शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रमण्यम् स्वामी म्हणतात, दाऊदच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे काँग्रेस नेते दबावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:06 IST

काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊन अशी वक्तव्ये देण्यात येत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप नेते खा.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे. नागपुरात लोकतंत्र सेनानी मंचतर्फे आणीबाणी स्मृती दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देपाच मिनिटात रद्द होऊ शकते कलम ३७०लोकतंत्र सेनानी मंचतर्फे नागपुरात आणीबाणी स्मृती दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊन अशी वक्तव्ये देण्यात येत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप नेते खा.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे. नागपुरात लोकतंत्र सेनानी मंचतर्फे आणीबाणी स्मृती दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला लोकतंत्र सेनानी मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश सोनी व ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी हेदेखील उपस्थित होते. भारतातील काळा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईला जातो व तेथून मग ‘स्विस बँक’खात्यात तो जमा होतो. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या काळ्या पैशांची कामे दाऊदने केली व त्यांची यादीच त्याच्याकडे आहे. कॉंग्रेस नेत्यांची काश्मीरबाबतची अलीकडची वादग्रस्त वक्तव्ये त्याच दबावातून आली आहे, असे सुब्रमण्यम् स्वामी म्हणाले. काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७०ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहापोटी हा दर्जा देण्यात आला. मात्र संविधानात लिहिलेले आहे की हे तात्पुरते कलम आहे व याला रद्द करण्यासाठी संसदेच्या मंजुरीची आवश्यकताच नाही. केवळ राष्ट्रपतींच्या मंजुरीने अधिसूचना काढण्याची आवश्यकता आहे. अवघ्या पाच मिनिटांत हे कलम हटू शकत असताना इतके वर्ष का प्रतीक्षा करण्यात आली व सध्याचे सरकारदेखील पाच वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला. दीप्ती कुशवाह यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर रवींद्र कासखेडीकर यांनी आभार मानले.राममंदिरासाठी अध्यादेश येऊ शकतोराममंदिराचा मुद्दा न्यायालयात असला तरी केंद्र सरकार यासंदर्भात कायदा करण्यासाठी संसदेत विशेष प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. एक अध्यादेश जारी करण्यात येईल व निवडणुकांच्या अगोदर राममंदिराचा मार्ग मोकळा करण्यात येईल, असा सुब्रमण्यम् स्वामी यांनी दावा केला. जर वादग्रस्त जागेवर मंदिर असल्याचे पुरावे मिळाले तर जागा मंदिरासाठी देण्यात येईल, असे डॉ.पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान असताना सरकारने शपथपत्रात म्हटले होते. तसे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे सरकारला यात फारशी अडचण जाणार नाही, असेदेखील ते म्हणाले.नेहरूंमुळे आंबेडकर, पटेलांवर अन्यायडॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांंची संविधान व देशनिर्मितीत मौलिक भूमिका होती. मात्र नेहरू यांनी त्यांच्या कार्यकाळात या तिघांनाही भारतरत्न मिळू दिले नाही. पहिले भारतरत्न नेहरू यांनाच मिळाले व त्यावर सहीदेखील स्वत: नेहरू यांचीच होती, असे सुब्रमण्यम् स्वामी यांनी सांगितले.देशात थेट आणीबाणी लागणार नाहीइंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीनंतर पुढील सरकारने संविधानात संशोधन केले. यानुसार थेट आणीबाणी लावणे शक्य नाही. केवळ देशात सशस्त्र विद्रोह झाला तर आणीबाणी लागू शकते. लोकशाही देशाच्या रक्तातच आहे. त्यामुळे जुनी आणीबाणी लागूच शकत नाही. आणीबाणीच्या अफवा खूप उठतात.मात्र देशातील भ्रष्टाचार हे त्याहून मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन स्वामी यांनी केले.विकासाने निवडणुका जिंकल्या जात नाहीदेशात आर्थिक विकासातूनच निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाहीत तर लोकांच्या भावना हादेखील एक मोठा मुद्दा असतो. त्यामुळे पुढील निवडणुकांत भ्रष्टाचार, हिंदुत्व व विकास या त्रिसूत्रीच्या आधारावर भाजप लढेल असेदेखील स्वामी यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीnagpurनागपूर