शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

तोतलाडोह ओव्हरफ्लो: धरणाचे सर्व १४ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:45 PM

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले तोतलाडोह बुधवारी ओव्हरफ्लो झाले. सायंकाळपर्यंत या धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु पाण्याची येणे मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याने रात्री ८ वाजता सर्वच्या सर्व १४ दरवाजे ३० सेंटीमीटरपर्यंत उघडून पाणी सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले तोतलाडोह बुधवारी ओव्हरफ्लो झाले. सायंकाळपर्यंत या धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु पाण्याची येणे मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याने रात्री ८ वाजता सर्वच्या सर्व १४ दरवाजे ३० सेंटीमीटरपर्यंत उघडून पाणी सोडण्यात आले. प्रति सेकंद ४४४ क्युबिक मीटर पाणी सोडले जात आहे. वीज उत्पादनाने १२० क्युबिक मीटर पाणी सोडले जात आहे. याच गतीने पाणी सुरू राहिले तर गुरुवारी नवेगाव खैरी येथील धरणही ओव्हरफ्लो होऊ शकते. तोतलाडोह भरल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे.मध्य प्रदेशातील चौराई (जि. छिंदवाडा) येथील धरणामुळे यंदा तोतलाडोह संकटात सापडला होता. पाऊस होत नसल्याने धरणातील पाणीसाठा आटला होता. डेड स्टॉकमधून पाणी वापरावे लागले. इतकेच नव्हे तर पिण्याचे पाणी पुरावे म्हणून शहरात एक दिवसाआड पाणी सोडण्याची वेळ आली. गेल्या १५ऑगस्टपासून परिस्थिती सुधारली. मध्य प्रदेशात अतिवृष्टीने चौराई धरण भरलेय. त्याचे दोन गेट उघडल्याने तोतलाडोहमध्ये पाणी साचू लागले. २३ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह येथील पाणीसाठा १२.२० टक्क्यांवर वाढला. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चौराई धरणाचे ६ दरवाजे उघडले. त्यामुळे ४८ तासातच तोतलाडोहमधील पाणीसाठ्यात १८ टक्के वाढ झाली. ३० टक्क्यांपर्यंत तो पोहोचला. मध्य प्रदेशात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौराई धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. परिणामी तोतलाडोह धरण भरू लागले. इतकेच नव्हे तर बुधवारी तो ओव्हरफ्लो (९५ टक्क्यांपेक्षा अधिक) झाला.असा वाढत गेला पाणीसाठा१० ऑगस्ट - ० टक्के२३ ऑगस्ट - १३.२६ टक्के२७ऑगस्ट - २२.७० टक्के१ सप्टेंबर - ३६.८९ टक्के६ सप्टेंबर - ५८ टक्के९ सप्टेंबर - ८६ टक्के१० सप्टेंबर - ९० टक्के११ सप्टेंबर - ओव्हरफ्लो (९५ टक्के)१.२० लाख हेक्टरचे सिंचन अवलंबूननागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचन तोतलाडोह धरणावर अवलंबून आहे. पेंच सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश धोटे यांच्यानुसार ७० हजार हेक्टरमध्ये धान रोवले जाते. यासाठी एका पाळीत १५० दलघमी इतक्या पाण्याची गरज असते. धानासाठी दोन पाळीत पाणी दिले जाते. १०० दलघमी पाणी अन्य वापरासाठी दिले जाते. वर्षभरात ६०० दलघमी पाण्याची आवश्यकता असते.चार वर्षानंतर धरण हाऊसफु्ल्लतोतलाडोह धरण चार वर्षानंतर हाऊसफुल्ल झाले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये हे धरण पूर्णपणे भरले होते. १९८९ मध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरबनलेल्या तोतलाडोह धरणाचा कॅचमेंट एरिया ४२७३ वर्ग किलोमीटर आहे. धरणातील डेड स्टॉक १५० दलघमी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा १०१६.८८ दलघमी आहे. तोतलाडोहपासून चौराई धरणाचे अंतर ११० किमी आहे. तोतलाडोह धरणाच्या भरवशावर १६० मेगावॅट विजेचे उत्पादनही केले होते. यातून ६६ टक्के वीज मध्यप्रदेशला तर उर्वरित वीज महाराष्ट्राला मिळते.नवेगाव (खैरी) येथील पेंच धरण १९७७ मध्ये बनले. या धरणातील डेड स्टॉक ३० दलघमी आहे. येथील उपयुक्त साठा १४१.७४ दलघमी आहे. तोतलाडोहपासून याचे अंतर ३० किमी आहे. या धरणाच्या उजव्या कालव्यातून नागपूर शहर आणि डाव्या कालव्यातून पारशिवनी, रामटेक, मौदा तालुका आणि भंडाऱ्या जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी सोडले जाते.रब्बी व खरीपसाठी सोडणार पाणीदरम्यान तोतलाडोह धरण हाऊसफुल्ल झाल्यामुळे साऱ्यांनाच आनंद झाला आहे. धरण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाले आहे. तेव्हा रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामासाठी आता तोतलाडोहचे पाणी सोडले जाईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारातोतलाडोह धरणातील सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठावर राहणाऱ्या गावकऱ्यांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तोतलाडोह येथील सोडलेल्या पाण्यामुळे नवेगाव खैरी येथील धरण भरेल. ते धरण पूर्णपणे भरल्यानंतर पाणी नदीमध्ये सोडले जाईल. ते सोडतानाही विशेष काळजी घेतली जात आहे. नदीपात्राबाहेर पाणी जाऊ नये. पात्राबरोबरच पाणी वाहत जावे, जेणेकरून नदीकाठी राहणाऱ्या गावाला व नागरिकांना कुठलाही धोका होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तसेच आवश्यक उपाययोजनांसाठी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

टॅग्स :DamधरणWaterपाणी