शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत

By योगेश पांडे | Updated: August 15, 2024 12:19 IST

संघ मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा...

नागपूर : बांगलादेशमधीलहिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण झाले पाहिजे. केंद्राने त्यांच्या पातळीवर पावले उचलावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्यांचा हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारताची परंपरा राहिली की आहे, आपण जगाच्या उपकाराकरता उभे राहतो. त्यामुळे आपण कधीच कोणावर आक्रमण केले नाही.जो संकटात होता त्याला मदतच केली. तो आपल्या सोबत कसा व्यवहार करतो हे बघितले नाही. जगभरातील पिडितांकरता आपण हे करतो. सरकार हे करत असते. शेजारील देशांमध्ये जी अस्थिरता आहे, त्यामुळे अनेकांना अराजकता झेलावी लागत आहे. त्या उत्पाताचा हिंदूंना त्रास होत आहे. त्यांना काही कष्ट होऊ नये, त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नये, याची जबाबदारी एक देशाच्या नाते आपल्यावर आहेच. काही गोष्टी सरकारने आपल्या स्तरावरच कराव्या, असे सरसंघचालक म्हणाले. 

जगात अनेक लोक आहेत की ज्यांना अन्य देशांवर वर्चस्व गाजवायचे आहे. त्याकरता आपण सजग रहायचे आहे. आपल्यावर देशाच्या स्व ची रक्षा आणि स्वातंत्र्याची जबाबदारी आहे. त्यासाठी सामान्य समाजाने सुद्धा सजगता ठेवावी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तशी मनोवृत्ती ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

नवीन पिढीने स्वातंत्र्याची रक्षा करावी -केवळ चिंतन करून होत नाही. स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. १८५७ नंतर ९० वर्षाचा संघर्ष चालला. अनेक प्रकारचे लोक त्यात सहभागी झाले .आपल्या देशात प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य नायक झाले. अगदी सामान्य व्यक्तीदेखील स्वातंत्र्याकरता रस्त्यावर उतरला. अनेकजण जेलमध्ये गेले अनेक अनेकांना अनेकदा कारावास झाला. बलिदान करणारा समूह आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा समाज यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आता येणाऱ्या पिढीला स्वतंत्रता   रक्षा करायची आहे, असे डॉ.भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndependence Dayस्वातंत्र्य दिनBangladeshबांगलादेशHinduहिंदू