शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

मनपात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 11:44 PM

congress politics in NMC काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देपटोलेंच्या भूमिकेला दिल्लीत पाठबळ : नागपुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेशी महाविकास आघाडी न करता संपूर्ण जागांवर काँग्रेस लढली, तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढावे, अशी भूमिका शहर काँग्रेसने पूर्वीच घेतली आहे. महापालिकेत

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेची आघाडी करू नये, अशा मागणीचा ठराव दीड वर्षापूर्वी शहर काँग्रेसच्या बैठकीत संमत करण्यात आला होता. पुढे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील स्वबळाचा नारा दिल्यामुळे शहर काँग्रेसच्या भूमिकेला बळ मिळाले. आता पटोले यांना दिल्लीतून पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेसला आघाडी का नको ?

- आघाडीबाबात चर्चा करताना राष्ट्रवादी अस्वास्तव जागांची मागणी करते.

- काँग्रेस १०० टक्के जिंकेल, अशा जागांसाठी राष्ट्रवादी अडून बसते.

- या वाटाघाटीत निवडणुकीच्या काळातील महत्त्वाचा वेळ वाया जातो. फलित काहीच होत नाही.

- लोकसभेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत नागपुरात काँग्रेसची मते वाढतच गेली आहेत.

- राष्ट्रवादीची शहरात फारशी ताकद नाही. एकच नगरसेवक तोही स्वब‌ावर निवडणूक आला.

- आघाडीत शिवसेनेलाही जागा सोडाव्या लागतील. काँग्रेसच्या तेवढ्या जागा लढण्यापूर्वीच कमी होतील.

- तशीही नागपुरात शिवसेना ही भाजपची मते कमी करते. त्यामुळे सोबत लढून काँग्रेसचा फायदा नाही.

काँग्रेसला उसणवारीवर उमेदवार घ्यावे लागत नाही

 काँग्रेसच्या विचारांचे मतदार शहरातील प्रत्येक बूथवर आहेत. मित्रपक्षांसाठी ५० जागा सोडल्या तर त्या ठिकाणी पंजा चिन्ह संपेल. असे करून काँग्रेसच्या मतदाराला आपण दुसऱ्या चिन्हावर मत देण्यासाठी बाध्य करीत आहोत. काँग्रेसकडे एका वॉर्डासाठी १० ते १५ तगडे उमेदवार तिकीट मागतात. स्पर्धा एवढी असते की कुणाला तिकीट द्यावी? असा प्रश्न पडतो. आम्हाला उमेदवार उसणवारीवर घ्यावे लागत नाही. त्यामुळे पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.

 आमदार विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक