शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची दिशाभूल करणाऱ्या मंत्रालयाला पहिला नंबर, तर गचके देणारे बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2025 18:31 IST

Nagpur : सरकारच्या रिपोर्ट कार्डवर बाळासाहेब थोरात यांची टीका

कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांनी मंत्रालयांचे रिपोर्ट कार्ड सादर करून नंबर दिले आहेत. महिला बालविकास विभागाला पहिला क्रमांक दिला आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचे आश्वासन पूर्ण केले नाही. १५०० चे पण नीट पुर्ण करत नाही. महिलांची दिशाभूल करू शकतो असे दाखवले त्यामुळे या विभागाला पहिला क्रमांक दिला असेल. तर राज्यातील नागरिक रस्त्यांवर गचके खात आहेत. त्यामुळे त्यांना सरकारची आठवण येते म्हणून बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक दिला असावा, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डवर केली.

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, मी अनेक वर्ष मंत्री राहिलो आहे. त्यामुळे महायुती सरकारचे रेटिंग देण्याचे काय निकष आहेत हे तपासले पाहिजे. सर्वच स्तरावर हे विभाग अपयशी ठरले आहेत. आधार नसलेल्यांना संजय गांधी निराधारचा लाभ दिला जातो. मात्र चार महिने पासून त्यांना पैसे गेले नाही. निराधार लोकांची काळजी घेऊ शकत नाही म्हणजे, कुचकामी सरकार आहे. हे सरकार १०० दिवसात अपयशी ठरले,असा ठपका त्यांनी ठेवला. पिक विमा योजना बंद केली यासाठी कृषी विभागाला तिसरे स्थान दिले आहे. सर्व रस्त्यांवरील एसटी बंद पडलेल्या, खळखळ झालेल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करू शकत नाही प्रवासी हवालदील झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी अपयशी लोकांना पाहिले स्थान देणारा क्रम लावला की काय अशी अशी शंका येते. मंत्रिमंडळाचे जे वातावरण आहे त्याचा सुद्धा परिणाम यावर निकालावर दिसतोय. सामान्य प्रशासन विभागाची खराब कामगिरी दाखवली. याबाबतीत मुख्यमंत्री खरे बोलले, असा चिमटाही त्यांनी घेतला.

नितेश राणे यांचे महान कार्यनितेश राणे यांचे महान कार्य राज्यात सुरू आहे. दोन समाजात भेद कसा निर्माण करता येईल, यावर एकमेव कार्यक्रम ते राबवत असल्यामुळे त्यांना पाचव स्थान दिले असेल, असा टोला थोरात यांनी लगावला.

दोन पवारांमध्ये काय सुरू आहे ?शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही कॅमेऱ्यापुढे जास्त येत असतात. त्यांनाच यावर विचारलं पाहिजे. नेमकं त्यांचं काय सुरू आहे, यावर मला काही सांगता येणार नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर