शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खासदाराच्या शाळेलाही हवेत मेळघाटातील विद्यार्थी

By admin | Updated: July 11, 2014 01:18 IST

मेळघाटातील शेकडो विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे वाहनांमध्ये कोंबून पळविले जात असल्याचा प्रकार आठवड्यापासून अव्याहतपणे सुरू आहे. बुधवारी रात्री १२ वाजता परतवाडा वाहतूक पोलिसांनी नागपूर नजीकच्या

आठवड्यातील दुसरी घटना : नागपूरला नेले ११५ विद्यार्थी, भावना पब्लिक स्कूलला ५० विद्यार्थ्यांची रसदनरेंद्र जावरे - अचलपूरमेळघाटातील शेकडो विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे वाहनांमध्ये कोंबून पळविले जात असल्याचा प्रकार आठवड्यापासून अव्याहतपणे सुरू आहे. बुधवारी रात्री १२ वाजता परतवाडा वाहतूक पोलिसांनी नागपूर नजीकच्या उमरी येथील आश्रमशाळेत एका ट्रॅॅव्हल्समधून ११५ विद्यार्थ्यांची कोंबून नेताना सुटका केली.विदर्भातील पुढाऱ्यांसह नेत्यांच्या आदिवासी अनुदानित आश्रम शाळांमध्ये गत आठवड्यापासून विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे कोंबून नेले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. बुधवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान धारणी तालुक्यातील ११५ विद्यार्थी सोनपरी ट्रॅॅव्हल्स एम.एच.११ ए.यू. २४४१ मध्ये कोंबून नेले जात होते. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. नागपूरनजीकच्या उमरी येथील अहल्याबाई होळकर आदिवासी आश्रम शाळेत हे विद्यार्थी नेले जात होते. त्यांच्यासोबत अजय पांडुरंग वाळके, ताराचंद दिग्रसे, सुशील गजभिये, सुरेश रेवतकर हे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी होते.ट्रॅव्हल्सवर मॅरेज पार्टीचे फलकधारणी तालुक्याच्या विविध खेड्यांतून या आदिवासी विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे कोंबून नेण्यासाठी सोनपरी नामक ट्रॅव्हल्सच्या दर्शनी भागावर ‘दिग्रसे परिवार’ असा फलक लावण्यात आला होता. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांची नजर चुकविण्यासाठी सदर प्रकार करण्यात आला.मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यावर युवक काँग्रेसचे अमोल बोरेकर यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वाहतूक सहायक निरीक्षक सतीश चौरे, शिपाई शे. बाबन, प्यारेलाल जवंजाळ यांनी नाकाबंदी करीत ट्रॅव्हल्स अडविली.मेळघाटील आश्रमशाळा पडल्या ओसमेळघाटात आदिवासी विभागामार्फत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात चालविण्यात येतात. त्या २६ जूनपासून ओस पडल्या आहेत. तर दुसरीकडे दररोज शेकडो विद्यार्थी गुरांप्रमाणे कोंबून पळविले जात आहेत. लोकमतची भीतीगत आठवड्यापासून ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या प्रकाराने विदर्भातील आश्रम शाळा व्यवस्थापकांचे धाबे दणाणले असून मेळघाटात आश्रम शाळा असताना त्याच आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या बाहेर जिल्ह्यात विद्यार्थ्यांची पळवा-पळवीबद्दल 'लोकमत' प्रतिनिधीला शिक्षकांनी ओळख करुन घेताच त्यांच्यात दहशत दिसून आली. गुरुवारी रात्री १.३० वाजता ट्रॅव्हल्समधील कोंबलेले विद्यार्थी परतवाडा येथून दोन लहान गाड्यांमध्ये बसविण्यात आल्यावर उमरी येथे पाठविण्यात आले. तीन हजार रुपये दंडपरतवाडा वाहतूक पोलिसांनी ही ट्रॅव्हल्स चिखलदरा स्थानाकानजीक थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने भरधाव वेगाने वाहन पळविले. चालकाजवळ वाहन परवाना नसतानासुध्दा ११५ विद्यार्थी बसविण्यात आले होते. पोलिसांनी परमीटचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मोटर वाहन कायद्यानुसार दाखल करुन तीन हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.