शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पावसाच्या ‘यलो अलर्ट’ने वाढली क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची धडधड; टी-ट्वेंटी सामन्यावर पावसाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 22:54 IST

Nagpur News २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.  त्यामुळे नागपुरात होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार की नाही म्हणून क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.

ठळक मुद्दे२१ ते २३ पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजतीन वर्षांनंतर होतो आंतरराष्ट्रीय सामना

 

नागपूर : येत्या २३ सप्टेंबर रोजी जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-ट्वेंटी सामना आयोजित करण्यात आला आहे; परंतु याच दम्यान हवामान विभागाने २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.  त्यामुळे जवळपास तीन वर्षांनंतर नागपुरात होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार की नाही म्हणून क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.

नागपुरात जवळपास तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये मोठा उत्साह आहे. रविवारी काही मिनिटातच ऑनलाइन तिकीट विकल्या गेले. सोमवारी तिकीट बुक करणाऱ्या क्रिकेटप्रेमींची मोठी रांग सिव्हिल लाइन्स येथील व्हीसीएवर पाहायला मिळाली. ज्या लोकांनी ऑनलाइन तिकीट बुकिंग केली होती, त्यांनी आज प्रत्यक्ष व्हीसीएवर जाऊन काउंटरवरून तिकीट मिळवली. नागपुरात १० नोव्हेंबर २०१९ रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-ट्वेंटी सामना खेळला गेला होता. त्यानंतर कोविडचे संकट आले. कोविडनंतर नागपुरात होत असलेल्या या सामन्याबाबत विशेष उत्साह आहे.

- व्हीसीएने काढला ५ कोटींचा विमा

व्हीसीएने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याचा ५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे. जर सामना पावसामुळे एकही चेंडू न फेकता रद्द केला जाईल तर व्हीसीएला संबंधित रक्कम विमा कंपनीमार्फत मिळेल. जर सामन्यादरम्यान एकही चेंडू टाकला गेला तर विमा कंपनीकडून कुठलीही नुकसानभरपाई मिळणार नाही. सामना रद्द झाला तर तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांना तिकिटाची रक्कम परत केली जाईल.

- मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर-पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्रासह सायक्लोनिक सर्क्लुलेशन तयार झाले आहे. येत्या २४ तासांत ते उत्तर पश्चिमच्या दिशेने पुढे सरकेल. ओडीशा, छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये पोहोचेल. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असले तरी अनेकदा अलर्ट अपयशीसुद्धा ठरले आहेत. नागपुरात सोमवारी आकाशात ढग दाटून आले होते. मंगळवारीसुद्धा काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Vidarbha Cricket Associationविदर्भ क्रिकेट असोसिएशनVidarbha Cricket Association, Jamthaविदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा