शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तर नदी काठावरील रहिवासी येणार धाेक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

नागपूर : सिवेजद्वारे नदी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याने जलप्रदूषण वाढले आहे. मात्र या प्रदूषणामध्ये काेराेना विषाणूचाही समावेश असण्याच्या शक्यतेने ...

नागपूर : सिवेजद्वारे नदी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याने जलप्रदूषण वाढले आहे. मात्र या प्रदूषणामध्ये काेराेना विषाणूचाही समावेश असण्याच्या शक्यतेने भीती निर्माण केली आहे. शहरातील २५० ते ३०० वस्त्या नागनदी व पिवळी नदी काठावर वसलेल्या आहेत. जर पाण्यातून संसर्ग हाेत असेल तर या पावसाळ्यातच अनेक वस्त्यांमधील नागरिक धाेक्यात येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरात घराघरातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावांसह नागनदी, पिवळी नदी व पाेहरा नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. हेच प्रदूषण पुढे कन्हान नदी व वैनगंगा नदीपर्यंत पाेहचले आहे. या प्रदूषणात मानवी शरीरातील काॅलिफाॅर्मचे प्रमाण प्रचंड आहे. अहमदाबाद येथे नदी व तलावात काेराेनाचे विषाणू आढळल्याने नागपूरबाबतही ही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दृष्टिकाेनातून विचारच झाला नसल्याचे दिसून येत आहे.

काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागपूर शहर हायरिस्कवर हाेते आणि आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आधीच नागरिक दहशतीत आहेत. त्यात सिवेजमध्ये काेराेना विषाणूचे इन्फेक्शन राहण्याच्या शक्यतेने या भीतीमध्ये आणखी वाढ केली आहे. ही स्थिती लक्षात घेता सर्व अंगाने विचार करून नदी तलावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणे अगत्याचे हाेते. मात्र महापालिकेने किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था- नीरीद्वारे विविध तलाव व नद्यांच्या पाण्याची तपासणी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याविषयी अद्याप कुणी सांगण्यास तयार नाही.

गंभीर दखल घेण्याची गरज

- शहरातील अनेक भागात सिवेजचे पाणी पिण्याच्या नळलाईनमध्ये झिरपत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात.

- शहरातील ५० झाेपडपट्ट्यांसह २५० च्यावर वस्त्या नागनदी व पिवळी नदी काठावर वसल्या आहेत आणि पावसाळ्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरत असते. हेही धाेक्याचे संकेत आहेत.

- अनेक ठिकाणी या नद्यांचे पाणी शेतांमध्ये जाते. शिवाय भाजीपाला या पाण्याने धुतल्या जात असल्याचेही सांगण्यात येते.

वैज्ञानिक तथ्य काय?

- काेराेनाच्या प्रकाेपानंतर मे २०२० मध्ये स्टर्लिंग विद्यापीठाने त्यांच्या अभ्यासात सिवेजमधून काेराेना विषाणूचा प्रसार हाेण्याची शक्यता व्यक्त करीत दुर्लक्ष करणे धाेकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली.

- विद्यापीठाचे प्रा. कुलियम यांच्यानुसार काेराेना रुग्णाकडून संसर्गित पाण्यामध्ये ३३ दिवसांपर्यंत काेराेनाचे विषाणू टिकून राहू शकतात.

- मानवी विष्ठेतून विषाणू किती पसरताे हे सांगता येत नाही पण श्वसन मार्गाने निघणाऱ्या विषाणूपेक्षा पचन मार्गाने निघणारा विषाणू अधिक काळ टिकत असल्याचे प्रा. कुलियम यांनी स्पष्ट केले.

- काेराेना डेल्टा प्लस विषाणू अधिक धाेकादायक असल्याचे व त्याचा प्रसार भारतातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशावेळी सांडपाण्यातून ताे पसरला तर किती धाेकादायक ठरेल, याचा विचार हाेण्याची गरज आहे.