शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा घात करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:02 IST

सत्ताधारी भाजपाकडून व त्यांच्या सहयोगी पक्षाकडून विदर्भ राज्य निर्मितीबाबत दिलेली आश्वासने दुर्लक्षित केली आहेत. विदर्भाच्या जनतेत असंतोष आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये जनतेने विदर्भाचा विश्वासघात करणाऱ्या भाजपा व सहयोगी पक्षांना धडा शिकवावा, असा ठराव विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात घेण्यात आला.

ठळक मुद्दे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राष्ट्रीय अधिवेशन : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्ताधारी भाजपाकडून व त्यांच्या सहयोगी पक्षाकडून विदर्भ राज्य निर्मितीबाबत दिलेली आश्वासने दुर्लक्षित केली आहेत. विदर्भाच्या जनतेत असंतोष आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये जनतेने विदर्भाचा विश्वासघात करणाऱ्या भाजपा व सहयोगी पक्षांना धडा शिकवावा, असा ठराव विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात घेण्यात आला.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित दोन दिवसीय अधिवेशनाचा मंगळवारी समारोप झाला. यावेळी विविध विदर्भाच्या मागणीसह विदर्भाचा विकास व राजकीय लढ्याचे ठराव मंजूर करण्यात आले. सद्यस्थितीत देशभर अस्थिर राजकीय परिस्थिती आहे. तिचा फायदा घेऊन केंद्र सरकार विदर्भ राज्याची मागणी टाळत आहे. विदर्भातील ग्रामीण व शहरी आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. या परिस्थितीचे उत्तर विदर्भाचेस्वतंत्र राज्य हेच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने विदर्भ राज्याची निर्मिती त्वरित करावी अशा मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.विदभार्तील पूर्वीचे औद्योगिकरण नष्ट झाले. नवे औद्योगिकरण महाराष्ट्रातील सरकारने होऊ दिले नाही.त्याचा परिणाम विदर्भातील सध्याची गरिबी, दारिद्र्य आणि निराशा हे आहे. नव्याने परिपूर्ण औद्योगिकरण निर्र्माण करण्यासाठी राज्य व्यवस्थेची जबाबदारी मुख्य आहे, ती महाराष्ट्रात पार पाडली जात नाही. विदर्भात औद्योगिक आणि शेती क्षेत्रात सतत अधोगती होत असल्यामुळे उचित रोजगारांचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. त्यांना विदर्भाबाहेर स्थलांतरामुळे विदर्भातील कुटुंबे विघटित होत आहेत. विदर्भातील आमदारांची व खासदारांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. म्हणून विदर्भातील युवकामधील निराशेचे वातावरण बदलविण्यासाठी युद्ध पातळीवर रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे. नव्याने निर्माण होणारा रोजगार पूर्णपणे विदर्भातीलच तरुणांनाच मिळावा आणि ज्यांना रोजगार मिळू शकणार नाही त्यांना उचित बेरोजगारी भत्ता सहा हजार रुपये, अशा मागणीचाही ठराव घेण्यात आला.इतर प्रदेशांच्या तुलनेत विदर्भातील महिलांचे शिक्षण,तंत्रशिक्षण, आरोग्य, रोजगार आणि राहणीमान सर्वात कमी आहे त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण झालेले नाही. अल्पबचत गटांच्याद्वारे ग्रामीण महिलांचे शोषण चालू आहे. त्याचे केंद्र सरकारने त्वरित नियंत्रण करावे, अशी मागणीही करण्यात आली.विदर्भातील शेतीकडे सरकारचे दुर्लक्ष विदर्भातील शेती विकास, सिंचन विकास, शेतमालावर प्रक्रिया, शेतमालासाठी योग्य भाव आदी मुद्यांकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्याच्या परिणाम म्हणूून विदर्भात आणि विशेषकरून अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमणात शेतकरी आत्महत्या होत आहे. सरकार दुर्लक्ष करीत आहे. स्वत:चे स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाच्या शेतीची, शेतकऱ्यांची व संपूर्ण ग्रामीण जनतेची उन्नती साधली जाणार नाही.यापुढे तीव्र आंदोलन विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समिती शांततामय व संविधानात्मक पद्धतीने करीत आहे. परंतु सर्वच आंदोलनकारी संघटना, संस्था असा अनुभव करीत आहे कि, संविधानात्मक पद्धतीने चालू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. याचे विदर्भ राज्यात निर्मितीच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. विदर्भाची निर्मिती करण्यासाठी यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ठराव घेत १ मे रोजी नागपूरच्या विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचा निर्धार करण्यात आला.

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन