शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 7:59 PM

मंगळवारी सकाळी मुंबई  येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना तब्बल पाच तास विमानातच अडकून राहावे लागले.

ठळक मुद्दे प्रवासी तब्बल पाच तास अडकले : दुसऱ्या विमानाने पोहचविले नागपुरात

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी सकाळी मुंबई  येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना तब्बल पाच तास विमानातच अडकून राहावे लागले.एअर इंडियाचे ‘एआय ६२७’ हे विमान मंगळवारी सकाळी ५.४५ वाजता मुंबईहून नागपूरसाठी उडणार होते. विमानात सुमारे १०० प्रवासी होते. सकाळी ५.१५ वाजता बोर्डिंग आटोपल्यावर विमान ‘रन-वे’कडे निघाले असता, त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे विमान रन-वेवर न नेता तेथेच थांबविण्यात आले व तांत्रिक दुरुस्ती केली जात असल्याचे सांगण्यात आले. सकाळी ७.३० पर्यंत दुरुस्ती सुरू राहिल्यानंतर संबंधित विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याची घोषणा पायलटने केली. प्रवाशांना दुसºया फ्लाईटमध्ये शिफ्ट केले जाईल, असेही सांगण्यात आले. यानंतर अर्ध्या तासाने ८.०५ वाजता एअर इंडियाचे दुसरे विमान लावण्यात आले व त्यात प्रवाशांना स्थानांतरित करण्यात आले. ८.४० वाजता विमानाने उड्डाण घेतले व सकाळी १०.१० वाजता नागपूर विमानतळावर पोहचले.विमानाला विलंब होत असल्यामुळे सुरुवातीचे दोन तास प्रवाशांनी संयम बाळगला; नंतर मात्र, नेमके काय सुरू आहे, अशी विचारणा रनिंग स्टाफकडे केली. प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर लगेच सूत्रे हलली व दुसऱ्या विमानाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे सकाळी ७.१५ वाजता नागपुरात पोहचणार असलेले प्रवासी १०.१५ वाजता पोहचले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर