शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या प्रचाराची घाई, मानव-वन्यजीव अपघातांचे कारण हाेई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 10:59 IST

केंद्रीय मंत्रालयाच्या समितीचे ताशेरे : सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून सुरू केला महामार्ग

नागपूर : सुसाट धावणारा समृद्धी महामार्ग सुरू करण्यासाठी झालेली घाई मानवासह वन्यजीवांच्या जीवावर उठली आहे. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या क्षेत्रीय सशक्त समिती (आरईसी) ने यावर ताशेरे ओढले आहेत. महामार्गाच्या दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंत न बांधण्यासह अनेक सुरक्षा मानके अर्धवट साेडून महामार्ग सुरू करण्यात आला, ज्यामुळे दरराेज हाेणाऱ्या अपघातात वन्यजीवांचा व माणसांचाही बळी जात असल्याचे समितीने नमूद केले.

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून सातत्याने अपघातांचीही मालिका सुरू आहे. साेलापूरमध्ये १२ काळवीटांच्या अपघाती मृत्यूसह दरराेज एक ना एक प्राण्याचा महामार्गावर बळी जात आहे. याची दखल घेत अशासकीय सदस्य प्रा. सुरेश चाेपणे, एआयजीएफचे सी. बी. ताशिलदार, तांत्रिक अधिकारी एन. के. डिमरी हे सदस्य असलेल्या आरईसीद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याचे पीसीसीएफ (वन्यजीव) महीप गुप्ता, सीसीएफ पुणे एन. आर. प्रवीण, नाेडल अधिकारी नरेश झुरमुरे, साेलापूरचे डिसीएफ धैर्यशील पाटील, डब्ल्यूआयआयचे वैज्ञानिक डाॅ. बिलाल हबीब तसेच एमएसआरडीसी व एनएचएआयचे अधिकारी उपस्थित हाेते. समितीने या बैठकीचा अहवाल केंद्रीय मंत्रालयाला सादर केला आहे. मंत्रालयाच्या वेबसाईटवरील अहवालानुसार समितीने तीन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गासाठी परवानगी देताना वन्यजीव संरक्षणाबाबतच्या उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. मात्र, या उपाययाेजना न करता वन्यजीव सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आराेप समितीने केला आहे.

महामार्ग सुरू करण्यापूर्वी दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंत तयार करणे, वन्यजीवांसाठी अंडरपास, ओव्हरपास याेग्य पद्धतीने तयार करणे, महामार्गावर थाेड्या थाेड्या अंतरावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे अशा अनेक सूचना केल्या हाेत्या. मात्र, एमएसआरडीसी किंवा एनएचएआयने यातील बहुतेक सूचना पूर्णच केल्या नाहीत. सुरक्षा भिंत नसल्याने वन्यप्राणी महामार्गावर येतात व अपघातांचे बळी ठरतात.

वाहनचालकांनाही धाेका हाेत आहे. साेलापूर जिल्ह्यात वनक्षेत्रातून बनविलेला ओव्हरपास सदाेष असल्याचेही आढळून आले आहे. समितीने तातडीने सुरक्षा भिंत तयार करण्यासह साेलापूर ओव्हरपास दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पीसीसीएफ यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन सीसीएफकडून अहवाल घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तीन महिन्यांत सुरक्षा भिंत

आरईसीने ताशेरे ओढल्यानंतर एमएसआरडीसीने येत्या तीन महिन्यांत महामार्गाच्या दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. तसेच साेलापूर सुधारित ओव्हरपासचे कामही तातडीने करण्यात येईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरईसी, केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ किंवा इतर शासकीय संस्था परवानगी दिल्यानंतर व महामार्ग सुरू झाल्यानंतर पुढचा मागाेवा घेत नाही किंवा अंमलबजावणी संस्था दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाही. यावेळी प्राण्यांचे मृत्यू हाेत असल्याने आरईसीने पहिल्यांदा मागाेवा घेत बैठक बाेलावली हाेती व मानव-वन्यजीवांचे अपघात राेखण्यासाठी उपाययाेजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- प्रा. सुरेश चाेपणे, सदस्य, आरईसी, एमओएफईसीसी.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्ग