शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

एसटीचे डिझेल संपले, विद्यार्थी घरीच अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 15:47 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपल्याने फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे.

ठळक मुद्देग्रामीणमध्ये एसटी महामंडळाला डिझेलचा तुटवडा : फेऱ्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांची शाळेला सुट्टी

नागपूर : ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्याने एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी होत होती. पण एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या वाढल्याच नाही, उलट डिझेलच्या कारणाने आहे त्या फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे.

ग्रामीण भागामध्ये शाळेय विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास अतिशय सोयीचा व आर्थिक दृष्ट्या परवडणारा असतो. एसटी महामंडळही विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात एसटीच्या पासेस उपलब्ध करून देते. कोरोनात दीड वर्षापेक्षा अधिक काळ शाळा बंद होत्या. विद्यार्थीही घरीच असल्याने ग्रामीण भागात महामंडळाने काही फेऱ्या कमी केल्या होत्या. परंतु ग्रामीण भागात १५ जुलैपासून वर्ग ८ ते १२ ची शाळा सुरू झाली.

शाळांनी बसच्या फेऱ्या वाढविण्यासाठी महामंडळाला पत्र दिल्यानंतर शाळेच्या वेळेत बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. आता ४ ऑक्टोबरपासून वर्ग ५ ते ७ च्या देखील शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त आहे. पण प्रवासी व्यवस्था सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपले आहे. त्यामुळे डेपोंमध्ये एसटीच्या बसेस उभ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे.

- बसच्या फेऱ्या शाळेच्या वेळेत नाही

माहुली गावात राहणारी मनिषा शेंडे या विद्यार्थीनीची शाळा २० किलोमीटरवर आहे. मनिषा म्हणाली शाळेत पोहचण्यासाठी एसटी हे एकमेव साधण आहे. शाळा सुरू झाल्यापासून बस सुरू झाली आहे. पण बसची फेरी शाळेच्या वेळेत नाही. त्यामुळे आमचे पहिल्या तासाचे लेक्चर सुटते. परतीच्या वेळेतही शाळा सुटण्याच्या पूर्वीच बस येत असल्याने आम्हाला शेवटचे लेक्चर सोडावे लागते. आता कालपासून बसच आली नाही. त्यामुळे शाळेत जावू शकली नाही.

काळाफाटा येथील दिनेश आदेवार म्हणाले की गावात बस सुरू व्हावी म्हणून आम्ही आमदाराला पत्र पाठविले. गावकऱ्यांचे सह्यांचे पत्र डेपो मॅनेजरला दिले. पण बस सुरू झाली नाही. आमच्या गावातील २५ विद्यार्थी दीड किलोमीटर दूर जावून बस पकडतात. बस नसल्यामुळे लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे धाडस करीत नाही.

शाळेच्या मुख्यध्यापक राजश्री उखरे म्हणाल्या, ''आमच्या शाळेतील ४०० विद्यार्थी बसचे प्रवास करतात. असे असतानाही शाळेच्या वेळेत बसच्या फेऱ्या कमी आहेत. शाळेच्या वेळेत बस पोहचतही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पहिल्या तासिकेचे नुकसान होते. परतीच्या प्रवासातही शाळा सुटण्यापूर्वी बस येऊन जाते. त्यामुळे आम्हाला शेवटच्या तासिकेपूर्वी विद्यार्थ्यांना सोडावे लागते. गेल्या दोन दिवसापासून बसेस बंद आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला आहे. यासंदर्भात डेपोत विचारले असता त्यांनी सांगितले की डिझेल संपले आहे. हा प्रकार शाळा सुरू झाल्यापासून बरेचदा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.''

डिझेल अभावी ग्रामीणच्या काही भागातील बसफेऱ्या बंद आहे. लवकरच डिझेलची व्यवस्था करून बसफेऱ्या सुरू करण्यात येईल.

- तनुजा काळमेघ, विभागीय वाहतूक अधिकारी, नागपूर विभाग

टॅग्स :state transportएसटीStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण