शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

दीक्षाभूमीची जागा भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीची - भीमराव आंबेडकर

By आनंद डेकाटे | Updated: July 5, 2024 20:51 IST

दीक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करा

नागपूर : दीक्षाभूमीची मालकी ही स्मारक समितीची नाही. समितीकडे केवळ स्मारक बांधण्याचीच जबाबदारी होती. दीक्षाभूमीची जागा ही भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीची असून यासंदर्भातील पुरावेही आमच्याकडे आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, एनआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून याची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्या सुनावणीला मी स्वत: पुराव्यासह हजर राहणार आहे. स्मारक समितीला ‘ब्रीच ऑफ ट्रस्ट’ अंतर्गत दीक्षाभूमी सांभाळायला दिली होती. त्यात अपयशी ठरल्याने धर्मदाय आयुक्तांची भेट घेऊन समितीच बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

दीक्षाभूमीवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भीमराव आंबेडकर यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी परिसरातील ज्या भूमिगत पार्किंगच्या कामाचीही पाहणी केली. त्यानंतर पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली शेवटची क्रांती म्हणजे धम्मक्रांती होय. याच दीक्षाभूमीत त्यांनी ती ऐतिहासिक क्रांती केली. त्यामुळे त्याची छेडखानी आम्ही होऊ देणार नाही.

स्मारक समितीतील लोक मग्रुर आहेत. लोकांशी संवाद साधत नाही. दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगला येथील खोदकामाला अनेक दिवसांपासून लोकांचा विरोध होता. परंतु कुणी ऐकायलाच तयार झाले नाही. त्यामुळे लोकांनी आंदोलन केले. आंदोलन शांततेत सुरू होते. परंतु, राजकीय पक्षाचे नेते असलेल्या समिती सदस्यांच्या कार्यकर्त्यांनीच जाळपोळ करून वातावरण खराब केल्याचा आरोपही भीमराव आंबेडकर यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे पद्माकर गणवीर, भीमराव फुसे, वंचित बहुजन आघाडीचे राहुल दहीकर आदी उपस्थित होते.

भूमिगत पार्किंग मोठ्या षडयंत्राचा भागदीक्षाभूमीवर ओबीसींसह अल्पसंख्याक समाजही मोठ्या संख्येने धम्मचक्र प्रवर्तन दिनी हजेरी लावतात. ती संख्या कमी करण्यासाठी षड्यंत्र रचून भूमिगत पार्किंगचा घाट रचला जात आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनी लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. नुकत्याच हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे तर घडवायची नाही ना? अशी शंकाही भीमराव आंबेडकर यांनी उपस्थित केली.

- भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या, जागा पूर्ववत करा१ जुलै रोजी दीक्षाभूमीवर झालेले आंदोलन हे उत्स्फुर्त होते, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लावलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे. तसेच येथील खोदकाम केलेली जागा तातडीने पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणीही भीमराव आंबेडकर यांनी केली. दीक्षाभूमीवरील जागा १५ दिवसात पूर्ववत समतल न केल्यास स्मारक समितीच्याविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी