शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

शोकांतिका ! नागपुरात २३४ रुग्णांमागे एक खाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 22:48 IST

शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

ठळक मुद्दे३० लाख लोकसंख्येच्या तुलनेत १२८१५ खाटा आरोग्य सेवा तोकडीजागतिक आरोग्य दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. साध्या शासकीय व खासगी रुग्णालयांतील एकूण खाटांचा विचार केला तर शहरात केवळ १२८१५ खाटा उपलब्ध आहेत, यावरून २३४ नागरिकांमागे एक खाट असे प्रमाण आहे. शहरात दुर्दैवाने एखादे नैसर्गिक संकट आले आणि त्यामध्ये १४ हजारावरील नागरिक पीडित झाले तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. नागपूर हे ‘मेट्रो’ सिटी होत आहे. यामुळे येथे धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे हाच प्रश्न भविष्यात समोर येणार आहे.२०११ साली २० लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर ३० लाख लोकसंख्येच्या पुढे सरकले आहे. शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १० खाटा, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० खाटा तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. शहरात तीन शासकीय रुग्णालये महत्त्वाची आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) खाटांची संख्या १६०० आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) खाटांची संख्या ६९० आहे, तर डागा रुग्णालयात ३६५ खाटांची सोय आहे. खासगी रुग्णालयांची संख्या ६३३ असून खाटांची संख्या ९८०० आहे, एकूण खाटांची संख्या १२८१५ आहे. परंतु लोकसंख्येचा विचार केल्यास ही संख्या अपुरी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार गेल्या आठ वर्षांत स्वाईन फ्लू, डेंग्यूचे आजार बळावले आहेत. दरवर्षी यात वाढ होताना दिसून येत आहे. इतरही संसर्गजन्य आजार वेळोवेळी डोके वर काढतात, अशावेळी अचानक मोठी आपत्ती ओढवल्यास नागपुरात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.दोन हजार रुग्णक्षमतेच्या रुग्णालयांची गरजवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मते, १९८५ च्या तुलनेत सध्या शहराचा विस्तार चारही दिशेने झाला आहे. ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सुमारे चार लाख नागरिक शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानकातून दररोज ये-जा करतात. शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात साधारण चार ते पाच लाख लोकसंख्या आहे. यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन हजार रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयाची गरज आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांवर नजर टाकल्यास एकाही रुग्णालयात अत्याधुनिक सोयी नाहीत. येथील रुग्णालयाची भिस्त जुन्याच सोर्इंवर आहे. यातच मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे वाढलेले रुग्ण, त्या तुलनेत सोयींचा तुटवडा व कमी मनुष्यबळामुळे गरीब रुग्ण गैरसोयींना तोंड देत असल्याचे चित्र आहे.आरोग्य संस्था         रुग्णालयाची संख्या                  खाटांची संख्यामनपा                         ३                                               १३०मेडिकल                     १                                                १,६००मेयो                           १                                               ६९०डागा                          १                                              ३६५सुपर स्पे. हॉस्पिटल    १                                            २३०खासगी रुग्णालये     ६३३                                        ९८००४८ हेल्थ पोस्टची आवश्यक्ता५० हजार लोकसंख्येमागे एक हेल्थ पोस्ट असावे, असे शासनाचे प्रमाण आहे. महापालिकेचे १२ हेल्थ पोस्ट आहेत. आणखी ४८ हेल्थ पोस्टची शहराला गरज आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे, मात्र शासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.शासकीय रुग्णालयांचा वापर पूर्ण क्षमतेने होण्याची गरजनागपुरात कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र आहे, राज्य कामगार रुग्णालय आहे, मनपाचे हॉस्पिटल आहे या सर्वांचा वापर आजही पूर्ण क्षमतेने होत नाही. शासनाने याकडे आताच लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे रोजच्या रुग्णांना मदत तर होईलच मोठी आपत्ती आल्यास याचीही मदत मिळेल.डॉ. वाय. एस. देशपांडेअध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र 

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर