शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रमण्यम् स्वामी म्हणतात, दाऊदच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे काँग्रेस नेते दबावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:06 IST

काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊन अशी वक्तव्ये देण्यात येत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप नेते खा.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे. नागपुरात लोकतंत्र सेनानी मंचतर्फे आणीबाणी स्मृती दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देपाच मिनिटात रद्द होऊ शकते कलम ३७०लोकतंत्र सेनानी मंचतर्फे नागपुरात आणीबाणी स्मृती दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊन अशी वक्तव्ये देण्यात येत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप नेते खा.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे. नागपुरात लोकतंत्र सेनानी मंचतर्फे आणीबाणी स्मृती दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला लोकतंत्र सेनानी मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश सोनी व ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी हेदेखील उपस्थित होते. भारतातील काळा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईला जातो व तेथून मग ‘स्विस बँक’खात्यात तो जमा होतो. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या काळ्या पैशांची कामे दाऊदने केली व त्यांची यादीच त्याच्याकडे आहे. कॉंग्रेस नेत्यांची काश्मीरबाबतची अलीकडची वादग्रस्त वक्तव्ये त्याच दबावातून आली आहे, असे सुब्रमण्यम् स्वामी म्हणाले. काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७०ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहापोटी हा दर्जा देण्यात आला. मात्र संविधानात लिहिलेले आहे की हे तात्पुरते कलम आहे व याला रद्द करण्यासाठी संसदेच्या मंजुरीची आवश्यकताच नाही. केवळ राष्ट्रपतींच्या मंजुरीने अधिसूचना काढण्याची आवश्यकता आहे. अवघ्या पाच मिनिटांत हे कलम हटू शकत असताना इतके वर्ष का प्रतीक्षा करण्यात आली व सध्याचे सरकारदेखील पाच वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला. दीप्ती कुशवाह यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर रवींद्र कासखेडीकर यांनी आभार मानले.राममंदिरासाठी अध्यादेश येऊ शकतोराममंदिराचा मुद्दा न्यायालयात असला तरी केंद्र सरकार यासंदर्भात कायदा करण्यासाठी संसदेत विशेष प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. एक अध्यादेश जारी करण्यात येईल व निवडणुकांच्या अगोदर राममंदिराचा मार्ग मोकळा करण्यात येईल, असा सुब्रमण्यम् स्वामी यांनी दावा केला. जर वादग्रस्त जागेवर मंदिर असल्याचे पुरावे मिळाले तर जागा मंदिरासाठी देण्यात येईल, असे डॉ.पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान असताना सरकारने शपथपत्रात म्हटले होते. तसे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे सरकारला यात फारशी अडचण जाणार नाही, असेदेखील ते म्हणाले.नेहरूंमुळे आंबेडकर, पटेलांवर अन्यायडॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांंची संविधान व देशनिर्मितीत मौलिक भूमिका होती. मात्र नेहरू यांनी त्यांच्या कार्यकाळात या तिघांनाही भारतरत्न मिळू दिले नाही. पहिले भारतरत्न नेहरू यांनाच मिळाले व त्यावर सहीदेखील स्वत: नेहरू यांचीच होती, असे सुब्रमण्यम् स्वामी यांनी सांगितले.देशात थेट आणीबाणी लागणार नाहीइंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीनंतर पुढील सरकारने संविधानात संशोधन केले. यानुसार थेट आणीबाणी लावणे शक्य नाही. केवळ देशात सशस्त्र विद्रोह झाला तर आणीबाणी लागू शकते. लोकशाही देशाच्या रक्तातच आहे. त्यामुळे जुनी आणीबाणी लागूच शकत नाही. आणीबाणीच्या अफवा खूप उठतात.मात्र देशातील भ्रष्टाचार हे त्याहून मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन स्वामी यांनी केले.विकासाने निवडणुका जिंकल्या जात नाहीदेशात आर्थिक विकासातूनच निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाहीत तर लोकांच्या भावना हादेखील एक मोठा मुद्दा असतो. त्यामुळे पुढील निवडणुकांत भ्रष्टाचार, हिंदुत्व व विकास या त्रिसूत्रीच्या आधारावर भाजप लढेल असेदेखील स्वामी यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीnagpurनागपूर