शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत उपराजधानी आंतरराष्ट्रीय

By admin | Updated: August 1, 2016 01:52 IST

आघाडी शासनाच्या काळात नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा केवळ कागदावरच होता.

नागपूर : आघाडी शासनाच्या काळात नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा केवळ कागदावरच होता. नागपूरच्या विकासासंदर्भात अनेक प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित पडलेले होते. काँग्रेस सरकारच्या काळात नागपूरची सातत्याने उपेक्षा होत गेली, अशी घणाघाती टीका करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर हल्ला चढविला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खऱ्या अर्थाने हे शहर सरकारच्या अजेंड्यावर आणले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात शहरात सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होताना दिसत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले. एवढेच नव्हे तर विकासाची ही गाडी अशीच सुसाट धावणार असून येत्या तीन वर्षांत नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांच्या स्वत:च्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात २०० कोटी रुपयांच्या विवि विकास कामांचे भूमिपूजन केले. दिव्यांगाना उपयोगी नि:शुल्क कृत्रिम अवयव व साहित्य वितरण ही करण्यात आले. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या प्रांगणात हा सोहळा झाला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिलेल्या सडेतोड उत्तराचीच चर्चा रंगली होती. या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार व शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार मितेश भांगडिया, नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्र सभापती दीपक म्हैसकर, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जि.प. सीईओ कादंबरी बलकवडे, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, जि.प. समाजकल्याण अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह द.प. नागपुरातील नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात ७०० दिव्यांगाना प्रमाणपत्रासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती फायबर आॅप्टिकने जोडून नागपूर जिल्हा डिजीटल केला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील २९००० ग्रा.प. डिजीटल होणार आहे. ३५० सेवा आॅनलाईन करण्यात येणार आहे. त्या मोबाईल अ‍ॅपवर आणून लोकांची कामे सहज होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, नागपूरच्या विकासासाठी भरपूर निधी मिळाला आहे. द.प. मधील ८००० लोकांना रस्त्याच्या आरक्षणातून मुक्त केले आहे. आता झोन स्तरावर सरकार आपल्या दारी शासनाने मतदार संघनिहाय जनता दरबार घेऊन जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून सरकार आपल्या दारी हा उपक्रम महापालिकेच्या झोन स्तरावर होणार आहे. या उपक्रमाला ९ आॅगस्टपासून लक्ष्मीनगर झोनपासून सुरुवात होणार आहे. यात १६ वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करतांना अनेक अडचणी होत्या. परंतु सुलभपणे मालकी हक्काचे पट्टे मिळावे, यासाठी शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आला आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नवीन नियमाप्रमाणे मालकी हक्काचे पट्टे तात्काळ वाटप करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.