शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

मनोरंजनाचे साहित्य खूप झाले, आता वेदनाही लिहा - शरद निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 12:46 PM

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानातून निंबाळकर बोलत होते.

ठळक मुद्देपहिल्या मायमराठी साहित्य संमेलनाचा समारोप

नागपूर : मनोरंजनाचे साहित्य खूप लिहिले गेले, वाचले गेले... आता, त्यापलीकडे जाऊन दु:खाला वेदनेचे रूप देणाऱ्या साहित्याची निर्मिती होणे, ते लिहिले जाणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले.

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपीय सत्रात अध्यक्षस्थानातून निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, जिल्हाधिकारी आर. विमला, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, विष्णू मनोहर, डॉ. दत्तात्रय वाटमोडे, डॉ. विजया मारोतकर, विशाला देवतळे, डॉ. वडते, डॉ. भारती खापेकर उपस्थित होते.

जाती-जातीचे साहित्य खूप लिहिले गेले. मात्र, आता जे माझे तेच तुझे असा भाव निर्माण करणारे सेक्युलर साहित्य निर्माण व्हावे. सेक्युलर साहित्य, हा शब्दच या संमेलनाची देणगी असल्याचे कौतुक डॉ. शरद निंबाळकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी डॉ. सुरेश खोंडे, आशा पांडे, डॉ. स्मिता वंजारी, मनोज बालपांडे, वैशाली कोहळे, मंगेश बावसे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अरुणा भाेंडे यांनी केले तर आभार विजया मारोतकर यांनी मानले.

अभिजात भाषा, हा भगव्याच्या अस्मितेचा सवाल - सबनीस

मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळावी, असे शेकडो प्रस्ताव सादर झाले तरीदेखील दिल्ली हादरली नाही. अभिजात भाषेची मागणी ही काळजाची आहे आणि काळीज दिल्लीला हलवणारे असेल तर मोदींनाही ती मागणी पूर्ण करावीच लागेल. शेवटी मराठी हा लोकमान्य, सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याच्या अस्मितेचा सवाल असल्याचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.

साहित्य म्हणजे, रिकामटेकडेपणाचे कार्य नव्हे - शोभणे

वर्तमानात आयुष्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे रिकामा वेळ म्हणून अनेकांना साहित्यिक होण्याची हौस लागली आहे. मात्र, साहित्य हे रिकामटेकडेपणाचे काम नसून साहित्यनिर्मितीत गुंतण्यापूर्वी आधी साहित्य वाचन महत्त्वाचे असल्याचे मत कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी गायले गाणे

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी समारोपीय सत्रात आपल्या भाषणाच्या वेळी ‘पल पल खुशियो से भरा हैं जीवन, हर मोड पे मिल जाते हैं बाहे फैलाये, छोटी छोटी खुशियाँ’ ही स्वरचित कविता व ‘जीवलगा’ हे चित्रपट गीत सादर करत स्वत:तील साहित्य व कलारसिकतेचे दर्शन घडविले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक