शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

यावेळी मंत्रीपद अडीच वर्षाचेच, मात्र ‘डोन्ट वरी..’ ; पुढे अनेकांना संधी, अजितदादांचा वादा

By नरेश डोंगरे | Updated: December 15, 2024 18:28 IST

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आणि मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

नागपूर : मर्यादित मंत्रिपदामुळे योग्यता असूनही एकाच वेळी अनेकांना संधी मिळत नाही. मात्र, डोन्ट वरी, यावेळी मंत्रीपदाचा कार्यकाळ पाच वर्षे ऐवजी अडीच वर्षांचा केला आहे. त्यामुळे अनेकांना संधी मिळेल. एवढेच नव्हे तर अनेक जिल्ह्यांना, विविध भागांनाही विकासाची समान संधी मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आणि मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर राष्टवादीचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच मेळाव्याच्या आयोजनात महत्वाची भूमिका वठविणारे प्रशांत पवार यांच्यासह अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्रीपदासाठी अनेक जण हुरपले असले तरी एकाच वेळी सर्वांना संधी देता येणार नाही. परिणामी अनेक जण नाराज होऊ शकतात, हे ध्यानात घेत त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी दादांनी त्यांना पुढच्या अडीच वर्षांचा अप्रत्यक्ष वादा केला. दादा यांनी आपल्या भाषणातून लोकसभा, विधानसभेच्या निकालाचे विश्लेषण करतानाच पक्षाच्या यशापयाशाचाही आढावा घेतला. ते म्हणाले, अपयशाने खचून जायचे नसते. त्यातून धडा घेऊन आपण योग्य ते बदल आत्मसात केले पाहिजे.

लोकसभा निवडणूकीनंतर मी हेच केले. त्याचे चांगले परिणाम समोर आले. आता या यशाचा आलेख असाच वाढवत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीला सामोरे जायचे आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. नेते झाले, मंत्रीपद मिळालं म्हणून कुणी जास्त व्यस्त होत असेल आणि त्यांना पक्ष-संघटनेकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर त्यांच्याबाबतीत नंतर वेगळा विचार होऊ शकतो, असा ईशाराही अजितदादा यांनी दिला. मंत्रीमंडळ अस्तित्वात आल्यावर तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करुन महामंडळाची पदे तात्काळ भरली जाणार आहेत असेही दादांनी सांगितले.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायचीय...

राज्यात मिळालेल्या यशाने नक्कीच स्फुरण चढले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची आहे. त्यासाठी विदर्भ, मुंबईसह अन्य राज्यातही पक्षाची ताकद वाढवायची आहे, असे सांगतानाच मोर्शीची जागा गेली नसती तर पक्षाचा विदर्भात शंभर टक्के स्ट्राईक रेट राहिला असता, असेही अजितदादा म्हणाले.

पाट्या टाकणे थांबले पाहिजे : प्रफुल पटेललोकसभेच्या पराभवानंतर आमदारांना ताकद देण्याचे काम अजितदादा यांनी केले. त्याचमुळे विधानसभेत विदर्भात घसघशीत यश मिळाले. एप्रिल ते मे महिन्यात सर्व निवडणुका पार पडणार आहेत. पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून सर्वांनी काम करण्याची अवश्यकता आहे. पाट्या टाकणे थांबले पाहिजे, नेत्यांसोबत फोटो काढा पण पक्षासाठी योग्य ते कामही करा, अन्यथा वेगळा विचार होईल, असा सज्जड दम पटेल यांनी दिला.

सर्वांची भाकीते खोटी - सुनिल तटकरे

सर्वांची भाकीते खोटी ठरवत चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले. या यशात विदर्भाचा वाटा मोठा असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विदर्भातील कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवली. महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमच्यावर संशय व्यक्त करण्यात आला परंतु आम्ही आजही शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४