शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यात सरकार अस्तित्वात नाही; अपात्र असताना मंत्रिपदाची शपथ घेणं हे घटनाबाह्य"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 16:55 IST

मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे, असे राऊत म्हणाले.

नागपूर : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशीर असल्याचे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर राऊत यांनी खोचक टीका केली. सुप्रीम कोर्टात अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. अपात्र असताना १९ तारखेला जर कोणी शपथ घेणार असतील तर ते अत्यंत घटनाबाह्य आहे, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. यासह जय भवानी जय शिवाजी, संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ज्या पद्धतीनं या सरकारचं काम चालू आहे मागच्या सरकारने जनतेचं आणि राज्याचं हित पाहून घेतले होते. पण विरोधासाठी विरोध या भुमिकेतून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे. दिवस बदलत जातात भविष्यात सत्तांतर होत असतं, त्यामुळे विरोधासाठी विरोध असं काम करु नये. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना जर १९ तारखेला ते शपथ घेत असेल तर ते घटनाबाह्य आणि घटनाद्रोही आहे. 

पुढे राऊत म्हणाले, मी फडणवीस यांच्या शहरात आलोय. पक्षाच्या कामासाठी आलोय, सगळं जागच्या जागी आहे. माझं स्वागत करायला सगळे आलेय. हे चित्र महाराष्ट्रात दिसतेय. बंड हे भास आहे, शिवसेना अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडलीय. ५६ वर्षांत अनेक संकटं, वादळं आम्ही पाहिले. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला इथे पाठवलंय. मी शिवसैनीकांबाबत बोलतोय. इथे कुणाचे व्यक्तिगत कार्यकर्ते नसतात सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघातून अनेकजण आलेय. त्यांची आज मी बैठक घेतोय, असं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत गुरुवारी पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आहेत. नितीन तिवारी यांना पूर्व नागपूर शहर प्रमुख बनविल्यामुळे शहर शिवसेनेत असंतोष पसरला असताना राऊत यांचा हा दौरा पक्ष संघटनेसाठी महत्त्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे शिवसेनेने राऊत यांना नागपूरची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सातत्याने ते नागपूरचा दौरा करीत असतात. राऊत यांच्या नागपुरातील कार्यक्रमाची माहिती बुधवारी रात्रीपर्यंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नव्हती. आज दुपारी त्यांचे शहरात आगमन झाले. राऊत हे शहरातील शिवसेनेची गटबाजी संपवतील, असे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा