शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने गोवारी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अन् डिग्रीही रोखली, विद्यार्थी संतप्त, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:07 IST

आमचा काय दोष, आम्हाला तर उच्च न्यायालयाने शिष्यवृत्ती दिली

नागपूर : गोवारी संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर शासनाने गोवारी जमातीच्या प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना २०१८-१९ मध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांत प्रवेश देऊन शिष्यवृत्ती प्रदान केली. पण २०२०-२१ पासून महाराष्ट्र शासनाने त्याच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र असूनसुद्धा शिष्यवृत्ती आणि फ्री शिप देणे बंद केले. गोवारीसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०२० रोजी रद्दबातल केला. याचा आधार घेऊन शासनाने गोवारी विद्यार्थ्यांवर अन्याय केला. पण आमचे प्रवेश तर त्यापूर्वीचे आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गात आमचे प्रवेश झाले आहेत. तरीसुद्धा शिष्यवृत्ती व फ्री शिप का बंद केली? असा सवाल व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

आज ११४ शहीद गोवारींचा २९ वा स्मृतिदिन आहे. आजही गोवारी समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाने कसेबसे उघडले होते, पण सरकारने त्यात हस्तेक्षेप करत तेही बंद केले. विदर्भात बहुसंख्येने असलेल्या गोवारी समाजातील ११४ गोवारी बांधवांचा हक्काच्या लढाईसाठी बळी गेला. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी ही घटना घडली होती. तेव्हापासून हा समाज न्यायालयीन लढाई लढतो आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले अन् गोवारींचा तोंडाशी आलेला घास परत हिसकावला गेला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारींच्या बाजूने दिलेल्या निर्णयानंतर गोवारी समाजाच्या काही विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून एमबीबीएस, बीएएमएस, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, नर्सिंग, बीसीए, बीफार्म आदी अभ्यासक्रमांत प्रवेश मिळाला होता व शिष्यवृत्तीस ते पात्रही ठरले होते. पण त्यांना शिष्यवृत्तीही नाकारली आणि त्यांची डिग्रीही मिळाली नाही.

- सरकारने केली चुकी, बळी गेले ११४ गोवारी

२४ एप्रिल १९८५ च्या शासन निर्णयात गोवारी हे गोंडगोवारीच्या नामसादृष्याचा फायदा घेतात. गोवारी व गोंडगोवारी ही वेगळी जमात आहे, असा उल्लेख तत्कालीन सरकारने केल्याने गोवारींच्या सवलती बंद झाल्या होत्या. त्याचा भडका २३ नोव्हेंबर १९९४ रोजी उडाला. हिवाळी अधिवेशनावर आलेल्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्यात व पोलिसांच्या फायरिंगमुळे तारांबळ उडाली. यावेळी जिवंत विद्युत तार मोर्चात पडून आणि चेंगराचेंगरीमुळे गोवारी शहीद झाले.

- अखेर अभ्यासक्रम सोडून दिला

३२ वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. धनगरांना आदिवासीत समाविष्ट करावे, याकरिता शासनाने कमिटी नेमली. मराठ्यांच्या नोंदी तपासून कुणबी-मराठाकरिता आदेश दिला. परंतु, आम्ही गोंडगोवारी असूनही आमच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पदवीपासून वंचित ठेवले आहे.

- कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटन

टॅग्स :SocialसामाजिकEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीCourtन्यायालय