शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

पर्यटकांच्या टूरचे पुढे समायोजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 7:40 PM

कोरोना संकटासाठी कुणीही जबाबदार नाही. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र आणि सर्वच राज्य शासनांनी लॉकडाऊन केल्यानंतर देशविदेशातील पर्यटनावर निर्बंध आल्याने सर्वच सहली रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे पर्यटन उद्योगाला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. अशा स्थितीत पर्यटकांना कुठलाही आर्थिक फटका बसू न देता त्यांच्या सहलींच्या रकमेचे समायोजन त्यांनी दिलेल्या तारखांच्या सहलींमध्ये करणार असल्याची माहिती नागपूर टूर ऑर्गनायझर असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनागपूर टूर ऑर्गनायझर असोसिएशनचा निर्णय : लॉकडाऊनमुळे सर्वच टूर रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संकटासाठी कुणीही जबाबदार नाही. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र आणि सर्वच राज्य शासनांनी लॉकडाऊन केल्यानंतर देशविदेशातील पर्यटनावर निर्बंध आल्याने सर्वच सहली रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे पर्यटन उद्योगाला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. अशा स्थितीत पर्यटकांना कुठलाही आर्थिक फटका बसू न देता त्यांच्या सहलींच्या रकमेचे समायोजन त्यांनी दिलेल्या तारखांच्या सहलींमध्ये करणार असल्याची माहिती नागपूर टूर ऑर्गनायझर असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.देशपांडे म्हणाले, सहलींचे आयोजन करताना सर्वच टूर ऑपरेटर्सनी पर्यटकांकडून अग्रीम रक्कम घेतली आहे. ही रक्कम बस, विमान, निवास व्यवस्थेत गुंतविली असून परतीची शक्यता नाही. आर्थिक अडचणींमुळे प्रवाशांना रोख रक्कम आता परत करणे शक्य होणार नाही. या सर्व घटनाक्रमात पर्यटकांचे नुकसान होऊ नये म्हणून पुढील कोणत्याही सहलीत पर्यटकांचे समायोजन करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. यामध्ये प्रवाशांचे सहकार्य अपेक्षित आहे. पर्यटन हा विश्वासाचा व्यवसाय आहे. सहलींच्या माध्यमातून पर्यटकांना उत्तम सेवा प्रदान करीत टूर ऑपरेटर्सला उत्पन्न होते. पण यंदा आयोजन नसल्याने कंपन्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला आहे. पण हा व्यवसाय निरंतर चालणारा आहे. लोकांचा टूर आॅपरेटर्सवरील विश्वास आणि ऋषानुबंध कायम राहावे, याकरिताच असोसिएशनने निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांचा विश्वास तडीस जाऊ देणार नाही. प्रवाशांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.नागपूर जिल्ह्यात जवळपास १ लाख पर्यटकांना कोरोनाचा फटका बसला आहे. नागपुरात या व्यवसायाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ५ हजार लोक जुळले आहेत. उन्हाळ्यातील सहलींवरच सर्वांचा आर्थिक कारभार चालतो. वर्षभरात नागपुरात एकूण सहलींमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात ७० टक्के आयोजन होते. पण लॉकडाऊनमुळे देशविदेशातील सर्वच सहली रद्द झाल्या आहेत. पुढेही हा व्यवसाय काही महिने बंद राहील. कारण देश विदेशाच्या सहलीची तयारी करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. त्याकरिता बस, विमान, निवास, स्थळदर्शन आणि भोजनाची व्यवस्था करावी लागते. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर आणि शासनाच्या निर्देशानुसार देशविदेशात सहलींचे आयोजन करणार असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

बुकिंग तारखेपासून एक वर्षात विमानाने प्रवास करता येणारदेशांतर्गत सहलींचे आयोजन करताना टूर आॅपरेटर्सनी अनेक पर्यटकांचे विमानांचे बुकिंग केले आहे. पण सहली रद्द झाल्याने प्रवास करणे शक्य नाही. अशा स्थितीत विमान कंपन्यांनी बुकिंग क्रेडिट शेअरमध्ये टाकल्या आहेत. बुकिंग तारखेपासून एका वर्षाच्या आत पर्यटकांना प्रवास करता येईल, असे देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटन