शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

तर नदी काठावरील रहिवासी येणार धाेक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

नागपूर : सिवेजद्वारे नदी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याने जलप्रदूषण वाढले आहे. मात्र या प्रदूषणामध्ये काेराेना विषाणूचाही समावेश असण्याच्या शक्यतेने ...

नागपूर : सिवेजद्वारे नदी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याने जलप्रदूषण वाढले आहे. मात्र या प्रदूषणामध्ये काेराेना विषाणूचाही समावेश असण्याच्या शक्यतेने भीती निर्माण केली आहे. शहरातील २५० ते ३०० वस्त्या नागनदी व पिवळी नदी काठावर वसलेल्या आहेत. जर पाण्यातून संसर्ग हाेत असेल तर या पावसाळ्यातच अनेक वस्त्यांमधील नागरिक धाेक्यात येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरात घराघरातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावांसह नागनदी, पिवळी नदी व पाेहरा नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. हेच प्रदूषण पुढे कन्हान नदी व वैनगंगा नदीपर्यंत पाेहचले आहे. या प्रदूषणात मानवी शरीरातील काॅलिफाॅर्मचे प्रमाण प्रचंड आहे. अहमदाबाद येथे नदी व तलावात काेराेनाचे विषाणू आढळल्याने नागपूरबाबतही ही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दृष्टिकाेनातून विचारच झाला नसल्याचे दिसून येत आहे.

काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागपूर शहर हायरिस्कवर हाेते आणि आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आधीच नागरिक दहशतीत आहेत. त्यात सिवेजमध्ये काेराेना विषाणूचे इन्फेक्शन राहण्याच्या शक्यतेने या भीतीमध्ये आणखी वाढ केली आहे. ही स्थिती लक्षात घेता सर्व अंगाने विचार करून नदी तलावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणे अगत्याचे हाेते. मात्र महापालिकेने किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था- नीरीद्वारे विविध तलाव व नद्यांच्या पाण्याची तपासणी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याविषयी अद्याप कुणी सांगण्यास तयार नाही.

गंभीर दखल घेण्याची गरज

- शहरातील अनेक भागात सिवेजचे पाणी पिण्याच्या नळलाईनमध्ये झिरपत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात.

- शहरातील ५० झाेपडपट्ट्यांसह २५० च्यावर वस्त्या नागनदी व पिवळी नदी काठावर वसल्या आहेत आणि पावसाळ्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरत असते. हेही धाेक्याचे संकेत आहेत.

- अनेक ठिकाणी या नद्यांचे पाणी शेतांमध्ये जाते. शिवाय भाजीपाला या पाण्याने धुतल्या जात असल्याचेही सांगण्यात येते.

वैज्ञानिक तथ्य काय?

- काेराेनाच्या प्रकाेपानंतर मे २०२० मध्ये स्टर्लिंग विद्यापीठाने त्यांच्या अभ्यासात सिवेजमधून काेराेना विषाणूचा प्रसार हाेण्याची शक्यता व्यक्त करीत दुर्लक्ष करणे धाेकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली.

- विद्यापीठाचे प्रा. कुलियम यांच्यानुसार काेराेना रुग्णाकडून संसर्गित पाण्यामध्ये ३३ दिवसांपर्यंत काेराेनाचे विषाणू टिकून राहू शकतात.

- मानवी विष्ठेतून विषाणू किती पसरताे हे सांगता येत नाही पण श्वसन मार्गाने निघणाऱ्या विषाणूपेक्षा पचन मार्गाने निघणारा विषाणू अधिक काळ टिकत असल्याचे प्रा. कुलियम यांनी स्पष्ट केले.

- काेराेना डेल्टा प्लस विषाणू अधिक धाेकादायक असल्याचे व त्याचा प्रसार भारतातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशावेळी सांडपाण्यातून ताे पसरला तर किती धाेकादायक ठरेल, याचा विचार हाेण्याची गरज आहे.