शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार

By कमलेश वानखेडे | Updated: September 2, 2023 15:25 IST

गृहखात्याच्या इशाऱ्यावर  हा लाठीचार्ज झाला

नागपूर : मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज झाला, राज्य सरकारची उदासीनता या घटनेला कारणीभूत आहे. ईडब्ल्यूएसमुळे तसेही 50 टक्क्यांवर आरक्षण गेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर करून केंद्राला पाठवून आरक्षण द्यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राणे सामितीने निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर आरक्षण रद्द केले. ही लढाई आता न्यायालयीन राहिली नाही, इन्द्रा सहानीच्या निर्णयानंतर ईडब्लुएसला १० टक्के आरक्षण रस्त्यावर न उतरता देऊ शकते,  मग मराठ्यांना का देऊ शकत नाही, न्याय देण्याची भूमिका का घेत नाही ? एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलाने पाठवलेले पत्रत ठोस उत्तर नाही. कालच्या घटनेचे व्हिजुअल पाहिले, पंडालमध्ये जरांगेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पोलीस पोहचले. हे आंदोलन संपवण्यासाठी पोलीस कोणाच्या आदेशाने पोहचले? संरक्षण तोडण्यासाठी महिलांनी कठडा केला असताना घोषणा देत असताना लाठीचार्ज सुरू केला असता मराठा समाजाच्या तरुणांनी आक्रोश केला, पण गृहखात्याच्या इशाऱ्यावर  हा लाठीचार्ज झाला, असे वडेट्टीवार म्हणाले.

मराठा समाजासोबत बनवाबनवी सुरू आहे. मागील महिन्यात ४ दलितांवर हल्ला झाला, वारकऱ्यांना मारहाण झाली. आंदोलनाचे मोठं स्वरूप होईल म्हणून आंदोलन चिघळले. केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरच्या विशेष अधिवेनशनात हा मुद्दा मांडून आरक्षण द्यावे. ओबीसीत आरक्षण द्यायचे असल्यास त्यात २७ टक्क्यावरून वाढ करून त्यातून द्या, आम्हाला  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भूमीका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आमचा पाठिंबा आहे... म्हणजे आम्ही आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे सांगू. आमचा विरोध नाही, 52 टक्के ओबीसींची लोकसंख्या आहे, मराठा संख्या जोडल्यास संख्या 25 टक्के जाईल, त्यामुळे आरक्षण वाढवणे ही आमची भूमिका आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

मतांसाठी हा विषय सुद्धा पुढे येईल, ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटेल अशी शक्यता आहे, त्यामुळे सगळ्यांनी सावध व्हावे. हिंदू मुस्लिम करून दंगा करून यश मिळत नसल्याने हा विषय आणला जाऊ शकतो, मतांसाठीचा हा खेळ असू शकते, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

सर्वोच्च न्यायलयात रिव्हिज्यु पिटीशन मधून काहिच होणार नाही. राजकीय इच्छाशक्ती शक्तीतून यातुन मार्ग निघेल. न्यायालयाच्या लढाईतून काही होणार नाही. आता राजकारण करत आहे असे म्हणण्यात अर्थ नाही, घटना निंदनीय आहे, विरोधक आपली बाजू समजून घेण्यासाठी जातील. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच हा विषय सुटू शकतो.

वन नेशन वन इलेक्शन आता का?

यापूर्वी सुद्धा वन नेशन होते, मग आताच  वन नेशन वन इलेक्शन आता का? यासाठी राज्याची संमती लागते, 12 मुख्यमंत्री आमच्याकडे आहे, यात सगळ्यांची संमती असल्यास ते असले तर त्यांनी ते करावे. सद्या जनतेची दिशाभूल केली जात आहे. केंद्र सरकारला पराभव दिसत असून पाच राज्याचे सर्व्हे भाजप विरोधात आल्याने हे त्यांनी पिल्लू सोडले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारOBCअन्य मागासवर्गीय जातीmarathaमराठा