शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

यावेळी मंत्रीपद अडीच वर्षाचेच, मात्र ‘डोन्ट वरी..’ ; पुढे अनेकांना संधी, अजितदादांचा वादा

By नरेश डोंगरे | Updated: December 15, 2024 18:28 IST

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आणि मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

नागपूर : मर्यादित मंत्रिपदामुळे योग्यता असूनही एकाच वेळी अनेकांना संधी मिळत नाही. मात्र, डोन्ट वरी, यावेळी मंत्रीपदाचा कार्यकाळ पाच वर्षे ऐवजी अडीच वर्षांचा केला आहे. त्यामुळे अनेकांना संधी मिळेल. एवढेच नव्हे तर अनेक जिल्ह्यांना, विविध भागांनाही विकासाची समान संधी मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आणि मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर राष्टवादीचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच मेळाव्याच्या आयोजनात महत्वाची भूमिका वठविणारे प्रशांत पवार यांच्यासह अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्रीपदासाठी अनेक जण हुरपले असले तरी एकाच वेळी सर्वांना संधी देता येणार नाही. परिणामी अनेक जण नाराज होऊ शकतात, हे ध्यानात घेत त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी दादांनी त्यांना पुढच्या अडीच वर्षांचा अप्रत्यक्ष वादा केला. दादा यांनी आपल्या भाषणातून लोकसभा, विधानसभेच्या निकालाचे विश्लेषण करतानाच पक्षाच्या यशापयाशाचाही आढावा घेतला. ते म्हणाले, अपयशाने खचून जायचे नसते. त्यातून धडा घेऊन आपण योग्य ते बदल आत्मसात केले पाहिजे.

लोकसभा निवडणूकीनंतर मी हेच केले. त्याचे चांगले परिणाम समोर आले. आता या यशाचा आलेख असाच वाढवत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीला सामोरे जायचे आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. नेते झाले, मंत्रीपद मिळालं म्हणून कुणी जास्त व्यस्त होत असेल आणि त्यांना पक्ष-संघटनेकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर त्यांच्याबाबतीत नंतर वेगळा विचार होऊ शकतो, असा ईशाराही अजितदादा यांनी दिला. मंत्रीमंडळ अस्तित्वात आल्यावर तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करुन महामंडळाची पदे तात्काळ भरली जाणार आहेत असेही दादांनी सांगितले.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायचीय...

राज्यात मिळालेल्या यशाने नक्कीच स्फुरण चढले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची आहे. त्यासाठी विदर्भ, मुंबईसह अन्य राज्यातही पक्षाची ताकद वाढवायची आहे, असे सांगतानाच मोर्शीची जागा गेली नसती तर पक्षाचा विदर्भात शंभर टक्के स्ट्राईक रेट राहिला असता, असेही अजितदादा म्हणाले.

पाट्या टाकणे थांबले पाहिजे : प्रफुल पटेललोकसभेच्या पराभवानंतर आमदारांना ताकद देण्याचे काम अजितदादा यांनी केले. त्याचमुळे विधानसभेत विदर्भात घसघशीत यश मिळाले. एप्रिल ते मे महिन्यात सर्व निवडणुका पार पडणार आहेत. पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून सर्वांनी काम करण्याची अवश्यकता आहे. पाट्या टाकणे थांबले पाहिजे, नेत्यांसोबत फोटो काढा पण पक्षासाठी योग्य ते कामही करा, अन्यथा वेगळा विचार होईल, असा सज्जड दम पटेल यांनी दिला.

सर्वांची भाकीते खोटी - सुनिल तटकरे

सर्वांची भाकीते खोटी ठरवत चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले. या यशात विदर्भाचा वाटा मोठा असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विदर्भातील कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवली. महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमच्यावर संशय व्यक्त करण्यात आला परंतु आम्ही आजही शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४