शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

रोजगाराच्या शोधात निघालेल्या बिहारी युवकावर काळाची झडप

By नरेश डोंगरे | Updated: January 2, 2024 23:44 IST

तेलंगाणा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू : गाडी थांबवली, मात्र वेळ निघून गेली

नागपूर : कामाच्या शोधात आपले गाव, आपला प्रांत सोडून तो परप्रांतात गेला. तेथे भ्रमनिरास झाल्याने तो राजधानी दिल्लीत रोजगार शोधण्यासाठी निघाला. मात्र, धावत्या गाडीतून तो खाली पडला आणि काळाने डाव साधला. त्याचा मृतदेहच त्याच्या गावाला परत नेण्याची वेळ त्याच्या आप्तस्वकीयांवर आली आहे. मन विषन्न करणारी ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता बुटीबोरी-गुमगावजवळ घडली.

जितेंद्रकुमार सिकंदास (वय १९) असे मृताचे नाव आहे. सूत्रांनुसार, बिहारमध्ये राहणाऱ्या जितेंद्रच्या कुटुंबात आई बहीण आणि एक भाऊ आहे. घरची स्थिती हलाखीची आणि गावात रोजगार नसल्याने जितेंद्र त्याचा चुलतभाऊ विक्रमसोबत काम शोधण्यासाठी दि. २७ डिसेंबरला सिकंदराबादला गेला होता. तेथे मनासारखा रोजगार न मिळाल्याने या दोघांनी दिल्लीला जाऊन काम करण्याचा विचार केला. त्यानंतर ते तेलंगणा एक्स्प्रेसने दिल्लीसाठी निघाले. दुपारी ४च्या सुमारास गाडी बुटीबोरी ते गुमगाव दरम्यान आली असताना अचानक जितेंद्र धावत्या गाडीतून खाली पडला. ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली. गंभीर जखमी झालेल्या जितेंद्रला गार्डच्या व्हॅनमध्ये ठेवण्यात आले. गार्डने ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे डॉक्टरला दिली. त्यानुसार, गाडी नागपुरात येताच रेल्वे डॉक्टरने गार्डच्या डब्यात असलेल्या जितेंद्रची तपासणी केली. मात्र, वेळ झाली होती. जितेंद्रचे प्राणपाखरू उडून गेले होते.

काय करावे, कसे करावे?

रोजगाराच्या शोधात सोबत निघालेल्या चुलतभावाचा अशा पद्धतीने अंत झाल्याने विक्रमसिंगला जोरदार मानसिक धक्का बसला आहे. काय करावे, कसे करावे? असे प्रश्न त्याला पडले आहे. अत्यंत हलाखीची स्थिती असल्याने जितेंद्रच्या कुटुंबीयांना इकडे येणे शक्य होणार नाही. त्यामुळे जितेंद्रचे शव तिकडे कसे न्यावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे पोलिस या संबंधाने चाैकशी करीत आहेत. 

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघातrailwayरेल्वे