शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

"शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घ्यायये नाही" : अनिल देशमुख

By कमलेश वानखेडे | Updated: June 8, 2024 18:15 IST

Nagpur : अजित पवार गटातील आमदार संपर्कात

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जे सोडून गेले ते चलबिचल झाले आहेत. वर्षभरापूर्वी त्याचा निर्णय चुकला. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील आमदार संपर्कात आहेत. चार महिन्यांनी निवडणूक असल्याने त्यांना चिंतेने ग्रासले आहे. शरद पवारांना जे कठीण काळात सोडून गेले त्यांना परत घ्यायचे नाही असे ठरले आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. शनिवारी पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, ज्यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली, ते आमच्या डोक्यात आहे. जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करत आहेत. शरद पवार बाहेर जाऊ नये म्हणून बारामतीत अडकवले. सुनेत्रा पवार यांना तिकीट दिली, ते सर्वत्र फिरले, महाराष्ट्रात ६० सभा शरद पवार यांनी घेतल्या. म्हणून कोल्हापूरला त्यांचे बॅनर लागले असतील, असेही देशमुख म्हणाले.

जागा वाटप वरिष्ठ पातळीवर

जेमतेम लोकसभा निवडणूक झाल्या आहेत. जागा वाटप बाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा होईल. कोण कुठे लढेल यावर सध्या चर्चा नाही. दावा कुणीपण करू शकतो. आम्ही पण दावा करू. पण चर्चा करून निर्णय होईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे यांनी आता तरी जमिनीवर यावे

कृपाल तुमाने हे युतीचे १० वर्ष खासदार होते. त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेस आमदाराला तिकीट दिले पण निवडून आणू शकले नाही. आम्ही आमची जागा जिंकून दाखवली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता तरी जमिनीवर यावे. त्यांच्या कामटी मतदारसंघात १८ हजाराने काँग्रेसचा उमेदवार पुढे आहे. बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कायम राहिले पाहिजे, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिले पाहिजे याचा आम्हाला फायदा होईल, असा चिमटाही देशमुख यांनी काढला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखAjit Pawarअजित पवारlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालnagpurनागपूर