शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

सरकारने गोवारी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अन् डिग्रीही रोखली, विद्यार्थी संतप्त, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:07 IST

आमचा काय दोष, आम्हाला तर उच्च न्यायालयाने शिष्यवृत्ती दिली

नागपूर : गोवारी संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर शासनाने गोवारी जमातीच्या प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना २०१८-१९ मध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांत प्रवेश देऊन शिष्यवृत्ती प्रदान केली. पण २०२०-२१ पासून महाराष्ट्र शासनाने त्याच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र असूनसुद्धा शिष्यवृत्ती आणि फ्री शिप देणे बंद केले. गोवारीसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०२० रोजी रद्दबातल केला. याचा आधार घेऊन शासनाने गोवारी विद्यार्थ्यांवर अन्याय केला. पण आमचे प्रवेश तर त्यापूर्वीचे आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गात आमचे प्रवेश झाले आहेत. तरीसुद्धा शिष्यवृत्ती व फ्री शिप का बंद केली? असा सवाल व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

आज ११४ शहीद गोवारींचा २९ वा स्मृतिदिन आहे. आजही गोवारी समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाने कसेबसे उघडले होते, पण सरकारने त्यात हस्तेक्षेप करत तेही बंद केले. विदर्भात बहुसंख्येने असलेल्या गोवारी समाजातील ११४ गोवारी बांधवांचा हक्काच्या लढाईसाठी बळी गेला. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी ही घटना घडली होती. तेव्हापासून हा समाज न्यायालयीन लढाई लढतो आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले अन् गोवारींचा तोंडाशी आलेला घास परत हिसकावला गेला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारींच्या बाजूने दिलेल्या निर्णयानंतर गोवारी समाजाच्या काही विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून एमबीबीएस, बीएएमएस, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, नर्सिंग, बीसीए, बीफार्म आदी अभ्यासक्रमांत प्रवेश मिळाला होता व शिष्यवृत्तीस ते पात्रही ठरले होते. पण त्यांना शिष्यवृत्तीही नाकारली आणि त्यांची डिग्रीही मिळाली नाही.

- सरकारने केली चुकी, बळी गेले ११४ गोवारी

२४ एप्रिल १९८५ च्या शासन निर्णयात गोवारी हे गोंडगोवारीच्या नामसादृष्याचा फायदा घेतात. गोवारी व गोंडगोवारी ही वेगळी जमात आहे, असा उल्लेख तत्कालीन सरकारने केल्याने गोवारींच्या सवलती बंद झाल्या होत्या. त्याचा भडका २३ नोव्हेंबर १९९४ रोजी उडाला. हिवाळी अधिवेशनावर आलेल्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्यात व पोलिसांच्या फायरिंगमुळे तारांबळ उडाली. यावेळी जिवंत विद्युत तार मोर्चात पडून आणि चेंगराचेंगरीमुळे गोवारी शहीद झाले.

- अखेर अभ्यासक्रम सोडून दिला

३२ वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. धनगरांना आदिवासीत समाविष्ट करावे, याकरिता शासनाने कमिटी नेमली. मराठ्यांच्या नोंदी तपासून कुणबी-मराठाकरिता आदेश दिला. परंतु, आम्ही गोंडगोवारी असूनही आमच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पदवीपासून वंचित ठेवले आहे.

- कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटन

टॅग्स :SocialसामाजिकEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीCourtन्यायालय