शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

नागपुरातील ट्रॅफिक जाम फोडतोय दररोज नागरिकांना घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:04 IST

‘आज दुख, कला का सुख’ अशी सांत्वना देत नागपूर ‘आपली मेट्रो’ जनतेचे धाडस वाढवीत आहे. परंतु सातत्याने होत असलेल्या वाहतुकीच्या जाममुळे लोकांचे धैर्य आता खचायला लागले आहे.

ठळक मुद्देवर्धा रोडवर वाहतुकीची नियमित कोंडीमिनिटात पोहोचणाऱ्या वाहनांना लागतो एक तासवाहनचालक त्रस्त, धुलीकणाचा मारारेडिसन ब्ल्यू चौक ते चिंचभवनपर्यंत त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आज दुख, कला का सुख’ अशी सांत्वना देत ‘आपली मेट्रो’ जनतेचे धाडस वाढवीत आहे. परंतु सातत्याने होत असलेल्या वाहतुकीच्या जाममुळे लोकांचे धैर्य आता खचायला लागले आहे.लोकांच्या संतापाचा उद्रेक होत नसला तरी हे संकट लवकरात लवकर संपावे, अशी भावना त्यांची आहे. वर्धा रोडवरील वाहन चालक खरोखरच त्रस्त झाले आहेत. सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ दरम्यान येथून वाहन चालविणे चांगलेच कसरतीचे ठरते आहे. ज्यांना या रस्त्यावरून नियमित आवागमन करावे लागते, त्यांचा वाहतुकीच्या जाममुळे बराच वेळ खर्ची जातो आहे. वर्धा रोडवरील रेडिसन ब्ल्यू चौक ते चिंचभवन हा रस्ता पार करण्यासाठी चालकाला अर्धा ते एक तास वेळ लागतो आहे. वर्धा रोडवर रेडिीसन ब्ल्यू चौक ते चिंचभवन पुलाच्या दरम्यान सोमलवाडा चौक, उज्ज्वलनगर चौक, राजीवनगर चौक, पावनभूमी, सोनेगाव चौक, हॉटेल प्राईड हे चौक येतात. या चौकात वाहनचालकांना थांबावेच लागते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने लोकांना कार्यालयात पोहोचायला उशीर होत आहे. मोठ्या संख्येने वाहन थांबल्याने प्रदूषण वाढले आहे. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे वर्धा रोडवरील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. हा शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्ता असल्याने याचे काम वेगाने व्हायला पाहीजे. सध्या कामाचा वेग मंदावला असल्याचे लोकांचे मत आहे तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, अशी लोकांची मागणी आहे.

पर्यायी मार्ग तयार करावेजितेंद्र दुपारे म्हणाले की, मेट्रोच्या कामामुळे होत असलेला वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेता, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा. त्यामुळे वर्धा रोडवर वाहतुकीचा भार कमी होईल.

वाहनांचे वर्गीकरण झाले पाहिजेप्रेमनाथ शेलारे म्हणाले की, रस्त्यावरून धावणाऱ्या लहान-मोठ्या, आवश्यक, अनावश्यक वाहनांचे वर्गीकरण झाले पाहिजे. असे झाल्यास वाहतूक सुरळीत होईल.मेट्रोचे लक्ष नाहीप्रवाल मुखर्जी म्हणाले की, वर्धा रोडवर मेट्रोचे काम वेगाने होऊ शकले असते; परंतु याकडे अपेक्षित लक्ष दिल्या जात नाही आहे.मेट्रोच्या गार्डचेही कुणी ऐकत नाहीरेडिसन ब्ल्यू ते चिंचभवन दरम्यान जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होतो. परंतु वाहतूक पोलीस केवळ रेडिसन ब्ल्यू व हॉटेल प्राईड चौकातच तैनात असतात; अन्य ठिकाणी मेट्रोचे गार्ड वाहतूक सांभाळतात. परंतु वाहन चालक त्यांच्या निर्देशाचे पालन करीत नाही. हे गार्ड हात दाखवतच असतात, अन् वाहन चालक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. चालकांच्या मते, गार्ड वाहतूक संचालन करण्यासाठी प्रशिक्षित नसल्यामुळे त्यांचे संकेत लक्षात येत नाही, असे वाहन चालक सांगतात. गार्डचे कुणी ऐकत नसल्याने वाहतूक व्यवस्था अस्ताव्यस्त होऊन जाते.

वर्धा रोडवरील रहिवाशांना जगणे कठीणआदित्य गभणे म्हणाले की, वर्धा रोडवरील रहिवाशांची या कामामुळे शांती भंग झाली आहे. वाहनांचे प्रदूषण, काम सुरू असल्याने सातत्याने होत असलेला आवाज, वाहनांचे कर्णकर्कश आवाज यामुळे परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. वर्धा रोडला लागून असलेल्या गल्ल्यांमधूनही आता जड वाहनांची वर्दळ वाढली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMetroमेट्रो