शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता येण्याची स्थिती; प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोले यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2023 20:37 IST

Nagpur News भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील वातावरण बदलून गेले आहे. लोकांना काँग्रेस परत हवी आहे. लोक तुमची वाट पाहत आहेत. राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता येईल, असे वातावरण आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला.

नागपूर : भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील वातावरण बदलून गेले आहे. लोकांना काँग्रेस परत हवी आहे. लोक तुमची वाट पाहत आहेत. राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता येईल, असे वातावरण आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला.

प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक राणी कोठी येथे पार पडली. बैठकीला ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचे महाराष्ट्र प्रमुख माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, आरीफ नसीम खान, सुनील केदार, सुनील देशमुख, सतीश चतुर्वेदी, आमदार विकास ठाकरे, प्रणिती शिंदे, अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रवक्ते अतुल लोंढे, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

या बैठकीत प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. त्यामुळे नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी मनमोकळेपणाने मते मांडली.

पटोले म्हणाले, आम्ही लोकं सांभाळण्यात कमी पडलो. त्यामुळे एकामागून एक लोक पक्ष सोडून गेले. एक गेला की आपले जमते, ही मानसिकता आता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पक्ष सोडणारे पवारच म्हणतात, काँग्रेस कुणी संपवू शकत नाही!

- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेस पक्ष सोडत राष्ट्रवादीची स्थापना केली. नुकतेच काँग्रेसच्या स्थापना दिवशी काँग्रेसच्या निमंत्रणावरून पवार हे काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांनीच काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही, असे वक्तव्य केले, असे उदाहरण देत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांना टोला लगावला.

नवी मुंबई, ठाण्यावर लक्ष द्या

- कोकण, मराठवाड्यासह सोलापूर व नाशिक परिसरातही काँग्रेसची स्थिती सुधारली आहे. मात्र, नवी मुंबई, पालघर, ठाणे या परिसरात पक्षाचे मोठमोठे नेते असूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही, अशी खंत व्यक्त करीत या भागावर अधिक लक्ष देण्याची सूचना पटोले यांनी केली.

बैठकीत गैरहजर राहणारे माजी मंत्री व पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठविणार

- बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर आले नाहीत. पटोले म्हणाले, प्रदेश कार्यकारिणी मोठी आहे. पण अनेक जण बैठकीलाच येत नाहीत. माजी मंत्री के. सी. पाडवी हे तर कधीच आले नाहीत. पक्षाला मानायचेच नाही, ही व्यवस्था आता बदलावी लागेल. आजच्या बैठकीला काही माजी मंत्री येऊ शकले नाहीत, त्यांनी कारण कळविले आहे. पण जे कारण न कळविता अनुपस्थित आहेत त्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविले जाईल, असा इशाराही पटोले यांनी दिला.

वडेट्टीवार म्हणाले, मी भाजपात जाणार नाही

- माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पक्षांतर्गत विरोधकांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, आपलेच लोक वडेट्टीवार भाजपात जाणार अशा चर्चा हेतूपुरस्सर पसरवित आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. मी भाजपात जाणार नाही, असे वडेट्टीवार यांनी ठासून सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस