शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

‘समृद्धी’च्या प्रचाराची घाई, मानव-वन्यजीव अपघातांचे कारण हाेई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 10:59 IST

केंद्रीय मंत्रालयाच्या समितीचे ताशेरे : सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून सुरू केला महामार्ग

नागपूर : सुसाट धावणारा समृद्धी महामार्ग सुरू करण्यासाठी झालेली घाई मानवासह वन्यजीवांच्या जीवावर उठली आहे. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या क्षेत्रीय सशक्त समिती (आरईसी) ने यावर ताशेरे ओढले आहेत. महामार्गाच्या दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंत न बांधण्यासह अनेक सुरक्षा मानके अर्धवट साेडून महामार्ग सुरू करण्यात आला, ज्यामुळे दरराेज हाेणाऱ्या अपघातात वन्यजीवांचा व माणसांचाही बळी जात असल्याचे समितीने नमूद केले.

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून सातत्याने अपघातांचीही मालिका सुरू आहे. साेलापूरमध्ये १२ काळवीटांच्या अपघाती मृत्यूसह दरराेज एक ना एक प्राण्याचा महामार्गावर बळी जात आहे. याची दखल घेत अशासकीय सदस्य प्रा. सुरेश चाेपणे, एआयजीएफचे सी. बी. ताशिलदार, तांत्रिक अधिकारी एन. के. डिमरी हे सदस्य असलेल्या आरईसीद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याचे पीसीसीएफ (वन्यजीव) महीप गुप्ता, सीसीएफ पुणे एन. आर. प्रवीण, नाेडल अधिकारी नरेश झुरमुरे, साेलापूरचे डिसीएफ धैर्यशील पाटील, डब्ल्यूआयआयचे वैज्ञानिक डाॅ. बिलाल हबीब तसेच एमएसआरडीसी व एनएचएआयचे अधिकारी उपस्थित हाेते. समितीने या बैठकीचा अहवाल केंद्रीय मंत्रालयाला सादर केला आहे. मंत्रालयाच्या वेबसाईटवरील अहवालानुसार समितीने तीन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गासाठी परवानगी देताना वन्यजीव संरक्षणाबाबतच्या उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. मात्र, या उपाययाेजना न करता वन्यजीव सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आराेप समितीने केला आहे.

महामार्ग सुरू करण्यापूर्वी दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंत तयार करणे, वन्यजीवांसाठी अंडरपास, ओव्हरपास याेग्य पद्धतीने तयार करणे, महामार्गावर थाेड्या थाेड्या अंतरावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे अशा अनेक सूचना केल्या हाेत्या. मात्र, एमएसआरडीसी किंवा एनएचएआयने यातील बहुतेक सूचना पूर्णच केल्या नाहीत. सुरक्षा भिंत नसल्याने वन्यप्राणी महामार्गावर येतात व अपघातांचे बळी ठरतात.

वाहनचालकांनाही धाेका हाेत आहे. साेलापूर जिल्ह्यात वनक्षेत्रातून बनविलेला ओव्हरपास सदाेष असल्याचेही आढळून आले आहे. समितीने तातडीने सुरक्षा भिंत तयार करण्यासह साेलापूर ओव्हरपास दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पीसीसीएफ यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन सीसीएफकडून अहवाल घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तीन महिन्यांत सुरक्षा भिंत

आरईसीने ताशेरे ओढल्यानंतर एमएसआरडीसीने येत्या तीन महिन्यांत महामार्गाच्या दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. तसेच साेलापूर सुधारित ओव्हरपासचे कामही तातडीने करण्यात येईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरईसी, केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ किंवा इतर शासकीय संस्था परवानगी दिल्यानंतर व महामार्ग सुरू झाल्यानंतर पुढचा मागाेवा घेत नाही किंवा अंमलबजावणी संस्था दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाही. यावेळी प्राण्यांचे मृत्यू हाेत असल्याने आरईसीने पहिल्यांदा मागाेवा घेत बैठक बाेलावली हाेती व मानव-वन्यजीवांचे अपघात राेखण्यासाठी उपाययाेजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- प्रा. सुरेश चाेपणे, सदस्य, आरईसी, एमओएफईसीसी.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्ग