शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा ठासून दावा

By कमलेश वानखेडे | Updated: August 19, 2023 17:43 IST

सत्तेसाठी वाटेल ते सुरू, वडेट्टीवारांची टीका

नागपूर : राज्यातील मुख्य खुर्ची सप्टेंबर महिन्यात बदलेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. लवकरच महाराष्ट्रात काय बदल होईल हे जनता बघेल. मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल. आमचं सरकार येईल, असे मी म्हणत नाही. पण खात्रीशीर सांगतो की, सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल. हे मी ठासून सांगतो आहे की, येत्या १५ दिवसात काय बदल होईल हे जनता बघेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय वर्तळाच्या भूवया उंचावल्या आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, कार्यक्रमांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सहसा एकत्र दिसत नाहीत. कधी पुण्याचे तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. कधी मुख्यमंत्री नसतात. यावरून सर्वकाही आलबेल आहे की नाही, अशी शंका येते. पण जनतेला हा खडा तमाशा दिसतो आहे. सत्तेच्या हव्यासापोटी यांनी माहाराष्ट्राची पत घालविली आहे. सत्तेसाठी वाटेल ते सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

कोरडा दुष्काळ सरकारला घोषित करावा लागेल

राज्यात २२ दिवसांपासून पावसाने दडी दडी मारली असून त्यामुळे पीक संकटात आले आहे. नाथसागर धरण फक्त ३४ टक्के भरले आहे. ११ जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करावी लागेल, अशी परिस्थती आहे. सरकारला जवाबदारी स्वीकारून काम करावे लागेल व कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागेल, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एक रुपयात पीक विमा काढणारे सरकार कशी मदत करते हे आता पहावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस