शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

नागपूरच्या सिव्हील लाईनमधील झाडांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:00 IST

शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आजच्या घडीला शहरातील काही मुख्य रस्त्यांवर एकही झाड दृष्टीस पडत नाही. असे असले तरी सिव्हील लाईन परिसरात अजूनही हिरवळ टिकून आहे. जुनी आणि मोठमोठी झाडे आजही सिव्हील लाईनच्या रस्त्यावर आढळतात. पण आता ही झाडेही अचानक कोसळायला लागली आहे. गुरुवारी प्रशासकीय इमारत क्रमांक २ समोरील एक भलेमोठे झाड अचानक कोसळले. काही पर्यावरण तज्ञांनी त्या वृक्षाचे सर्वेक्षण केले असता, त्या झाडांची मुळे पाण्याअभावी सुकून गेल्याचे निदर्शनास आले. अशीच काहीशी अवस्था आज सिव्हील लाईन परिसरातील अनेक झाडांची आहे.

ठळक मुद्देविकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचे संकट : अचानक कोसळताहेत वृक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आजच्या घडीला शहरातील काही मुख्य रस्त्यांवर एकही झाड दृष्टीस पडत नाही. असे असले तरी सिव्हील लाईन परिसरात अजूनही हिरवळ टिकून आहे. जुनी आणि मोठमोठी झाडे आजही सिव्हील लाईनच्या रस्त्यावर आढळतात. पण आता ही झाडेही अचानक कोसळायला लागली आहे. गुरुवारी प्रशासकीय इमारत क्रमांक २ समोरील एक भलेमोठे झाड अचानक कोसळले. काही पर्यावरण तज्ञांनी त्या वृक्षाचे सर्वेक्षण केले असता, त्या झाडांची मुळे पाण्याअभावी सुकून गेल्याचे निदर्शनास आले. अशीच काहीशी अवस्था आज सिव्हील लाईन परिसरातील अनेक झाडांची आहे.रविभवन समोरील रस्त्यावर मोठ्या संख्येने वृक्ष आहे. रस्त्याच्या बांधकामामुळे व फूटपाथवर लावलेल्या टाईल्समुळे जमिनीत पाणी मुरायला जागा नाही. सिव्हील लाईनच नाही, तर रामदासपेठच्या मुख्य रस्त्यावर, महाराज बागेतील रस्त्यावर, आकाशवाणी चौक ते संविधान चौकादरम्यानच्या रस्त्यावर सुद्धा वृक्षांना पाणी मिळेल याची सोयच नाही. त्यामुळे पावसाचे पाणी सरळ वाहून जात आहे. जीपीओ चौक ते जिल्हा न्यायालय चौकादरम्यान काही वृक्षांच्या मुळापर्यंत पाण्याचा निचरा व्हावा म्हणून ‘आळे’ तयार केले आहे. महाराज बागेतील रस्त्यावरही वृक्षांना आळे तयार केले आहे. पण हे आळे सुद्धा माती आणि कचऱ्यांनी बुजले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तिथे साचून न राहता वाहून जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पूर्व आणि दक्षिणेकडील फूटथपाथवर मोठ्या प्रमाणात वृक्ष आहे. पण फूटपाथ बनविताना त्या वृक्षांची मुळे टाईल्सने झाकून टाकली आहे. काही ठिकाणी वृक्षांच्या सभोवताली टाईल्स लावल्या नाही. पण पाण्याचा निचऱ्यासाठी त्याचा फायदा नाही. वाहतूक पोलीस स्टेशनजवळील एका मोठ्या वृक्षाच्या पायथ्याला सिमेंटीकरण केले आहे.अशीच काहीशी अवस्था शासकीय कार्यालय परिसरातील वृक्षांची आहे. जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील वृक्षांना डांबरी रस्त्यामुळे पाणी मुरण्याची जागाच नाही. जमिनीत पाणीच मुरत नसल्याने वृक्षांचे आयुष्य घसरत चालले आहे. जराकाही वादळ वारे सुटले की वृक्ष कोलमडण्याचे प्रकार घडत आहेत. पाण्याअभावी झाडांची मुळे कमजोर झाली आहे. प्रशासकीय इमारतीसमोरील ५० ते ६० वर्ष जूने वृक्ष अचानक कोसळल्यामुळे पर्यावरणतज्ञांनी हा धोका परिसरातील अनेक वृक्षांना असल्याचे संकेत दिले आहे.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहेपावसाळा तोंडावर आल्यावर प्रशासन ज्याप्रमाणे नाले, ड्रेजेन लाईन सफाई करते. त्याच प्रमाणे ज्या झाडांना आळे बनविले आहे. त्यांची सफाई करून, त्याला खोल करणे गरजेचे आहे. जिथे पाणी मुरण्याची सोय नाही. तिथे वृक्षाच्या रेडीयसला अर्धा मिटरचे आळे तयार करणे गरजेचे आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ही योग्य वेळ आहे. असे केल्यास वृक्षांचे अचानक कोसळणे नक्कीच थांबेल. सोबतच नवीन रस्ता बनविताना कायदाच करणे गरजेचे आहे. शहरासाठी आज वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे.कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरण तज्ञ

 

टॅग्स :environmentवातावरणnagpurनागपूर