाटा, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० खाटा तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. शहरात तीन शासकीय रुग्णालये महत्त्वाची आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) खाटांची संख्या १६०० आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) खाटांची संख्या ६९० आहे, तर डागा रुग्णालयात ३६५ खाटांची सोय आहे. खासगी रुग्णालयांची संख्या ६३३ असून खाटांची संख्या ९८०० आहे, एकूण खाटांची संख्या १२८१५ आहे. परंतु लोकसंख्येचा विचार केल्यास ही संख्या अपुरी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार गेल्या आठ वर्षांत स्वाईन फ्लू, डेंग्यूचे आजार बळावले आहेत. दरवर्षी यात वाढ होताना दिसून येत आहे. इतरही संसर्गजन्य आजार वेळोवेळी डोके वर काढतात, अशावेळी अचानक मोठी आपत्ती ओढवल्यास नागपुरात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.दोन हजार रुग्णक्षमतेच्या रुग्णालयांची गरजवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मते, १९८५ च्या तुलनेत सध्या शहराचा विस्तार चारही दिशेने झाला आहे. ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सुमारे चार लाख नागरिक शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानकातून दररोज ये-जा करतात. शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात साधारण चार ते पाच लाख लोकसंख्या आहे. यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन हजार रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयाची गरज आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांवर नजर टाकल्यास एकाही रुग्णालयात अत्याधुनिक सोयी नाहीत. येथील रुग्णालयाची भिस्त जुन्याच सोर्इंवर आहे. यातच मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे वाढलेले रुग्ण, त्या तुलनेत सोयींचा तुटवडा व कमी मनुष्यबळामुळे गरीब रुग्ण गैरसोयींना तोंड देत असल्याचे चित्र आहे.आरोग्य संस्था         रुग्णालयाची संख्या                  खाटांची संख्यामनपा                         ३                                               १३०मेडिकल                     १                                                १,६००मेयो                           १                                               ६९०डागा                          १                                              ३६५सुपर स्पे. हॉस्पिटल    १                                            २३०खासगी रुग्णालये     ६३३                                        ९८००४८ हेल्थ पोस्टची आवश्यक्ता५० हजार लोकसंख्येमागे एक हेल्थ पोस्ट असावे, असे शासनाचे प्रमाण आहे. महापालिकेचे १२ हेल्थ पोस्ट आहेत. आणखी ४८ हेल्थ पोस्टची शहराला गरज आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे, मात्र शासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.शासकीय रुग्णालयांचा वापर पूर्ण क्षमतेने होण्याची गरजनागपुरात कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र आहे, राज्य कामगार रुग्णालय आहे, मनपाचे हॉस्पिटल आहे या सर्वांचा वापर आजही पूर्ण क्षमतेने होत नाही. शासनाने याकडे आताच लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे रोजच्या रुग्णांना मदत तर होईलच मोठी आपत्ती आल्यास याचीही मदत मिळेल.डॉ. वाय. एस. देशपांडेअध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र 

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर