शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

"राज्यात सरकार अस्तित्वात नाही; अपात्र असताना मंत्रिपदाची शपथ घेणं हे घटनाबाह्य"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 16:55 IST

मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे, असे राऊत म्हणाले.

नागपूर : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशीर असल्याचे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर राऊत यांनी खोचक टीका केली. सुप्रीम कोर्टात अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. अपात्र असताना १९ तारखेला जर कोणी शपथ घेणार असतील तर ते अत्यंत घटनाबाह्य आहे, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. यासह जय भवानी जय शिवाजी, संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ज्या पद्धतीनं या सरकारचं काम चालू आहे मागच्या सरकारने जनतेचं आणि राज्याचं हित पाहून घेतले होते. पण विरोधासाठी विरोध या भुमिकेतून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे. दिवस बदलत जातात भविष्यात सत्तांतर होत असतं, त्यामुळे विरोधासाठी विरोध असं काम करु नये. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना जर १९ तारखेला ते शपथ घेत असेल तर ते घटनाबाह्य आणि घटनाद्रोही आहे. 

पुढे राऊत म्हणाले, मी फडणवीस यांच्या शहरात आलोय. पक्षाच्या कामासाठी आलोय, सगळं जागच्या जागी आहे. माझं स्वागत करायला सगळे आलेय. हे चित्र महाराष्ट्रात दिसतेय. बंड हे भास आहे, शिवसेना अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडलीय. ५६ वर्षांत अनेक संकटं, वादळं आम्ही पाहिले. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला इथे पाठवलंय. मी शिवसैनीकांबाबत बोलतोय. इथे कुणाचे व्यक्तिगत कार्यकर्ते नसतात सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघातून अनेकजण आलेय. त्यांची आज मी बैठक घेतोय, असं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत गुरुवारी पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आहेत. नितीन तिवारी यांना पूर्व नागपूर शहर प्रमुख बनविल्यामुळे शहर शिवसेनेत असंतोष पसरला असताना राऊत यांचा हा दौरा पक्ष संघटनेसाठी महत्त्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे शिवसेनेने राऊत यांना नागपूरची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सातत्याने ते नागपूरचा दौरा करीत असतात. राऊत यांच्या नागपुरातील कार्यक्रमाची माहिती बुधवारी रात्रीपर्यंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नव्हती. आज दुपारी त्यांचे शहरात आगमन झाले. राऊत हे शहरातील शिवसेनेची गटबाजी संपवतील, असे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा