शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

३० एप्रिलपर्यंत दुपारची शाळा, विद्यार्थ्यांना बसणार उन्हाच्या झळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 13:11 IST

विदर्भात खरे तर होळी झाली की उन्हाच्या झळा सुरू होतात आणि एप्रिल महिन्यात तर तापमानाचा पारा चांगलाच तळपतो. अशा शाळा पूर्णवेळ सुरू ठेवणे हे विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देराज्यातील भौगोलिक परिस्थिती बघता निर्णय चुकीचा त्वरित रद्द करण्याची मागणी

संदीप धाबेकर

नागपूर : ३० एप्रिलपर्यंत राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. राज्यातील विविध भागांच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, हा निर्णय अतिशय चुकीचा असल्याची ओरड शिक्षक संघटना व शाळांकडून करण्यात येत आहे.

विदर्भात खरे तर होळी झाली की उन्हाच्या झळा सुरू होतात आणि एप्रिल महिन्यात तर तापमानाचा पारा चांगलाच तळपतो. अशा शाळा पूर्णवेळ सुरू ठेवणे हे विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी होत आहे. या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे की, १ ते ९ व ११ वर्गाच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून करावे. एप्रिल महिन्याचा उन्हाळा प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना फार अवघड जाईल, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्या जयश्री शास्त्री म्हणाल्या की, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील विविध भागांतील वातावरणाची माहिती घेणे गरजेचे होते. ते शाळेचा टाईमटेबल ठरविताना मुंबईतील पाऊस विचारात घेतात; पण विदर्भातील ऊन त्यांना दिसत नाही. साऊथ पब्लिक स्कूलने वार्षिक परीक्षेचे नियोजन १ एप्रिलरोजी केले होते; पण आता त्यांनाही परीक्षेचे टाईमटेबल बदलावे लागणार आहे. सध्या तापमानाचा पारा ४० पार गेला आहे. पुढच्या महिन्यात तापमान आणखी वाढणारच आहे. अशात स्कूल बस, ऑटोमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका आहे.

निर्ण त्वरित रद्द करावा

राज्यातील अनेक शाळांत वीजपुरवठा नाही. कित्येक शाळेत वीज खंडित करण्यात आली आहे. आजही अनेक शाळा टिनाच्या शेडमध्ये भरतात. ग्रामीण भागात शाळेत दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे एकाच खोलीत वर्ग भरविले जातात. एप्रिल महिन्यात सरासरी तापमान ४५ पर्यंत जाते. त्यामुळे मुलांना उष्माघाताचा त्रास नाकारता येत नाही. त्यामुळे या निर्णयाचा शिक्षक, पालकांच्या स्तरावर विरोध होत आहे. हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे के. वाजपेयी, योगेश बन, सुनील पाटील, नरेश कामडे, विलास बोबडे, विनोद पांढरे, सुधीर अनवाने, रंजना कावळे आदींनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीVidarbhaविदर्भ