शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ट्रॅफिक जाम फोडतोय दररोज नागरिकांना घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:04 IST

‘आज दुख, कला का सुख’ अशी सांत्वना देत नागपूर ‘आपली मेट्रो’ जनतेचे धाडस वाढवीत आहे. परंतु सातत्याने होत असलेल्या वाहतुकीच्या जाममुळे लोकांचे धैर्य आता खचायला लागले आहे.

ठळक मुद्देवर्धा रोडवर वाहतुकीची नियमित कोंडीमिनिटात पोहोचणाऱ्या वाहनांना लागतो एक तासवाहनचालक त्रस्त, धुलीकणाचा मारारेडिसन ब्ल्यू चौक ते चिंचभवनपर्यंत त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आज दुख, कला का सुख’ अशी सांत्वना देत ‘आपली मेट्रो’ जनतेचे धाडस वाढवीत आहे. परंतु सातत्याने होत असलेल्या वाहतुकीच्या जाममुळे लोकांचे धैर्य आता खचायला लागले आहे.लोकांच्या संतापाचा उद्रेक होत नसला तरी हे संकट लवकरात लवकर संपावे, अशी भावना त्यांची आहे. वर्धा रोडवरील वाहन चालक खरोखरच त्रस्त झाले आहेत. सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ दरम्यान येथून वाहन चालविणे चांगलेच कसरतीचे ठरते आहे. ज्यांना या रस्त्यावरून नियमित आवागमन करावे लागते, त्यांचा वाहतुकीच्या जाममुळे बराच वेळ खर्ची जातो आहे. वर्धा रोडवरील रेडिसन ब्ल्यू चौक ते चिंचभवन हा रस्ता पार करण्यासाठी चालकाला अर्धा ते एक तास वेळ लागतो आहे. वर्धा रोडवर रेडिीसन ब्ल्यू चौक ते चिंचभवन पुलाच्या दरम्यान सोमलवाडा चौक, उज्ज्वलनगर चौक, राजीवनगर चौक, पावनभूमी, सोनेगाव चौक, हॉटेल प्राईड हे चौक येतात. या चौकात वाहनचालकांना थांबावेच लागते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने लोकांना कार्यालयात पोहोचायला उशीर होत आहे. मोठ्या संख्येने वाहन थांबल्याने प्रदूषण वाढले आहे. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे वर्धा रोडवरील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. हा शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्ता असल्याने याचे काम वेगाने व्हायला पाहीजे. सध्या कामाचा वेग मंदावला असल्याचे लोकांचे मत आहे तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, अशी लोकांची मागणी आहे.

पर्यायी मार्ग तयार करावेजितेंद्र दुपारे म्हणाले की, मेट्रोच्या कामामुळे होत असलेला वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेता, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा. त्यामुळे वर्धा रोडवर वाहतुकीचा भार कमी होईल.

वाहनांचे वर्गीकरण झाले पाहिजेप्रेमनाथ शेलारे म्हणाले की, रस्त्यावरून धावणाऱ्या लहान-मोठ्या, आवश्यक, अनावश्यक वाहनांचे वर्गीकरण झाले पाहिजे. असे झाल्यास वाहतूक सुरळीत होईल.मेट्रोचे लक्ष नाहीप्रवाल मुखर्जी म्हणाले की, वर्धा रोडवर मेट्रोचे काम वेगाने होऊ शकले असते; परंतु याकडे अपेक्षित लक्ष दिल्या जात नाही आहे.मेट्रोच्या गार्डचेही कुणी ऐकत नाहीरेडिसन ब्ल्यू ते चिंचभवन दरम्यान जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होतो. परंतु वाहतूक पोलीस केवळ रेडिसन ब्ल्यू व हॉटेल प्राईड चौकातच तैनात असतात; अन्य ठिकाणी मेट्रोचे गार्ड वाहतूक सांभाळतात. परंतु वाहन चालक त्यांच्या निर्देशाचे पालन करीत नाही. हे गार्ड हात दाखवतच असतात, अन् वाहन चालक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. चालकांच्या मते, गार्ड वाहतूक संचालन करण्यासाठी प्रशिक्षित नसल्यामुळे त्यांचे संकेत लक्षात येत नाही, असे वाहन चालक सांगतात. गार्डचे कुणी ऐकत नसल्याने वाहतूक व्यवस्था अस्ताव्यस्त होऊन जाते.

वर्धा रोडवरील रहिवाशांना जगणे कठीणआदित्य गभणे म्हणाले की, वर्धा रोडवरील रहिवाशांची या कामामुळे शांती भंग झाली आहे. वाहनांचे प्रदूषण, काम सुरू असल्याने सातत्याने होत असलेला आवाज, वाहनांचे कर्णकर्कश आवाज यामुळे परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. वर्धा रोडला लागून असलेल्या गल्ल्यांमधूनही आता जड वाहनांची वर्दळ वाढली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMetroमेट्रो