शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

राजीनाम्याबाबत २२ ला बोलणार : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 9:24 PM

शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये राहणार की नाही, याबाबत ते २२ सप्टेंबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करीत नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये राहणार की नाही, याबाबत ते २२ सप्टेंबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करीत नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.काटोल फेस्टिव्हलबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. गेल्या १५ ते २० दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कापूस, धान व संत्रा पिकांचे नुकसान झाले असून वातावरणातील बदलामुळे या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून अनेकांनी पिकांवर ट्रॅक्टर फिरविले आहे. अशी बिकट स्थिती असतानाही अद्यापपर्यंत कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली नाही. पावसाअभावी विविध भागातील धरणात पाणी नाही. पेंचसह बहुतेक जलाशय कोरडे पडले असून सिंचनाचेच नाही तर पिण्याच्या पाण्याचेही संकट ओढवणार आहे. जलसंकटाच्या नियोजनासाठी सरकारकडून कुठलीही पावले उचलली गेली नसल्याची टीका त्यांनी केली. एकतर राज्यात पूर्णवेळ कृषिमंत्री नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडे घेऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.येत्या २२ ला काटोलमध्ये विदर्भ युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या अराजकीय मंचचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह आम आदमी पक्षाचे संजय सिंग व प्रीती मेनन हे नेतेही या संसदेत सहभागी होणार आहेत. याबाबत विचारले असताख, या संसदेतच राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार, असे त्यांनी जाहीर केले.

 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखMLAआमदार