शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्याचे वनक्षेत्र २१ वरून ३० टक्के करणार ; वनमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:00 IST

Nagpur : वरिष्ठ अधिकाऱ्यांचा घेतला क्लास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राचे वनक्षेत्र २१ टक्के आहे. यातील ६५ टक्के वन विदर्भात असून, महाराष्ट्राचे वनक्षेत्र ३० टक्के करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

वनमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला (वनबल प्रमुख) भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत ते बोलत होते. वनमंत्री म्हणाले, वन विभागातील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात येतील. यात प्रामुख्याने मानव - वन्यजीव संघर्ष तसेच वाघांच्या मृत्यूबाबत विचारमंथन होणार आहे. सोबतच वन विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी वन विकास महामंडळ आणि सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सेमिनरी हिल्स येथील हरिसिंग सभागृहात आयोजित बैठकीत वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचा क्लास घेत वनविभागाच्या एकात्मिक सबलीकरणाबाबत चर्चा केली. बैठकीत वनविभागाचे संरचनात्मक विस्तारीकरण, आर्थिक व कार्यात्मक सबलीकरणाबाबत विविध शाखांचे वरिष्ठ वनाधिकारी गुरुवारी सादरीकरण करणार आहेत. बैठकीला अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन) विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग) ऋषिकेश रंजन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) प्रवीण चव्हाण, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी) नरेश झुरमुरे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :nagpurनागपूरforestजंगलGanesh Naikगणेश नाईक