शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

तोतलाडोह ‘ओव्हरफ्लो’च्या दिशेने : ८७.३६ टक्के भरले धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:30 IST

महिनाभरापूर्वी ज्या तोतलाडोह धरणातील पाणीसाठा डेडस्टॉकच्याही खाली गेला होता तो आज ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील पाणीसाठा ८७.३६ टक्के इतका झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे२४ तासात १३ टक्के पाणी वाढलेचौराई धरणातील सहा गेटमधून सोडले जात आहे १४०० क्युसेक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिनाभरापूर्वी ज्या तोतलाडोह धरणातीलपाणीसाठा डेडस्टॉकच्याही खाली गेला होता तो आज ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील पाणीसाठा ८७.३६ टक्के इतका झाल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर येणाऱ्या एक-दोन दिवसात यातून पाणी सोडण्याचीही वेळ येऊ शकते. यादरम्यान पाटबंधारे विभागाने पत्र जारी करीत पेंच व कन्हान नदीच्या काठाने राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.मध्यप्रदेशमध्ये सुरूअसलेल्या मुसळधार पावसामुळे चौराई धरणातील सहा गेट उघडण्यात आले असून, त्यातून १४०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात १३ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा तोतलाडोह धरणात वाढला आहे. तसेच येत्या २४ तासात तोतलाडोह ९६ टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत तोतलाडोह ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत.तोतलाडोहची डेड स्टॉकसह एकूण पाणीसाठा क्षमता ११६६.९३ दलघमी इतकी आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ९३४.९८ दलघमी पाणी धरणात जमा झाले होते. चौराई धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने यात सायंकाळपर्यंत आणखी वाढ होत आहे. तोतलाडोह धरण ६५ टक्के भरताच नागपुरातील पाण्याचे संकट दूर झाले होते. परंतु आता धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे.महिनाभरातच भरले धरण९ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह धरणातील पाणीसाठा ० टक्के इतका होता.त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणी वाचवण्याच्या उद्देशाने शहरात एक दिवसाआड पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर चौराई धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढू लागला. त्यामुळे ते धरण हाऊसफुल्ल झाल्याने त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली. परिणामी तोतलाडोह जलाशयात पाणी जमा होऊ लागले. १० ऑगस्ट रोजी येथील पाणीसाठा ०.५८ टक्के इतका झाला. चौराई धरणातून १५ ऑगस्टपासून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने ९ सप्टेंबरपर्यंत तोतलाडोह ८६.३७ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत तोतलाडोहमध्ये ४५ टक्के इतका पाणीसाठा होता. तोतलाडोह भरल्यामुळे एकीकडे शहरातील नागरिकांना आनंद झाला आहे, तर दुसरीकडे सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनाही आनंद झाला आहे.पेंच व कन्हान नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारातोतलाडोह धरण ८६ टक्क्यांपेक्षा जास्त भरल्यामुळे येत्या एक किंवा दोन दिवसात धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जलशयातून विसर्ग नदीत सोडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पेंच व कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून, लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी व शासनाकडून मिळत असलेल्या सूचनांवर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी सांगितले आहे. गावातील नागरिकांसाठी १०७७ किंवा ०७१२-२५६२६६८ या आपात्कालीन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी